Monday, April 26, 2021

रूम नंबर २/८७ संस्कारगृह

 

विवेक; माझी प्रेरणा

पुणे येथील भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक असलेला माझा रूम पार्टनर मित्र डॉ. विवेकानंद अर्जुनराव रणखांबे याच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्याच्याविषयीच्या भावनांना मोकळी करून दिलेली वाट .. 

जून १९९२ मध्ये बीएससी परीक्षेत मी विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये प्रथम आलो होतो. एमएससी भौतिकशास्त्र कोर्ससाठी शिवाजी विद्यापीठात प्रवेश मिळाल्यामुळे वसतिगृहातील खोली क्रमांक २/८७ मध्ये राहणाऱ्या विवेक या आपल्या चुणचुणीत मित्राचा पत्ता आमच्या रविंद्र अनपट या मित्राने मला दिला. विवेक विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागात एमए च्या दुसऱ्या वर्षात शिकत होता आणि गावाकडील एखादा होतकरू तरुण आपला रूमपार्टनर असावा या प्रतीक्षेत होता. त्याच्यासाठी मी एक प्रामाणिक विद्यार्थी आणि खऱ्या अर्थाने गोल्ड-मेडलिस्ट होतो ! वसतिगृहातील एक वर्षाच्या सहवासात परस्पर फायदा व्हावा हीच त्याची माफक अपेक्षा ! जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटलो तेव्हा माझ्याजवळ माझी पत्र्याची पेटी आणि एक पिशवी होती. यावरून तो माझ्या आर्थिक पार्श्वभूमीची कल्पना करू शकत होता. त्याने माझे आनंददायी स्मित हास्य करून अभिवादन केले आणि माझ्याशी बर्‍याच गोष्टी बोलण्याच्या गडबडीत होता. कदाचित तो पहिल्याच भेटीत माझ्याशी बरंंच काही बोलणार होता. आपल्या घरापासून शेकडो मैलांच्या अंतरावर आपलं कुणीतरी भेटल्याचा मला दिलासा मिळाला होता. खंडाळा येथे माझ्या बहिणीच्या घरी राहून लोणंद येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाची तीन वर्ष सोडली तर तोपर्यंत मी माझ्या घरापासून फार दूर राहिलो नव्हतो. पण वर्षभरासाठी योग्य जोडीदार मिळाल्यामुळे आम्ही दोघेही आनंदित होतो.

तो ज्या पद्धतीने बोलत असे त्यामुळे मी थोड्याच वेळात त्याच्यावर प्रभावित झालो आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा चाहता झालो. मी खेडेगावात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि एकूणच वेगळ्या वातावरणात वाढल्याने माझी त्याच्याशी तुलना होऊ शकत नव्हती. मला भाषा, उच्चार आणि व्यक्तिमत्त्व या दृष्टिकोनातून विवेकसारखे व्हायचे होते. रवीने मला विवेकच्या प्रतिकूल परिस्थितीविषयी तसेच मर्यादित गरजांविषयी सांगितले होते. त्यामुळे आम्ही मर्यादित स्त्रोतांसह व्यवस्थापन करत आर्थीक समतेतच होतो. त्याचे कपडे साधे पण नीटनेटके असायचे. आश्चर्यकारक टापटीप म्हणा ना ! पहिल्या दिवशी आम्ही जेवायला हॉटेलमध्ये गेलो. आयुष्यात विवेकसोबत प्रथमच बाहेर खाणे हा माझ्यासाठी एक मोठा अनुभव होता.

आमचा रूम पार्टनर प्रवास सुरू होण्यापूर्वी त्याने काही नियम घातले होते: भडक कपडे घालायचे नाहीत .. कमीत कमी बोलावे आणि कमीत कमी खर्च करावा .. हलके हसावे .. आणि बरंच काही ..

महत्वाची गोष्ट म्हणजे; मला कोल्हापूर शहराचे गल्ली आणि बोळ त्याच्या सायकलीमुळे माहीत झाले .. वर्षभर त्याच्यापेक्षा जास्त मीच त्याची सायकल वापरली होती. आंबाबाईचे मंदिर, रंकाळा, शाहू स्टेडियम, न्यू पॅलेस, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी फिरताना डबल सीट सायकलवरून आम्ही फेरफटका मारत असू. यामुळे वेळ आणि पैशाची बचत झालीच पण शहराचा कानाकोपरा माहीत झाला. त्याने मला आपण जात असलेल्या पसारे मामांची घरगुती खाणावळ लावून दिली. आवाज न करता हळू हळू जेवत जा .. टीव्ही पाहताना गोंधळ घालायचा  नाही ... मामांना आदबीने चपाती भाजी मागावी.. या सर्व माझ्यासाठी आज्ञा असत. मी अजूनही माझ्या आयुष्यात त्याने घालून दिलेल्या छोट्या छोट्या नियमांचे पालन करतो. तेव्हा मला या नियमांचे पालन करणे म्हणजे अन्यायकारी वाटे, परंतु आता ते माझ्या जीवनाचे संस्कार झाले आहेत. खोली क्रमांक २/८७ माझ्यासाठी संस्कारगृह होते.

माझी इतारांशी ओळख करून देत 'गोल्ड-मेडलिस्ट बरं का !' असे सांगताना त्याला नेहमीच पुरेपूर अभिमान आणि रुबाब वाटे ! वसतिगृह क्रमांक २ मध्ये फक्त आर्टस् व कॉमर्सचे विद्यार्थी राहत असत. सायन्सचे विद्यार्थी वसतिगृह क्रमांक ३ मध्ये ... वसतिगृह क्रमांक २ मध्ये मीच एकटा सायन्सचा विद्यार्थी होतो. म्हणूनच माझे सायन्सपेक्षा आर्टस् व कॉमर्सचे मित्र जास्त आहेत. पण मला त्याच वसतिगृहात प्रवेश मिळावा म्हणून त्याने वार्डनबरोबर घातलेली हुज्जत, त्याच्यावर टाकलेला दबाव तसेच केलेली विनंती मला आजही आठवतेय. केव्हढा अठ्ठाहास !

त्याची अभ्यासाची एक विशिष्ट पद्धत होती. इंग्रजीसारख्या अवघड विषयाच्या पॅराग्राफचे त्याने कधी पाठांतर केल्याचे आठवत नाही. पॅराग्राफसाठी गर्भित अर्थाचा एखादा शब्द शोधण्याची किंवा तयार करण्याची त्याला सवय आहे. अशा पाच ते सहा शब्दांमधून केलेले वाक्य हे त्यावर आधारित प्रश्नाचे उत्तर असायचे. हे वाक्य ध्यानात ठेवणे म्हणजे झाला याचा अभ्यास ! वाक्यांतील शब्दांवर आधारित मुद्देसूद उत्तर मात्र याला भरपूर गुण मिळवून देई. त्यामुळे परीक्षेदरम्यान त्याला अभ्यासास कमी वेळ लागे.

वक्तृत्व आणि सूत्रसंचालनाचे त्याच्याकडे विलक्षण कसब आहे. जो कोणी त्याचे भाषण किंवा सूत्रसंचालन ऐकेल तो त्याच्या प्रेमात पडतोच. वक्तृत्वासाठी त्यांने अनेक पुरस्कार मिळवले आहेत. कृतज्ञता आणि कौतुक करण्याची सवय ही त्याच्यासाठी परमेश्वराचं सर्वोच्च देणं आहे असं मी मानतो. एखाद्याने त्याला केलेली अनमोल मदत तो कधीही विसरणार नाही. तो एखाद्याच्याविषयी इतकं कौतुक करेल की स्वतः ती व्यक्ती देखील ते ऐकून खजील होईल. 

वक्तृत्व कलेत निपुण असलेल्या विवेकने वयाच्या २२ -२३ व्या वर्षीच लिखाणाचे उत्कृष्ट कौशल्य आत्मसात केले होते. छोटंसं उदाहरच द्यायचं झालं तरं तो उत्कृष्ट पत्रं लिहीत असे. तो नेहमी मावशी आणि आण्णांना खुशालीचे वाङगमयीन पत्र लिहित असे आणि मला वाचायला देई. ति. आण्णा व सौ. आईस .. विवेकचा साष्टांग नमस्कार विनंती विशेष .. .... मला त्या दर्जाचे लिखाण अद्याप करता आले नाहीच पण तेव्हा त्याची ती पत्रं वाचताना एखाद्या लेखकाची वाक्ये वाचतोय की काय असा भास होई ! त्याने शेकडो सन्मानपत्रांचे वाचन तर केले आहेच पण शरदचंद्रजी पवार, पतंगरावजी कदम, यशवंतरावजी मोहिते, योगाचार्य अय्यंगार, प्रा राम बडोदे इत्यादी सारख्या कित्येक महान व्यक्तिमत्वांच्या डीलीट तसेच जीवन गौरव पुरस्कारांच्या सन्मानपत्रांचे लेखन देखील केले आहे. फारच अभिमानास्पद कामगिरी तर आहेच पण दैवी कौश्यल्य आहे हे ! त्याचे ब्लॉगवरील उत्कृष्ट लिखाण वाचणं म्हणजे जणू समरस होऊन स्वतःला त्या विशिष्ट ठिकाणी किंवा काळात घेऊन जाणं आणि त्याचं सहचारी होणं !

त्याची आणखी एक सवय अशी होती की तो आपल्या प्रियजणांचे वाढदिवस कधीच विसरत नाही. त्याच्याकडे नेहमीच आठवड्याचा वाढदिवस कार्यक्रम तयार असे. मी मात्र या मुद्द्यावर त्याच्याशी सहमत नसे. तो ज्या पद्धतीने त्या सवयीचा अंमलबजावणी करी, मला आवडत नसे. मला वाटे; आपल्याला न परवडणारे पुष्पगुच्छ, भेटवस्तू किंवा ग्रीटिंग कार्ड देण्याऐवजी केवळ शुभेच्छा दिल्या पाहिजेत. शेवटी भावना महत्वाच्या !

वरिष्ठांशी मला ओळख करून दिल्यानंतर त्यांचे चरणस्पर्श करून दर्शन घेण्याविषयी त्याचा नेहमी आग्रह असे. मला सुरुवातीस ते पटायचे नाही. माझ्यासाठी तसे करण्याची कधीच वेळ आली नव्हती. भविष्यात मला त्यांच्या सदिछा, मार्गदर्शन आणि आशीर्वादाची गरज भासणार आहे याचा तेव्हा अंदाज नसे. तीस वर्षे मागे वळून पाहिल्यावर विनय किती महत्वाचा आहे याचा अंदाज येतोय. नम्रता आपल्यातील अहंकार कमी करून आपल्या वाढीत कशी मदत करते हे मी त्याच्याकडून शिकलो. विद्या विनयेन शोभते, हे मला यथावकाश समजले. तो मला नंतर सांगे की सभ्य अभिवादन आपणास सान करूच शकत नाही. सुवर्णपदकाची डोक्यातील हवा त्याच्यामुळेच बाहेर आली असे म्हंटले तर वावगे ठरू नये.

आमच्या वर्षभराच्या सहवासामध्ये इच्छा होऊनही आम्ही कधीही थिएटरमध्ये सिनेमा पाहिला नाही पण त्याच्याबरोबर मराठी नाटके पाहिल्याचे आठवते. मला एक नाटक पाहण्याचा किस्सा आठवतो. त्याच्याकडे एका नाटकाचे जादा तिकीट होते. तो म्हणाला 'चला जाऊया मित्रांसोबत नाटक पाहायला'. मी म्हणालो - मित्राचा कोट घालून जाऊया का ? दिवसा कोट घालण्याचा प्रसंग येत नाही आणि रात्री अंधारात कणी ओळखणार नाही. अर्थात, हा माझा विचित्र हट्टीपणा  न पटण्यासारखाच होता. तो माझ्यावर नाराज झाला. विरोधाला विरोध म्हणून त्याच्या मित्रांनी मला पाठिंबा दिला आणि कोट घालायला भाग पाडले. तो सायकल चालवत पुढील सीटवर... आणि मी कोट घालून कॅरेजवर .. या विचित्र प्रसंगाची आठवण झाली तरी अजूनही हसू येते. परंतु आता गरज आणि ऐपत असूनही कोट घालण्याचे कमी प्रसंग येतात. आयुष्यात ज्या गोष्टी आपल्याकडे नसतात त्यांचीच हाव असते. परंतु कधीही मित्राच्या या सूचनेबद्दल खिन्नता वाटत नाही.

त्याचा गळा फार गोड आहे. त्याला सुरांचे चांगले ज्ञानही आहे. अरुण दातेंची भावगीतं जणू काही तेच गातात अशी गायी. त्याला जुन्या हिंदी आणि मराठी चित्रपटातील गाण्यांची आवड होती. मला यापैकी कशातच गुणवत्ता नसल्यामुळे, मी कायम त्याचा हेवा करीत असे. माझ्यात हे गुण का नाहीत याचा मला त्रागा व्हायचा. मला नेहमीच त्याच्यासारखे भाषण, गाणं आणि कलागुण कसे जतन करावे याचे कुतूहल असे. पण खरं सांगायचं तर त्याला ते एका रात्रीत शक्य झाले नव्हते. त्याची पराकाष्ठाच त्याला तिथपर्यंत घेऊन आली होती. हे तर त्याच्यातील आंतरिक गुणांमुळे, सुयोग्य वातावरणात वाढल्यामुळे, त्याच्या समर्पणामुळे आणि कठोर परिश्रमांमुळे शक्य झाले होते. शिकण्याची चिकाटी त्याला त्यावेळेस ते ते प्राप्त करून देत शिक्षित करत होती. त्याच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळेच तो त्यावेळी विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडला होता.

त्याने कधीही गरीबीचा दिखावा केला नाही, मी त्यास साक्षी आहे. सातारा रोड येथील कुपर कंपनी बंद पडल्याने वडील बेरोजगार... पंढरपूर येथे त्यांच्या मित्राची शेती करीत होते .... अशा परिस्थितीत न डगमगता विवेकच शिक्षण घेऊ शकला असता. माजी मंत्री व भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांच्या सांगली येथील कार्यक्रमादरम्यान त्याने मंत्रीमहोदयांची अशा अप्रतिम शब्दांत ओळख करून दिली की डॉ. कदम हेही त्याच्या प्रेमात पडले. चौकशी केली असता तो सांगली जिल्यातील कुंडलनजीकच्या पुणदी या खेड्यातील गरीब कुटुंबातील आहे हे लक्षात आले, त्यांनी तात्काळ त्याचे पुढील शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. त्याचे पदव्युत्तर शिक्षण याच कारणाने सुकर झाले होते. 

बर्‍याचदा मित्रांच्या नजरेतील त्याची कृत्रिमता तसेच शिष्टता त्याला त्यांच्यापासून दूर नेई. "केशव याच्याबरोबर कसे पटवून घेतो"- याचेच मित्रांना आश्चर्य वाटे ! त्यांची समज वेगळी असे. थोड्या कौतुकाने राग विसरणारा, भावनिक प्रसंगाने डोळ्यात टचकन पाणी आणणारा तसेच मित्रांनी सदाचरण करत काही तत्व बाळगली पाहिजेत अशी अपेक्षा ठेवणारा विवेक भले त्यांना 'नाटकी' वाटायचा पण आतून मात्र तो अत्यंत मृदू, दयाळू, क्षमाशील, काटेकोर आणि कोडगं असं सहज न उमजणारं व्यक्तिमत्त्व होतं.. तो मला लवकर समजला हे माझं भाग्य !

बीएस्सीत विद्यापीठात प्रथमांक आल्याने मला सन्माननीय कुलगुरूंनी विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून नामांकित केले होते. विद्यापीठाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मी एका गटात जाण्याची विवेकची इच्छा होती की जी मी टाळू शकत नव्हतो. पण त्यासाठी मला निवडणुका होईपर्यंत पुढील सुमारे दोन आठवडे अभ्यास तसेच विद्यापीठापासून दूर राहावे लागणार होते. पण तदनंतर माझी बीएआरसीत मुलाखत होती. पण तिथे अभ्यास करता येईल या अपेक्षेने मी ही 'हो' म्हणालो. आम्हाला एका अज्ञात सुरक्षित फार्महाऊसवर नेण्यात आले. हे सारं माझ्या पटण्यापलीकडे होते. मला हे अजिबात आवडले नाही, मग मी सर्वांना गुंगारा देत आणि रात्रभर सुमारे २०० किमीचा प्रवास करून भल्या पहाटे वसतिगृहात परतलो. त्या गडद रात्री नंतर विवेकने मला दाजींच्या खोलीवर दोन आठवड्यांसाठी भूमिगत ठेवले. यामुळे आमचे कौटुंबिक स्नेह वृद्धिंगत झाले. रेल्वेने माझी पहिली मुंबई भेट आणि बीएआरसीतील  मुलाखत दाजींमुळेच शक्य झाली.

पण म्हणतात ना अतिपरिचयात अवज्ञा ! नंतरच्या काळात मला त्याचा आवडता स्वभाव त्याच्या सवयीमुळे आणि बंधंनांमुळे आवडला नाही. त्यातून छोटे छोटे वाद निर्माण होऊन मतभेद होऊ लागले. म्हणून आम्ही काही काळ एकमेकांशी बोललो नव्हतो. तो बरोबर होता तरी मला ते पटायचे नाही. पण काय करणार आपण आपल्या स्वभावाचे गुलाम असतो. आम्हाला आमचा बालिशपणा समजण्यास काही दिवस लागले परंतु आम्हाला त्यातून मोठा धडा मिळाला.

मे १९९३ ला एमए ची परीक्षा संपलयावर त्याने अतिशय जड अंतःकरणाने वसतीगृह सोडलयाचे मला आठवते. कारण पुढे तो अस्तित्वासाठी स्पर्धेच्या आणि संघर्षाच्या अज्ञात जगात प्रवेश करणार होता. आमची भौतिक सोबत संपली होती. पण ह्याला काळजी माझ्या पुढच्या वर्षाच्या रूम-पार्टनर बद्दल ! यथावकाश मी व्दितीय वर्षात गेलो.. मीही विवेकच्या पायावर पाय ठेवत खेडेगावातील हुशार आणि होतकरू अरविंद तावरे या माझ्याच कॉलेजच्या मित्रास रूम पार्टनर केलं होतं. विवेक अरविंदला भेटायला फार उत्सुक होता आणि त्याच्या कोल्हापुरच्या पुढील भेटीत आठवणीने भेटलाही... खोलीत माझ्या अभ्यासास पोषक वातावरण ठेवून 'आपल्याला गोल्ड-मेडल टिकवायचंय' ही सूचना करत परस्पर हित जपत शिकण्याची त्यास विनंती केली. त्याला माझी आणि माझ्या कारकीर्दीची किती काळजी होती याची ही पावती होती !

तो एमए झाल्या झाल्या त्याची भारती विद्यापीठात कायमस्वरूपी प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. मला त्याच्याच संस्थेत प्राध्यापक म्हणून चिकटवण्याची त्याने खटाटोप केली परंतु ते घडायचे नव्हते. खरं तर मला पीएचडी पूर्ण करायची होती आणि मातृसंस्थेची सेवा घडावी म्हणून मी विद्यापीठातच रहावे ही काळाची गरज असावी. इंग्रजी विषयातील पीएचडीचे संशोधन कार्य पॉवरपॉईंट पीपीटीवर सादर करणारा तो विद्यापीठातील पहिला विद्यार्थी होता. त्याची पीएचडी झाल्यानंतर मला आठवतंय की, त्याने - मी स्वत:च्या हिंमतीवर विद्यापीठात नोकरी मिळवलेला मित्र होतो - अशी कमेंट केली होती. खूप मोठी प्रशंसा होती माझ्यासाठी ती !

हल्ली जेव्हा जेव्हा आम्ही एकमेकांशी संपर्क साधतो तेव्हा त्याची माझ्यासाठी बंधन असतातच ! - सोशल मीडियावर जास्त सक्रिय राहू नकोस... फक्त आवश्यक कमेंट्स आणि शैक्षणिक पोस्ट टाकत जा... आपण खूप स्वस्त होऊ नये.. शिष्टाचाराचे योग्य आचरण व्हावे... लोक आपले परीक्षण करण्यात व्यस्त आहेत..  मोठी स्वप्न पहा ! - मी कायम त्याच्याशी सहमत असतो परंतु सर्व आज्ञा पाळणं मला नेहमीच जड जाते. तो माझ्या लिखाणाचं कौतुक करतो ... आता अध्यात्म त्याच्या जगण्याच साधन झाले आहे. नुकताच त्याने कीर्तन या विषयात डिप्लोमा पूर्ण केला आहे. गेल्या नोव्हेंबर मधील आजारात परमार्थनिष्ठा जपत लवकर बरा व्हावा या हेतूने मला 'सार्थ ज्ञानेश्वरी' भेट देऊन ती समजावून घेण्याचा तगादा लावणारा विवेक विरळा ! याने मला त्वरित पूर्वपदावर यायला मदत झाली.

गेल्या तीस वर्षांचा त्याचा जीवनप्रवास मी जवळून पाहिला आहे. त्याच्या सर्व यशांचा मी साक्षीदार आहे. हे बहुमोल व्यक्तिमत्त्व घडताना मी अनुभवले आहे. एका ब्लॉग पोस्टमध्ये विवेकचे चरित्र रेखाटणे अश्यक्य गोष्ट आहे मात्र हा त्याचा एक महत्वाचा भाग असू शकतो. आज तो वयाने पन्नास वर्षांचा होत आहे. तरीही हा एक लांब पल्ल्याचा प्रवास होता ! त्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. माझ्या विवेककडून खूप अपेक्षा आहेत. यासाठी परमेश्वर तुला निरोगी दीर्घायुष्य प्रदान करो हीच प्रार्थना ! सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या आणि कर्तृत्वमय यशस्वी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा !

- डॉ केशव यशवंत राजपुरे (09604250006)

__________________________________________

My inspiration; Vivek

Here I venture to write about my room partner friend Dr. Vivekanand Arjunrao Rankhambe who has been Professor of English at Bharati Vidyapeeth's Yashwantrao Mohite College, Pune on the occasion of his golden jubilee.

Ravindra Anpat, one of our common friends, gave me Vivekanand's contact details of room number 2/87 of the hostel in Shivaji University, Kolhapur as I got admission for MSc course in June 1992. He was already in 2nd year of MA and looking for some bright village guy as his room partner. I had stood first in the University merit list in BSc examination, both at part 3 level and aggregate. For him I was a gold medalist, a sincere scholar ! His intention was both should be mutually benefited due to this one year interaction at hostel. I was with my steel trunk and a bag when I met him for the first time. He greeted me with a pleasant smile and was in a hurry to speak many things to me, maybe in the first meeting itself. For me it was a relief to think that I had someone hundreds of miles away from my home. Until then for me away from home was during a graduation at Lonand by staying at Khandala at my sister's house. Both were overjoyed to have the right accompaniment for the year.

As I grew up in the village and brought up in a different environment, I wanted to be like Vivek in terms of speech, pronunciation and personality. That was all I did not have then in my life. I knew that he was from a poor family so he was managing with limited resources. His clothes were simple but neat. Wonderful neatness - one can say ! On the first day we went out to a hotel for a meal. Eating out for the first time in life was a great experience for me.

He had laid down some rules before our room partner journey was started. Don't wear flashy clothes.. Speak and spend the least.. laugh lightly.. and much more..

The important thing is that; I could know Kolhapur city by all means that is streets and walls due to the bicycle he had.. I had used his bicycle more than him throughout the year. We had been around Kolhapur on a double seated bicycle. It saved a lot of time and money as well. For increasing interaction time he did join me to his mess. Eat slowly without making noise.. not to make gossip while watching TV in mess were the orders for me.. I still follow the rules laid down by him in my life. I felt that following those rules meant persecution, but now they have been rites in my life. Room number 2/87 was Sanskar gruh for me.

He always felt proud while introducing me to his friends as a gold medalist ! In hostel number 2 only arts and commerce faculty students lived, science faculty students were in hostel number 3. I was only a science student there hostel number 2. That's why I have more friends from arts and commerce than science.

He had a specific method of study. He never rehearsed the paragraphs from the subject like English. He has a habit of searching or creating a word with an implicit meaning from the paragraph. A sentence made out of such five to six words would be his answer to a particular question. His study was to recite these sentences..

Along-with language, he had a wonderful knack for elocution and anchoring. Anyone who listened to him would fall in love with him. He had many awards on elocution. He used to speak volumes about somebody that the person himself would go mad to listen to.

Another of his habits was that he never forgot the birthday of any of his loved ones. He always had a birthday schedule of the week. I, however, hardly agreed with him on this point. My opinion been to be;  we should only give best wishes instead of unaffordable bouquets, gifts and greeting cards.

After being introduced to the principals, teachers or senior officers he insisted me to touch their feet. I thought it was weird at that time. For me there was never a time to do that. Now, looking back over 30 years, one realizes how important that was ! I learnt from him how humility helps us to grow and reduce ego. Knowledge without modesty is less useful, I realized then. He would tell me later that polite greetings do not make a person small.

I have never seen a movie (due to poverty of both) in our year long association but I remember watching Marathi dramas with him. I remember an incident from watching drama one day. He had an extra ticket to go with his friends. He said 'let's go'. I said I had a friend's coat and shall wear it. As in a daytime there is no occasion to wear and at night nobody would recognize. This made him very angry and he went in displeasure with me. His friends supported me as opposed to the opposition. One can imagine the picture that he was driving the bicycle and I with a coat on the carriage. I would still smile at that weird behaviour. I knew I did not have the financial and educational capabilities then and that was the odd occasion too. But now there is no desire to wear a coat despite the need. There are things in life that we crave for what we don't have. But then and even now, I do not feel gloomy about the friend's suggestion.

He sings beautifully. He is very knowledgeable about tones. He used to sing Arun Date's lyrics as if he would sing it. He was fond of old Hindi and Marathi movie songs. As I don't have any of these habits, I was always jealous of him. I had got annoyed as to why I did not have these qualities. It was because of his multifaceted personality that he was elected as University Representative then. I always wanted to know how to master speech, song and drama like him. But to be honest he did not get it overnight. Probably this was due to his inherent qualities, proper growing atmosphere, his dedication and the hard work. I learnt that persistence of learning was training him to achieve what he had then.

While hosting the program of late Dr Patangrao Kadam at Sangli, he introduced the minister in such lucid and wonderful words that Dr Kadam also fell in love with him. When interrogated, he noticed that he belonged to a rural poor family from Punadi (Sangli district), he immediately accepted his further academic guardianship. That was the reason for his easy march during post graduation study. He never pretended to be poor, I have witnessed it. Father being jobless, keeping friend's fields at Pandharpur...., in such a situation only Vivek could have taken education without wavering.

Being a University ranker, I was nominated as University Representative by the Honorable Vice Chancellor. Vivek suggested that I go to one of the groups during the University Chairman elections. But for that I had to stay away from my studies for about two weeks. We were taken to an unknown farmhouse for the rest of the time till elections. I did not like it at all, so I evaded everyone and returned to the hostel after traveling around 200 km at night. Since that dark night Vivek kept me underground in his brother-in-law's room for 2 weeks. This brought me still closer to his family.

Disobedience in the neighbourhood. For me, later his favourite nature seemed to be disliked due to his bondage and habits. Therefore we did not talk to each other for a while. Though he was right, I did not agree. We are slaves of our nature. Which took a few days to understand that childishness but we learnt a big lesson from it.

While I was in MSc part 2 he joined Bharati University as a permanent faculty. He tried his level best to get me accommodated in his institute, but in vain. In fact I wanted to complete my PhD and I should serve Alma mater as the times need, so it was clear that I should stay here. After he got his PhD, I remember, he commented that I was his friend who has got a job at University on my own. This was a big compliment to me.

Still he has his fixed bondages whenever we contact each other. - Don't be too active on social media. Just leave most needed comments and academic posts. You don't want to be too cheap. Dream big ! People are busy making statements for you -  I still agree with him but it is always difficult for me to do so. He appreciates my writings..

I have closely watched his life journey of the last 30 years. I have witnessed all his achievements. This is how I have seen this multiphasic personality happen. It was my honest effort to share my experience about him and explain why he is like that. Two years back he had a short escape due to health issues.

Today he is turning 50. This has been a long journey though ! But he has a long way to go. I have high expectations from you Vivek. May God grant you healthy longevity. Happy golden Jubilee to you !

- Keshav

16 comments:

  1. Keshav nice remenisences of uty days.

    ReplyDelete
  2. Keshv nìce written about disciplined but helpful friend keep it up

    ReplyDelete
  3. प्रा डॉ विवेकानंद रनखांबे एक समग्र वर्णन असे म्हणावे असे विवेचन डॉ राजपुरे यांनी केले आहे परन्तु ते वस्तुस्थिती वर आधारित आहे.उगीचच रसभरीत नाही.
    तसे एका लेखात बसेल असा विवेक नाही.अनेक रंगाचा,अनेक ढंगाचा, अनेक दोषांचा त्याहून अधिक गुणांचा असा विवेक.प्रभावी वाणी,सुसंस्कृत राहणी थोडासा नाटकी असे अनेक गन भरून उरलेत त्याच्यामध्ये.केशव तू एक वर्ष त्याच्याबरोबर होता पण आम्ही चार वर्षे एकत्र शिकलो.अजूनही नेहमीचा सम्पर्क आहे.मला वाटते त्याच्या योग्यतेचा अजून पाहिजे तेवढा सन्मान व्हयचा आहे.त्यासाठी त्याला हार्दिक शुभेच्छा!
    प्रा डॉ धनाजी नागणे
    प्र प्राचार्य,शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी
    जी पुणे

    ReplyDelete
  4. प्रोफेसर डॉ. केशव राजपुरे यांनी डॉ. विवेक रणखांबे यांच्याबद्दल जे लिहिले ती अत्यंत सुंदर आणि सुरेख मांडणी आहे. पण विवेक तेवढ्या शब्दात बसणार नाही फक्त एका वर्षाच्या अनुभवात एवढ लिहिता येऊ शकतं तर जास्त काळ त्याच्या सहवासामध्ये राहिला असता तर किती लिहिता आलं असतं. प्रोफेसर डॉ. केशव राजपुरे यांनी लिहिलेले लिखाण आणि संपूर्ण माहिती मी 2/97 ला राहत असल्यामुळे मला माहित आहे पण माझ्यामते विवेक सारखा आणि केशव सारखा मित्र भाग्यवान लोकांनाच मिळतो त्या दृष्टीने ते दोघेही भाग्यवान आहेत आणि मलाही अभिमान आहे की मी त्यांचा मित्र आहे.
    डॉ. विवेक रणखांबे यांना त्यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. विवेक सर यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे माझ्या जीवनातला एक महत्त्वाचा प्रसंग, मला कडेगाव येथील एक स्थळ आले होते आणि त्या स्थळाचे वेळेस मुलगी पाहण्यासाठी मी सुरुवातीला डॉक्टर विवेक रणखांबे यांच्या घरी गेलो तिथून त्यांनी मला सर्व काही व्यवस्थित उरकून ज्या ठिकाणी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी घेऊन गेले त्यावेळी मला समजलं की माणूस कसा असावा आणि फक्त विवेक रणखांबे यांच्यामुळेच माझी कडेगावची सोयरीक जुळली आणि विवाह थाटामाटात संपन्न झाला. डॉ. विवेक रणखांबे यांचा एक स्वभाव मला खूप आवडतो की त्यांना एखादी गोष्ट पटत नसेल तर ते स्पष्टपणे सांगतात तुम्ही चुकीचे करत आहात. असा माझा मित्र भावी आयुष्यात खूप उच्च पदावर विराजमान व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना त्यांच्या भावी वाटचालीस माझ्याकडून व आमच्या कुटुंबियाकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
    डॉ. रामराजे शिवाजीराव माने देशमुख
    छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा
    भूगोल शास्त्र विभाग

    ReplyDelete
  5. I have been good relations with Vivek since 1986 as a classmate and friend. My best wishes to Vivek on his golden jubilee year. :Mr. Prakash Khade, Miraj.

    ReplyDelete
  6. A beautiful and insightful write up on a multi-faceted and studied personality whose demeanor has emerged like a blooming flower, spreading its fragrance all around, constantly yearning for learning; crossing the significant landmark with hard work and sincerity! A friend's all encompassing elaboration, giving an insight into the formative years of the two, inculcating a culture which has persisted! Wishing him many more such fruitful years ahead and all success!

    Prof Dr Jaya Kurhekar,
    Retired HOD, Department of Microbiology, Dr Patangrao Kadam Mahavidyalaya,
    Sangli

    ReplyDelete
  7. I wish Dr Vivek A. Rankhambe sir a very happy and wonderful birthday!
    Studying under sirs guidance was a blessing for me.

    And the article sums up it all. There could not be a better way to write about Rankhambe sir. Wonderfully written about a wonderful soul!

    Happy Birthday, sir.

    ReplyDelete
  8. I wish Dr Vivek A. Rankhambe sir a very happy and wonderful birthday!
    Studying under sirs guidance was a blessing for me.

    And the article sums up it all. There could not be a better way to write about Rankhambe sir. Wonderfully written about a wonderful soul!

    Happy Birthday, sir.

    Dr Aneela Tahilramani

    ReplyDelete
  9. खरोखर प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा घेतलेला सुंदर शब्दातील आढावा म्हणजे डॉ.केशव राजपुरे यांनी लिहिलेले हे लिखाण.डॉ.विवेक रणखांबे यांना सुवर्ण महोत्सवी वाढदिवसा निमित्त खुप गोड शुभेच्छा...

    ReplyDelete
  10. खरोखर प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा घेतलेला सुंदर शब्दातील आढावा म्हणजे डॉ.केशव राजपुरे यांनी लिहिलेले हे लिखाण.डॉ.विवेक रणखांबे यांना सुवर्ण महोत्सवी वाढदिवसा निमित्त खुप गोड शुभेच्छा...

    ReplyDelete
  11. लेख वाचल्यावर वाटलं की मित्र असावा तर असा.वेळीच सावरणारा,कधी कठोर तर कधी प्रेमळ मोठ्या भावासारखा सदैव पाठीशी राहणारा.आपला कोटचा प्रसंग खरंच हसवणारा आहे .कोणी कोणाच्या आयुष्यात उगाचच येत नाही त्यामागे काही कारण असते.मित्र म्हणजे जीवनाच्या वाटेवर भेटलेला कोहिनूर हिरा!मैत्री हे एक असं नातं आहे, अतिशय तरल असे हे नातं जपताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं ,तेव्हाच ते नातं'अनादि अनंताचं, नव्या अभिनव सृजनाचं होतं.'मित्र समोर नसला तरी एकत्र घालवलेले क्षण आठवले की चेहर्‍यावर थोडं हसू आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. जीवनात जसे आई -वडील, नातेवाईक, गुरू असणे महत्वाचे असते तसेच जीवाभावाचे मित्र भेटणे भाग्याची गोष्ट असते.तुमच्यातील ही मैत्रीरूपी असलेली नात्याची घट्ट वीण अशीच फुलत राहो.☺
    वंदना निंबाळकर कदम.

    ReplyDelete
  12. Keshav, you have expressed your inner feeling about your room partner Vivek very nicely. while reading i was visualizing SU campus & golden days. Thanks a lot & all my best wishes..

    ReplyDelete
  13. सर, रनखांबे सर हे माझ्या कीर्तन वर्गातील सहाध्यायी. तुम्ही त्यांच्या बाबतीत जे काही सांगितले त्यातील शब्द न शब्द मी अनुभवला आहे. प्रत्येक वेळी दुसऱ्याचं भलं चिंतन करणारा ही एक भली व्यक्ती. सर्व दुर्मीळ गुण त्यांच्या ठायी आहेत. 'जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती' किती आणि काय कौतुक करावं. ते शतायुषी होवोत, ही सदिच्छा व्यक्त करून विराम देतो.
    विद्याधर जोशी

    ReplyDelete
  14. अंतरंग व बाह्यरंग दोन्ही ही सुरेख असणारा तुझा मित्र-
    डॉ.विवेकानंद
    नावातच विवेक आणि विवेकानंद सामावलेले व्यक्तिमत्त्व. मित्र हे आपल्या आयुष्याला पैलू पाढणारे असतात. असाच हा मित्र तुझ्या आयुष्यात आला हा सुवर्ण कांचन योगच म्हणावा लागेल.
    मित्राच्या ऋणानुबंधनात रहाण्याचा खूप छान प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून केला आहेस. असा सुविचारी,संयमी आपल्या मित्राच्या हातात हात घालून पुढे नेणारा मित्र आयुष्यात लाभणे हा सुद्धा भाग्योदयच.
    डॉ. विवेकानंद यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...