Monday, October 9, 2017

​विज्ञानातील नोबेल पारितोषिकांची विलक्षणता

विज्ञानातील नोबेल पारितोषिकांची विलक्षणता

३ ऑक्टोबर २०१७  रोजी यावर्षीचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक रेनर वीस, किप एस. थॉर्ने आणि बॅरी सी. बरीश या शास्त्रज्ञांना संयुक्तपणे देण्याचे जाहीर झाले आहे. लेझर इंटरफेरॉमीटर ग्रेविटेशनल-वेव ऑब्झर्वेटरी (एलआयजीओ) प्रकल्पाचे नेतृत्व करत या तिघांनी गुरुत्वलहरींचा शोध लावला होता. त्या तिघांमध्ये ९० लाख-स्वीडिश-क्रोन (अंदाजे ७ कोटी २५ लाख रुपये) च्या बक्षीसाचे विभाजन होईल. कदाचित सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे तिघेजण त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी "२०१७ चे नोबेल पुरस्कार विजेते" म्हणून ओळखले जातील. पण एलआयजीओ प्रोजेक्टमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या​​ १३३ संशोधन संस्थांमधील जवळजवळ ११०० इतर शास्त्रज्ञांच्या बाबतीत काय ? या शास्त्रज्ञांची नावे पेपरच्या सुरवातीला न देता शेवटी नमूद केलेली आहेत (संदर्भ: Physical Review Letters 116 (2016) 061102) कारण त्यांची नावे देण्यासाठी लागली होती तीन पृष्ठांची दीर्घ सूची ! प्रश्न या महत्वाच्या मुलभूत शोधात कितीजण सहभागी आहेत याचा नसेलही कदाचित पण ज्या शोधामध्ये त्यातील अनेकांनी आपली पूर्ण आयुष्ये अर्पण केली त्यांच्या नावाची दखल घेतली जात नाही हे मात्र नक्की..

खगोलशास्त्रज्ञ मार्टिन रीस यांनी बीबीसी न्यूजला सांगितले की, "एलआयजीओ चे यश शेकडो संशोधकांना जाते." आणि पुढे म्हणाले "२०१७ च्या नोबेल पुरस्कार समितीने ग्रुप पुरस्कारांना नकार दिल्याने वारंवार समस्या उद्भवल्या आहेत आणि कित्येक विज्ञानाचे कार्य प्रत्यक्षात कसे केले असावे याविषयी भ्रामक ठसा दिला आहे." हे परावर्तन परिचित आहे. प्रत्येक वर्षी, जेव्हा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि फिजिओलॉजी किंवा मेडिसिन मध्ये नोबेल पुरस्कार दिले जातात, तेव्हा समीक्षकांच्या हे लक्षात येते की यामध्ये शास्त्रज्ञांना त्यांच्या कामाबद्दल ओळखण्याची एक बेजबाबदार आणि अनैसर्गिक पद्धत आहे. विज्ञानाचा सन्मान करण्याऐवजी, ते त्याचे स्वरूप विकृत करतात, त्याचा इतिहास पुन्हा लिहितात आणि अनेक महत्वाच्या योगदानकर्त्यांना दुर्लक्षीत करतात.

बक्षिसांबद्दल बोलायचे तर या खात्रीने चांगल्या गोष्टी आहेत. वैज्ञानिक शोध हे मानवी उपक्रमांमधले महत्त्वाचे भाग म्हणून ओळखले जावे. नोबेल पारितोषिकाची वेबसाइट ही एक शैक्षणिक खजिना आहे की जिथे प्रसिद्ध ऐतिहासिक तपशील भरभरून दिलेले आहेत की जे प्रकाशित पेपर्सपासून गायब आहेत. आणि वर्षानुवर्षे, एखाद्या घटनेबद्दल विज्ञानाला अशीच प्रकर्षाने वाट पाहवी लागते की जी सामान्यत: ऑस्कर किंवा एम्मी नॉमिनेशनसाठी राखीव असते, हे सगळं अगदी उपहासात्मक आहे. पण वैज्ञानिक नोबेलनी अगदी सुरुवातीपासूनच खोल-मुळांच्या समस्यांवर इशारा दिल्यापासून वाद निर्माण झाला आहे.

अँटिटॉक्सिनच्या शोधासाठी एमिल्स वॉन बेहरिंग यांना मेडिसिनमधील १९०१ चे पहिले नोबेल देण्यात आले परंतु त्यांचे जवळचे  सहकारी शिबासाबुरो किटासाटो यांना मात्र विचारात घेतले नाही. १९५२ साली मेडिसिन आणि फिजिओलॉजी चे नोबेल स्ट्रेप्टोमायसिन या प्रतिजैविकचा शोध घेण्यासाठी सेलमन वॉक्समन यांना देण्यात आले.  यावेळी वॉक्समनचे पदवीधर विद्यार्थी अल्बर्ट शाट्स, ज्यांनी प्रत्यक्षात हे रसायन शोधले, यांना दुर्लक्षीत केले. २००८ मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक ग्रीन फ्लूरोसन्ट प्रोटीन (जीएफपी) च्या शोधाकरिता तीन संशोधकांना देण्यात आले. तेव्हा सामान्यतः जीएफपी हा परमाणु इतर शास्त्रज्ञ आपल्या पेशींमधील हालचालीचे निरीक्षण करण्यासाठी वापरत. डग्लस प्राशर, की ज्याने जीएफपीसाठी जनुकांची प्रथम क्लोन केले, याचा त्या तीनात समावेश नव्हता.

जर त्यांनी आधीपासूनच मूळ नियमांना झुकवले असेल, तर आणखी पुढे का जाऊ नये?

काही प्रकरणांमध्ये स्वतःचे नाव वगळल्याबद्दल लोकांनी विरोध केला होता. २००३ मध्ये मॅग्नेटीक रेसॉनन्स इमॅजींगच्या शोधातील रे दामियायन यांना कमिटीने चुकीच्या पद्धतीने मेडिसिनमधील नोबेल पुरस्कारातून वगळले होते. मग त्यास विरोध करण्यासाठी रे दामियायन यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांत पूर्णपान भरून जाहिरातींची मालिका काढली होती. त्यावेळेस नोबेल समितीने फक्त पॉल लॅटरबर आणि पीटर मॅन्सफिल्ड यांचीच निवड केली होती. तेव्हा दामादियन यांना वगळणे ही  "लज्जास्पद चुक आहे आणि ती दुरुस्त व्हायलाच हवी" असा सूर निघाला होता. "सोमवारी सकाळी मी जागा झालो आणि माझ्या लक्षात आले की माझे नाव  इतिहासातून पुसून टाकले आहे याचे मला अतीव दु:ख होत आहे आणि ते घेवून मी जगूच शकत नाही" असे नंतर त्यांनी लॉस एंजेलिस टाइम्सला सांगितले.

प्रत्येक वर्षी वैज्ञानिक नोबेलच्या बक्षिसासाठी जास्तीत जास्त तीन पुरस्कार विजेते ठरवतात. त्यामुळे पारितोषिकासाठी कोणत्या तिघांना निवडावे ही एक विचित्र समस्या बनली आहे. इव्हान ऑरानस्की आणि अॅडम मार्कस यांनी स्टॅटमध्ये लिहिलेले आहे की आधुनिक विज्ञान हे "टीम स्पोर्ट्सचा टीमियेस्ट" आहे. होय, काहीवेळा संशोधक एकटाच शोध लावतो, परंतु हे दुर्मिळ आहे. अशामुळे जरी एका संशोधन गटामध्ये पोस्टडॉक्स्, विद्यार्थी आणि तंत्रज्ञांची एक तुकडी नाविन्यपूर्ण शोधामध्ये सहभागी असली तरी संपूर्ण शोधाचे श्रेय फक्त एका संशोधकास मिळते आणि बहुतेक वेळा अनेक ग्रुप एकाच प्रकल्पावर काम करतात. आणि फिजीकल रिव्हिव लेटर्स मधील ज्या शोधनिबंधाने एलआयजीओ टीमने आपला शोध जाहीर केला तीत तीन पानांची लेखक सूची आहे. आणखी एक अलीकडील शोधनिबंध, ज्याद्वारे हिग्ज बोसॉनच्या वस्तुमानाचा अचूक अंदाज वर्तवला होता, त्यामध्ये ५१५४ लेखक आहेत.

नोबेल पुरस्काराचे पाठीराखे -नोबेल कमिटी अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छापत्रात घालून दिलेल्या नियमांनुसार पुरस्कार प्रदान करते- असा सूर धरतात. तसं असल्यास नोबेल यांच्या इच्छापत्रानुसार हा पुरस्कार एक "व्यक्ती" -एकटा- ओळख पुरस्कार म्हणून ज्याने "मागील वर्षभरात" आपल्या संशोधन क्षेत्रात महत्वपूर्ण शोध लावला आहे त्यालाच दिला जावा असे म्हंटले आहे. याउलट नोबेल कमिटी या पुरस्काराची शिफारस जास्तीत जास्त तीन व्यक्तींपर्यंत दहा वर्षांपूर्वी लावलेल्या शोधासाठी करते. जर ते आधीपासूनच मूळ नियमांना झुकवत असतील, तर आणखी थोडं पुढ का जाऊ नये? २०१२ मध्ये सायंटिफिक अमेरिकनच्या संपादकांनी सुचविल्याप्रमाणे, शांततेच्या नोबेल पुरस्कारासारखेच वैज्ञानिक नोबेल पुरस्कार देखील टिम आणि संस्थांना का दिले जाऊ नये?

यामध्ये सुधारणा करायला कदाचित कमी किंमत चुकवावी लागेल पण हे टाळल्यामुळे नक्कीच जादा किंमत मोजावी लागत आहे. २०१३ साली आर्टूरो कॉसाडेव्हल आणि फेरिक फॅंग हे जीवशास्त्रज्ञ लिहितात की नोबेलने जरी एकमेव अलौकिक बुद्धिमत्तेची कल्पना मांडली असली तरी तत्त्ववेत्ते थॉमस कार्लाईल यांनी "जगाचा इतिहास म्हणजे महान पुरुषांचे चरित्र आहे" - असे याचे स्पष्टीकरण दिले होते.. नोबेल यांनी या अविज्ञाननिष्ठ आणि अपायकारक पुराण कथेस भरीस घालले आहे. असं केल्यामुळे कॅसॅदवेल आणि फॅंग म्हणतात, ते "विज्ञानातील एक सदोष बक्षीसप्रणाली मजबूत करतात ज्यात विजेता सर्वकाही घेतो आणि बऱ्याच लोकांच्या योगदानांकडे दुर्लक्ष करून त्यांना दुर्लक्षीत केले जाते." तसं बघीतलं तर, बक्षिसे शोधामध्ये कोणी महत्वाचे योगदान दिले याबद्दल नाहीतच मुळी, परंतु शैक्षणिक संस्थांच्या घातक घोटाळय़ांमधून सुखरूपपणे जो वाचला आहे त्याच्यासाठी आहेत असे वाटते.

आणि काही वेळेस नोबेल पुरस्काराविना हे जग सोडलेले सुद्धा अनेकजण आहेत कारण नोबेल फक्त हयात असणाऱ्यांनाच दिले जाते. नोबेल मरणोत्तर प्रदान करता येत नाही. म्हणून रॉसलीन फ्रॅंकलीन यांनी डीएनएची डबल हेलिकल रचना शोधूनही त्यांना नोबेल मिळाले नाही कारण त्या शोधास जेम्स वॉटसन, फ्रान्सिस क्रिक आणि मॉरिस विल्किन्स यांना नोबेल मिळण्यापूर्वी चार वर्षे त्या मरण पावल्या होत्या. खगोलशास्त्रज्ञ वेरा रुबिन यांनी आकाशगंगा कशा प्रकारे फिरतात याविषयी अभ्यास करून कृष्णविवरेंच्या अस्तित्वाचा पुरावा दिला होता की ज्या शोधामुळे विश्वाची संकल्पना समजण्याच्या कल्पनेत अमुलाग्र बदल झाला होता. ऑक्टोबर २०१६ मध्ये विज्ञान लेखक राचेल फेल्टमन म्हणाले होते की, "वेरा रुबिन नोबेलच्या हक्कदार आहेत, पण कदाचित ते त्यांना वेळेत मिळणार नाही". दोन महिन्यांनंतरच रूबिन यांचा मृत्यू झाला.

रुबिन आणि फ्रँकलिन यांनी नोबेलबद्दलची आणखी एक दीर्घकालीन समस्या मांडली. ते लिहितात "आम्हाला लक्षात ठेवायला हवे की विजेत्यांचे लोकसंख्याशास्त्र संरचनात्मक कल प्रतिबिंबित करतात आणि त्यांचा विस्तार करतात". जितके जास्त ते एकमेव अलौकिक बुद्धिमत्तेचा पुरावा देतात, तितकाच नेहमीच प्रतिभावान हे गोरे आणि पुरुषच असतात याचाही पुरावा देतात. फिजियोलॉजी किंवा मेडिसिनमध्ये आत्तापर्यंतच्या २१४ बक्षिसेंपैकी केवळ १२, रसायनशास्त्रातील १७५ पैकी ४ तर भौतिकशास्त्रातील २०४ पैकी फक्त २  महिलांनी नोबेल्स जिंकली आहेत. भौतिकशास्त्रातील महिला मारीया गोएपेर्ट मायर यांनी अगदी अलीकडे म्हणजे ५६ वर्षापूर्वी नोबेल पुरस्कार मिळवला आहे. हे संभाव्य सन्मानमूर्तींच्या कमतरतेमुळे नक्कीच नसावे. रब्बीन देखील एका नोबेलसाठी पात्र होते, तसेच  लुइस मायटनर ज्यांनी लौरेट ओटो हॅन यांच्यासोबत आण्विक विखंडनाचा शोध लावला होता यांचा देखील त्या नोबेलवर हक्क होता. १९३७ ते १९६५ दरम्यान मायटनर यांना वेगवेगळ्या लोकांद्वारे नोबेलसाठी ४८ वेळा नामांकन मिळाले होते परंतू दुर्दैवाने त्यांना ते कधीच मिळाले नाही.  "नोबेल पारितोषिके ह्या महान गोष्टी आहेत परंतु विजेत्यांचे लोकसंख्याशास्त्र संरचनात्मक कल प्रतिबिंबित करतात आणि त्यांचा विस्तार करतात- हे आपणास लक्षात ठेवायला हवे"- खगोलशास्त्रज्ञ केटी मॅक यांनी गेल्याचवर्षी ट्विटरवर सांगितले. 

कदाचित नोबेल इतका मोठा करार नसता तर यापैकी कशातही फारसा फरक पडला नसता. पारितोषिकांच्या आर्थिक मूल्यापलीकडे, पुरस्कार विजेत्यांना अक्षरशः किफायतशीर बोलणा-या प्रवाहांची हमी दिली जाते. त्यांच्या पेपर्सना अधिक उद्धरणे मिळतात. ते नामनिर्देशित झालेल्या लोकांपेक्षा एक दोन वर्षे जादा जगतात पण प्रत्यक्षात विजयी कधीच होत नाहीत. आणि नोबेल पुरस्कार त्यांना त्यांच्या महानतेच्या कायम छापासाठी प्रेरक म्हणून काम करतात. नोबेल पारितोषिक म्हणजे मॅकार्थरच्या प्रतिभेचे अनुदान नाही की जे "त्यांच्या कामात अपवादात्मक कृतिशीलता दर्शवितात" अशांनाच मिळते. ते एखाद्या विशिष्ट शोधाची ओळख म्हणून रहाते. आणि तरीही शोधक, स्वतःच्या अधिकारात, संशोधनातील ऐतिहासिक योगदान आणि आपले संपूर्ण कायमस्वरूपी विचार यात साधर्म्य निर्माण करणारे एक बौद्धिक शक्ती केंद्र म्हणून कायमचा ओळखला जातो.  

एखादा नोबेलवीर जेव्हा प्सूडोसायन्स किंवा हटवादाचा विजेता बनतो तेव्हा मात्र समस्या निर्माण होतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. ट्रान्सिजिस्टरचे जनक विल्यम शॉकली, ज्यांना ट्रान्सिजिस्टरच्या शोधाबद्दल १९५६ चे भौतीकशास्त्रातील नोबेल मिळाले होते, की जे पुढे युजिनिक्सचे प्रवर्तक बनले त्यांनी काय म्हणावे - "कमी बुद्धिमत्ता असलेले लोक-प्रामुख्याने आफ्रिकन अमेरिकन- यांचे निर्जंतुकीकरण करावे". दुसरे नोबेलवीर जेम्स वॉटसनचा यांचादेखील दावा आहे की आफ्रिकन लोक सरासरीपेक्षा कमी बुद्धिमान आहेत. कॅरी म्युलिस, ज्यांना डीएनएचे पिसीआर तंत्र, जे जगभरातील प्रत्येक जीवशास्त्र प्रयोगशाळेत वापरण्यात येते, विकसित केल्याबद्दल, १९९३ चे रसायनशास्त्रातील नोबेल मिळाले होते, ज्यांनी मानवनिर्मित हवामानातील बदल आणि एचआयव्ही आणि एड्स यांच्यातील दुवा नाकारला, डीसीएनच्या ज्योतिषशास्त्राचे मुखर प्रवर्तक बनले. त्यांनी एका आत्मचरित्रात लिहिले आहे की, त्यांना एकदा एक चमकदार रॅकून (उत्तर अमेरिकेत आढळणारा लांब शेपटीचा व अंगावर दाट केस असलेला मांसभक्षक प्राणी) सापडला जो कदाचित परदेशी नव्हता किंवा नसू शकेल.

निष्पक्षतेने बोलता, एखाद्या वर्षात किती शास्त्रज्ञांना नोबेलने पुरस्कृत करावे या समस्येप्रमाणे किती नोबेलवीर वाह्यात जातात हा प्रश्न कोणतीही नोबेल समिती सोडवू शकत नाही. नोबेल पारितोषिकाकडे वैज्ञानिक मूल्यांचे देव्हारेपण म्हणून पाहवे की नाही हे आपल्यावर आहे. तर ते तस् नाही, इतर बक्षीसांप्रमाणे हेदेखील दोषसहित आणि व्यक्तिपरक आहे. हे समजावून घेताना, नोबेलवीरांच्या अहंकाराचा आम्ही अतिरेक करतो आणि ज्यांना त्याने हुलकावणी दिली त्यांना आपण कमकुवत करतो. गेल्यावर्षी विज्ञान लेखक मैथ्यू फ्रान्सिस यांनी लिहिले: "शेवटी, नोबेल पारितोषिकांचा नाश करायाचा का ते सर्वस्वी आपल्यावर आहे. ते आपल्या विज्ञानाच्या समजीवर राज्य करीत आहेत आणि हे सारं आमच्या संमतीने कसे केले जाते, की ज्याविषयीची संमती आम्ही कधीच काढून घेतली आहे."

शब्दांकन: केशव राजपुरे 
The Absurdity of the Nobel Prizes in Science
- ED YONG OCT 3, 2017 

Thursday, September 14, 2017

ग्रुपअड्मीन

व्हाट्सएप ग्रुपअड्मीन : एक आव्हान

आपण एखाद्या  व्हाट्सएप ग्रुपचा अड्मीन असल्यास आपल्या भूमिकेचा विचार केला पाहिजे. व्हाट्सएप ग्रुपचाट आणि सोशल नेटवर्क साईट मध्ये अग्रेसर माध्यम आहे. त्यात ग्रुप अड्मीन फारच महत्वाचा घटक. तोच असा माणूस असतो की त्याला माणसे एकत्र यावीत असे वाटते. खरच त्याचा उद्देश हा प्रामाणिक असतो की चार टाळकी एकत्र आली तर काहीतरी समाजोपयोगी कार्य करता येईल. माणसांना एकत्र आणण्यासाठी हे एक महत्वाचे व्यासपीठ असतेच. तोच माणूस असतो की त्याच्या ग्रुप मधील सभासद चून चून के निवडतो. सुरुवातीला ही निवड करताना तसे कमी आडाखे किवा मापदंड असतात कारण सभासदांची संख्या मर्यादित असते. जस जसा ग्रुप फुगू लागतो तस तसा अड्मीन निवडक होतो.

सुविचारांची देवाण-घेवाण करणं, या ताणतणावयुक्त जगात ध्यान धारणा करणं तसेच स्वतःला व्यक्त करण्यासाठीच फार उपयुक्त माध्यम म्हणजे व्हाट्सएप आणि व्हाट्सएप ग्रुप्स ! कित्येक लेखक आणि कवी या गॅझेटमुळेच जन्माला आले आहेत ही फार मोठी जमेची बाजू आहे. नवोदितांसाठी खूप काही शिकण्याचं व्यासपीठ तर आहेच पण एक चांगलं व्यक्तीमत्व घडवण्यात या गॅझेटचा मोठा हातभार होवू शकतो !

सुरुवातीला सभासद निवडताना सभासदांची पार्श्वभूमी (शिक्षण, व्यवसाय, मित्रपरिवार इ) तेव्हढी महत्वाची वाटत नाही. याची निवड निव्वळ त्याच्या सोशल नेटवर्किंग साईट वरील सक्रीयतेवर केली जाते. त्याने आपल्या पोस्ट्सना दिलेल्या प्रतिक्रियेवरून त्याची एक मनात प्रतिमा तयार झालेली असते. त्या प्रतिक्रिया बनावट किंवा वास्तविक याचाही विचार तेव्हा नसतो. तो आपला पाठलाग करतो आणि आपण त्याचा. अलीकडे सदस्याबद्दलची माहिती त्याच्या फेसबुक प्रोफाइलवरून सत्यापित केली जाते. कोण जाणे दाखवायचा चेहरा खऱ्यापेक्षा वेगळाच निघाला तर !  नंतर समूहात सदस्यांची जोडणी दर कमी होतो. ग्रुप वास्तविक अर्थाने सक्रिय होतो. अड्मीनला आपण व्हाट्सएप ग्रुप च्या माध्यमातून करत असलेल्या कार्याचा अभिमान वाटायला लागतो.

शुभप्रभात / शुभरात्री चे संदेश, उत्सव, राष्ट्रीय सणांच्या शुभेच्छा, वाढदिवस साजरा करणे यासारख्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जाते. लोक एकत्र करून विचार एकत्र आणायची प्रक्रिया सुरू होते. मोठे सामाजिक समूह समाजसेवेच्या पाठीमागे लागतात. लोकांपेक्षा विचारांना एकत्र करणे नेहमीच अवघड असते.. दुर्दैवाने काहीतरी घटना घडते आणि संपूर्ण ग्रुपची परिस्थिती बदलते. त्या घटनेवर शेकडो लेख शेयर केले जातात. हजारो प्रतिक्रिया पाठवल्या जातात. तासंतास ग्रुपवर चर्चा चालते. यातून विचारांचे ध्रुवीकरण व्हायला लागते आणि विचारांपाठोपाठ माणसांचे ध्रुवीकरण ! ज्या सामाजिक उद्देशाने माणसे एकत्र आलेली असतात तो कधी बाजूला गेला तेच कळत नाही. कधीकधी जाती धर्मावर आधारित पक्षपाती ध्रुवीकरण होते त्याचे वाईट वाटते. माणसे मग सोयीस्कररीत्या विचार बदलतात. त्याची चर्चा ग्रुपवर. मनं विटतात इतक्या चर्चा ताणल्या जातात. बिच्चारा ग्रुपअड्मीन हे तटस्थपणे बघत असतो ! त्याला क्षणभर विचार पटतात, दुसऱ्याक्षणी पटत नाहीत. तळ्यात मळ्यात अशी परिस्थिती !

कधीकधी पोस्टच्या प्रकारावर वादविवाद होतात. काहीवेळा पोस्टची पुनरावृत्ती होते, काही न्यायप्रविष्ट तर काही धार्मिकता सांगणाऱ्या पोस्ट्स मुळे ग्रुपमध्ये वादविवाद सुरू होतात. ग्रुपअड्मीनला सभासदांच्या आक्षेपार्ह पोस्ट्ससाठी तुरुंगात टाकला जावू शकतो- हे वारंवार सांगितलेही जाते.  मग ग्रुप अड्मीन सर्व सभासदांना वैयक्तिक चर्चा न करता सबुरीने घ्यायचे जाहीर आवाहन वैगेरे करतो. काही सदस्यांनी अशा सूचना वैयक्तिक वाटू लागतात आणि ग्रुप अस्थिर व्हायला लागतो. त्याला माहीत असते की कोणाच्याही धार्मिक भावनांवर परिणाम करणारे कोणतेही विधान किंवा पोस्टस ग्रुपवर टाकणे गुन्हा आहे आणि असं काही घडल्यास आपण नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. अशा स्थितीत ग्रुप अड्मीन पोलिसांच्या रडारखाली येतो आणि सायबर गुन्हा कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि आयपीसी अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. अड्मीन ची परिस्थिती फारच विचित्र होते. त्याला आता हळू हळू वाटू लागते की हा ग्रुप तयार केला नसता तर बरा झाल असत वगैरे ..

मानवजातीच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या फायद्यासाठी तसेच विकासाठी अशा सुविधांचा उपयोग केला जाऊ शकतोय. लोकांना एकत्र आणून चर्चेस एक महत्वाचं व्यासपीठ तयार केल जाऊ शकतय. विचार बदलू शकतात. अशा ग्रुपद्वारे विचारांवर विचार करता येतात. एकीची शक्ती अन्यायाविरुद्ध लढा उभारण्यासाठी तसेच विधायक कार्य घडवून आणण्यास वापरता येते. वायफळ चर्चा, मतभेद, मतांचे ध्रुवीकरण, आंदोलने यामुळे ग्रुपविषयी आगडपाखाड न करता निराशा बाजूला ठेवायला पाहिजे या ग्रुप अड्मीननी. ग्रुपमध्ये मतैक्य राखण्यासाठी त्याच्या कौशल्यांचा उपयोग करायाला हवा. वेळी एकाद्यास समयसूचक शिक्षा का द्यायची होईना पण लोकहितासाठी अशा चागल्या उपक्रमांमध्ये बाधा येणार नाही हे त्यांनी बघावं. जश्या "व्यक्ती तितक्या प्रवृत्ती" तसंच जमाव नियंत्रित ठेवण ही सुद्धा एक कला आहे. ही ज्याला जमली तो खरा अड्मीन !

- प्रा. केशव राजपुरे 

Friday, September 8, 2017

एक प्राध्यापक विद्यार्थ्याच्या नजरेत पाहताना

एक प्राध्यापक विद्यार्थ्याच्या नजरेत पाहताना

आपल्या स्वप्नांना आकार देण्याचे खरे सार्मथ्य शिक्षणामध्ये आहे. उचित शिक्षण ज्ञाननिष्ठ आणि चारित्र्यनिष्ठ अशा आदर्श शिक्षकांमुळेच शक्य आहे. शिक्षणामुळे जीवन उन्नत, परिपूर्ण, सुसह्यदायी तर होतेच याबरोबरच वर्तनात परिवर्तन, कौशल्यविकास आणि जीवन जाणीव अधिक समंजसही व्हायला मदत करते. शिक्षण म्हणजे समजून घेणे, स्वतंत्र विचारांची कला, समाजसेवा, कमवा आणि शिका आणि चांगला मनुष्य बनणे ! बाल्यावस्थेत शिक्षण सहज शक्य वाटते. सुरुवातीला आपण प्रश्न विचारून स्वतःला शिक्षित करतो. जसजसे आपण शिक्षण प्रक्रियेतील शिडी चढत जातो तसतसे ते तुलनेने कठीण बनू लागते. मग आम्ही कप्यांमध्ये शिक्षण घेण्यास प्रारंभ करतो. सुरुवातीला भाषा, गणित आणि विज्ञान ! पुढे विषयांचा अभ्यास सुरू. नंतर आपल्याला हे लक्षात येते की कठीणता ही सापेक्ष आहे. कोणत्याही विषयाची अवघडता ही खरी समस्या नाहीच, समस्या आहे ती अशा दुर्मिळ शिक्षकांची कमी की जे हा विषय योग्य रीतीने समजावून शिकवतील. इथे लोक परीक्षेत उत्तीर्ण होतात आणि इतरांना परीक्षा उत्तीर्ण होण्यास शिकवितात आणि कुणालाच काही कळत नाही. शिक्षणाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक होण्याच्या दृष्टीने चांगले शिक्षक तयार व्हायला हवेत.

शिक्षकाने विद्यार्थ्याला ज्ञान चमच्याने भरवू नये तर ज्ञान घेण्यायोग्य बनवावे. जसे भुकेलेल्याला भाकरी न देता भाकरी कशी मिळवायची हे शिकवावे तसे. आठवा आपण प्रश्न विचारून शिक्षण घ्यायचं कधी थांबवलं ? किशोरवयात आमच्या प्रश्नांची प्रशंसा केली जाते. जसं जसं पुढ जातो तस-तसं आपल्या सर्व प्रश्नांची समाधानकार उत्तर मिळतं नाहीत. त्यांच्या अहंकारामुळे म्हणा किंवा अज्ञानामुळे असेल, पण हे होतं. मग आम्ही शिक्षण घेणे थांबवतो. प्रश्न विचारून शिक्षण प्रवास सुरू ठेवावा. उत्तरं मिळो आथवा ना मिळोत हे चिरंतन चालू राहावं. विचारांवर विचार व्हावा. नेहमी अभिनव कल्पनांमध्ये स्वत: ला गुंतवून घ्यावे.

जर आम्ही परदेशी शिक्षण व्यवस्थेचा संदर्भ घेतला तर व्याख्यानाच्या तासांच्या ६० मिनिटांमधील, शिक्षक फक्त २० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी बोलतो. बाकीच्या वेळी विद्यार्थी चर्चा करतात. नाविन्यपूर्णता, अद्भुतता, सध्याच्या गरजा, समस्या आणि उपाय यावर त्यांचे अभ्यासक्रम आधारीत असतात. संपूर्ण मूल्यमापन यंत्रणा पारदर्शी असते.

आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचा झाकाळून गेलेला भविष्यकाळ आणि विस्कटलेला वर्तमान यांना आकार देणारा शिक्षक केवळ अक्षर ओळख करून देणारा आणि चार गणिते, दोन कविता शिकविणारा नव्हे तर सामाजिक ऋणाची परतफेड करण्याच्या भूमिकेने कर्तबगार नवी पिढी घडविणारा साधक असायला हवा. शिक्षक विद्यार्थीनिष्ठ असावा, विद्यार्थी ज्ञाननिष्ठ असावा, ज्ञान समाजनिष्ठ असावे आणि समाज समतानिष्ठ असावा. अपार निष्ठेने आणि त्या निष्ठेला साजेश्या कौशल्यपूर्ण परीश्रमाने असामान्य यश प्राप्त करून भारताचे कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर व सुजान नागरिक घडवणारे अनेक आदर्श शिक्षक सभोवताली तयार होवोत अशी सर्वसाधारण विद्यार्थ्याची माफक अपेक्षा.. शिक्षणाकडे आणि शिक्षकांकडे पाहण्याचा शासन आणि समाजाचा दृष्टिकोन बदलायला हवा.

-डॉ केशव राजपुरे

Wednesday, July 19, 2017

अक्षय पात्र

अणुउर्जेचे 'अक्षय पात्र' विकसित:

स्वदेशी बनावटीचा पहिला ‘फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ विकसित करण्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. कल्पकम येथे उभी करण्यात आलेली ही अणुभट्टी प्रत्यक्ष कार्यरत होण्यासाठी सज्ज झाली आहे. या प्रकारच्या अणुभट्टीमध्ये वापरण्यात येणाऱ्या इंधनापेक्षा वीजनिर्मितीनंतर जास्त अणुइंधन तयार होते. त्यामुळेच अशा अणुभट्टीला ‘अक्षय पात्र’ अशी उपमा देण्यात आली असून, ती विकसित करणारा भारत हा रशियानंतरचा दुसरा देश ठरला आहे.

या अणुभट्टीमध्ये प्रक्रियांची साखळी सुरू करण्यासाठी न्यूट्रॉनचा वापर करण्यात येतो. पारंपरिक अणुभट्ट्यांच्या तुलनेमध्ये यातील न्यूट्रॉनचा वेग जास्त असल्यामुळे या अणुभट्टीला ‘फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ असे म्हणतात. कल्पकम येथील अणुभट्टीमध्ये थोरियमचे विशेष रॉड वापरण्यात आले आहेत. त्यामुळे या अणुभट्टीमध्ये यू-२३३ हे समस्थानिकही तयार होऊ शकते.

हे आपल्या शास्त्रज्ञ समुदायाचे दीर्घकालीन ध्येय होते. हे भौतिकशास्त्रातील मूलभूत संशो​​धनाचे निष्कर्ष आहेत. पुढे आपल्या अभियंत्यांनी त्यांची भूमिका निभावली आणि अनुऊर्जेपासून वीजनिर्मिती करण्यामध्ये आपण श्रेष्ठत्वाकडे वाटचाल करीत आहोत. स्वदेशी बनावटीचा पहिला 'फास्ट ब्रीडर रिअॅक्टर' विकसित करण्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. ती विकसित करणारा भारत हा रशियानंतरचा दुसरा देश आहे. आपणा सर्वास अभिमानास्पद अशीच गोष्ट आहे. आपले शास्त्रज्ञ आणि अभियंते खरच कौतुकास पात्र आहेत. अनेक वेळा असं होतं कमी माहितीमुळे आम्ही आमच्या प्रतिभेला कमी लेखतो. कमतरता यशासाठी कारण कसे बनते याचे हे उत्तम उदाहरण आहे. भारतात युरेनियमचे प्रमाण कमी आहे. भारतास साठे नसल्याने युरेनियमची आयात करावी लागते. तसेच भारत युरेनियमची आयात करू शकत नाही, किंबहुना प्रगत देश भारताची अणुउर्जेवरील संशोधनातील घोडदौड बघता आपणास निर्यात करीत नाहित. भविष्यातील ऊर्जेची गरज लक्षात घेता डॉ. होमी भाभा यांनी तीन टप्प्यांत आण्विक कार्यक्रम तयार केला होता. अणुऊर्जा कार्यक्रमातील तिसरा टप्पा थोरियमवर आधारित अणुभट्टय़ांच्या निर्मितीशी संबंधित आहे, यात थोरियम, युरेनियम -२३३ चक्राचा वापर केला जातो. थोरियम की जे भारतात मुबलक प्रमाणात आहे याचा वापर अणुभट्टीत इंधन म्हणून केला जातो. अणुऊर्जा आयोगाने उपलब्ध संसाधनांमधून सर्वोत्तम करण्याकरिता शास्त्रज्ञांना प्रोत्साहित केले त्याचेच हे फळ म्हणावे लागेल.

- केशव राजपुरे 

Saturday, June 10, 2017

आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक चंद्रकांत हरी भोसले

गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वरः, गुरुर साक्षात परम ब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः

आज (९ जुन २०१७) माझे प्रेरणास्त्रोत आदरणीय प्रा चंद्रकांत हरी (सी.एच.) भोसले सर की ज्यांनी माझ्यामध्ये संशोधन संस्कृती पेरली आणि विकसित केली त्यांचा शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील अधिकृत सेवेचा शेवटचा दिवस ! तसे सर विभागातील शिक्षक पदावरून ३१ मे २०१४ रोजीच सेवानिवृत्त झाले होते पण पुढे लगेच त्यांना मानाची युजीसी बीएसआर शिक्षक शिष्यवृत्ती मिळाली होती. या शिष्यवृत्तीच्या कार्यकालाचा आजचा शेवटचा दिवस ! या शिक्षकरूपी गुरूंनी माझ्या मनात ज्ञानाचा दिवा उजळवला आणि जीवनात प्रकाश निर्माण केला. माझ्या गुरुंविषयी कृतज्ञता मानण्याची चालून आलेली ही संधी ... ...

सरांचा जन्म सांगोला तालुक्यातील महूद या छोट्याश्या खेडेगावात १९५२ चा ! घरात आठराविश्वे दारिद्र्य ! सोलापूर हा तसा दुष्काळग्रस्त जिल्हा त्यामुळे या जिल्यातील मुलांना उदार निर्वाहासाठी अंगमेहनतीची कामे किंवा शिक्षणाशिवाय तरणोपाय नसायचा. सर घराची आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही अगदी जिकरीने १९७० ला अकरावी (जुनी एसएससी) प्रथम वर्गात पास झाले. पुढे १९७४ मध्ये गावानजीकचे शहर पंढरपूर येथील महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून बी.एस्सी. पदवी प्रथम वर्गात मिळवली. यादरम्यान मित्राच्या खोलीवर राहून आणि गावाकडून दिवसातून एकवेळसच येणाऱ्या जेवणावर उदरनिर्वाह केला. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी उच्च शिक्षणाचा ध्यास सोडला नाही.

त्या पुढील उच्च शिक्षण घ्यायचे तर पुणे किंवा कोल्हापूर येथे जावे लागणार होते. त्यांनी कोल्हापूरची  निवड केली कारण तेव्हा त्यांनी कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पावार यांनी सुरू केलेल्या कमवा आणि शिका या योजनेबद्दल ऐकले होते. ते येथे प्रवेश घेण्यासाठी आले आणि चौकशी केली असता असे समजले की या योजनेत प्रवेश हा मुलाखतीवर आधारित होता आणि या मुलाखती ४ दिवसांनंतर होत्या. दुर्दैवाने त्यांच्याकडे कोल्हापूरमध्ये ते ४ दिवस घालवण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. आणलेले पैसे दोन दिवस पुरले. उरलेले दोन दिवस उपाशी राहून आणि मैदानावर झोपुन काढले. कुलगुरु डॉ. आप्पासाहेब पवार आणि कुलसचिव डॉ. उषा इथापे मॅडम हे दोघे मुलाखती घेत होते. आदबीने सरांनी आत प्रवेश केला. त्यांच्या समोर बसण्यासाठी खुर्ची होती तरीही ते दोघांसमोर उभेच होते. काही वेळ दोघेही कागदावर लिहिण्यात मग्न होते, जेव्हा त्यांनी पुढे बघितले तर एक कृश झालेला मुलगा उभा दिसला. सरांनी दोन दिवस काहीही खाल्ले नव्हते तसेच अंगात थोडी कणकणही होती त्यामुळे ही अवस्था होती. कुलगुरु साहेबांनी सरांना विचारले की तू इतका कमजोर का झाला आहेस ? सरांनी उत्तर दिले "गेल्या दोन दिवसांपासून माझ्या पोटात काहीच नाही". एवढ्यावरच मुलाखत संपली आणि निवडलेल्या यादीत त्यांचे नाव होते आणि विशेष म्हणजे यानंतर लगेचच कार्यालयातील शिपाई त्यांना जेवण देण्याकरिता शोधत होता. शेवटी सरांना मिळाला होता हवा असलेला प्रवेश ! या बातमीने खऱ्या अर्थाने सरांचे पोट कायमचे भरले होते. जिद्द, चिकाटी, चौकस बुद्धी व अभ्यासू वृत्ती याचं फलीत म्हणजे त्यांनी १९७६ मध्ये भोतीकशास्त्र विभागातून एम.एस्सी. पदवीही प्रथम वर्गात मिळवली.
पुढे प्रश्न होता उच्च शिक्षण घेवून कायमस्वरुपी नोकरीचा! रयत शिक्षण संस्थेच्या रामानंदनगर येथील महाविद्यालयात सुरुवातीला हंगामी आणि नंतर कायमस्वरुपी नोकरी मिळाली. पुढे त्यांची कोपरगाव येथील महाविद्यालयात बदली झाली. त्यांनी महाविद्यालयातील प्रतिनियुक्ती घेऊन प्रा. एस.एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मानांकीत एम.फिल आणि पीएच्.डी. पदव्या प्राप्त केल्या. यामुळेच १९९२ ला ते शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. सरांना मी प्रथमत: जून १९९२ साली भेटलो होतो. त्यांनी आम्हाला भौतिकशास्त्रातील क्लासिकल मेकनिक्स सारखा अत्यंत अवघड विषय अगदी सोपा करून शिकवल्याचे ध्यानात आहे. सरांच्या व्याख्यानाचे अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे ते कोणतीही कठीण गोष्टी सांगून श्रोत्यांची लय घालवत नसत तर त्याच गोष्टी साध्या आणि समजायला सोप्या पद्धतीने सांगत आणि त्यांच्या मनात विषयाविषयी अधिक रस निर्माण करत. मला तर त्यांच्या शिकवण्याचा एक वेगळाच अनुभव आहे. त्यांच्याकडून शिकवलेला सर्व अभ्यासक्रम वर्गामध्येच पूर्णपणे समजला होता आणि विशेष म्हणजे परीक्षेवेळीअगदी थोड्याच वेळात उजळणी झाली होती आणि या विषयात मी वर्गात पहिला आलो होतो. तेव्हापासून एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांचा आमच्यावर पडलेला ठसा अद्याप कायम आहे. जुन १९९६ ला मी सरांच्याकडील डी.एस.टी. संशोधन प्रकल्पामध्ये काम करायला सुरुवात केली होती. संशोधनादरम्यान भोसले सरांनी मला एका वेगळ्याच वस्तुस्थितीची जाणिव करून दिलेली आठवते- ज्ञानाबरोबरच जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तरच तुम्ही जीवनात पाहिजे ती उंची गाठू शकता ! एक चांगला शिक्षक कसा असावा याचे धडे भोसले सरांनीच मला दिले. सर स्वतःच एक आदर्श शिक्षक असल्याने मी सरांची शिकवण्याची हातोटी आत्मसात केली होती. सरांच्या सहवासात आल्यावर त्यांचा एक स्वभाव कायम लक्षात राहीला तो असा: कोणत्याही गोष्टीवर सत्यापित झाल्याशिवाय विश्वास ठेवू नका. एखादी गोष्ट समोरच्याला अगदी त्याला समजेल अशा भाषेत सामजवावी ती सरांनीच ! शिवाजी विद्यापीठातील सध्याचा आमचा संशोधनचा स्तर निव्वळ आदरणीय भोसले सर व प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. मायकेल न्यूमन स्पेलार्ट यांच्या योगदानामुळेच आहे असे आम्ही मानतो.

ग्रामीण भागातील मुलांना जे संघर्षमय जीवन जगावे लागते त्याच प्रकारच्या अनुभवातून जाऊन भौतिकशास्त्रातील नामवंत प्राध्यपक तसेच आंतरर्राष्ट्रीय संशोधक अशी ख्याती सरांनी मिळवली, ही बाब सर्वांसाठी अभिमानस्पद आहे. ध्येयवादी वृत्ती आणि प्रबळ इच्छाशक्ती यांचा संगम झाला की, एखादी व्यक्ती कशी ध्येयप्राप्ती करू शकते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आमचे सर. आपण १९७४ -१९७६ दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या  "कमवा आणि शिका" योजनेतून शिक्षण घेऊन शिक्षणाला श्रमप्रतिष्ठेची आणि सुसंस्कारची जोड मिळाली की, व्यक्तिमत्व विकासाने झळाळून निघत, हा आदर्श समाजापुढे घालून दिलाच आहे.
आत्तापर्यंत त्यांचे एकूण २१५ शोध निबंध वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मासीकांत प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या प्रकाशनांना एकून ४४७४ उद्धरणे मिळाली असून त्यांचा एच निर्देशांक ३९ तर आय-१० निर्देशांक ११३ आहे. आत्तापर्यंत त्यांची चार पुस्तके प्रकाशीत झाली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण सव्वीस विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवी संपादन केलेली आहे. यातील काही विद्यार्थी पुढे अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया येथे उच्च शिक्षण घेत आहेत, तसेच इतर प्राध्यापकपदी तर काहीजण महाविद्यालयांचे प्राचार्य म्हणून काम करीत आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या सौजन्यातील सात प्रकल्प यशस्वीरित्या पुर्ण केले आहेत. ब-याच संशोधन मासिकांचे तसेच विद्यापीठांतील पीएच. डी. साठी ते परिक्षक आहेत. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या परिषदा आणि रिफ्रेशर कोर्सेसमध्ये १०० हून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांनी परदेशातील प्रयोगशाळांमध्ये संशोधन करण्यासाठी अमेरिका, झेक प्रजासत्ताक, इजिप्त, चीन, कॅनडाला भेटी दिल्या आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या शास्त्रज्ञांबरोबर पाणी शुद्धिकरणावर काम केले आहे आणि हे काम उत्कृष्ट मासिकांत प्रकाशित केले आहे. त्यांनी फ्लोरिडा सौर ऊर्जा केंद्र, यूएसए, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई आणि नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च (सीएनआरएस) फ्रान्स या शिखर संस्थांशी शिवाजी विद्यापीठाने केलेल्या सामंजस्य करार स्थापन करण्यात प्रमुख भूमिका बजावली आहे. ते २०१० ते २०१३ या काळात विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी १० कोटी किमतीची शास्त्रीय उपकरणे एकाच छताखाली असलेले भौतिकशास्त्र इंस्ट्रुमेंटेशन सुविधा केंद्र स्थापन केले. पदार्थविज्ञानातील भरीव संशोधनामुळे या कारकीर्दीतच विद्यापीठाच्या कॅंपसमध्ये भोतिकशास्त्र विभागाने सर्वोच्च स्थान पटकावले. मी व डॉ मोहोळकर, सरांचे पीएच. डी चे विद्यार्थी, आज याच भौतिकशास्त्र विभागामध्ये प्राध्यापक म्हणूक कार्यरत आहोत याचा सरांना सार्थ अभिमान वाटतो  याचे सर्व श्रेय सरांनाच जाते. 

शिवाजी विद्यापीठातील सरांचे अध्यापन तसेच संशोधन कार्य उल्लेखनीय आहे. सौरघट, इंधनघट व पाणी शूद्धीकरण या विषयावरील सरांचे संशोधन अद्वितीय आहे. त्यांच्या कार्याची पोहोच म्हणून महूद गावकर्‍यांनी त्यांना महूदभूषण हा गावचा सर्वोच्च नागरी बहूमान बहाल केला होता. सर शिवाजी विद्यापीठाचे गुणवंत शिक्षक पुरस्कार विजेते आहेतच तसेच महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्सच्या कार्यकारणी मंडळाचे सदस्यही आहेत या सर्वच गोष्टी आम्हाला अभीमानास्पद आहेत. नुकतेच ३० एप्रिल २०१७ रोजी मराठी विज्ञान परिषदेने मुंबई येथे त्यांना "विशेष मार्गदर्शक पुरस्कार" देवून गौरवले आहे. सर्वच विद्यार्थ्यांप्रती अतिशय आपुलकीने व प्रेमाने वागणार्‍या सरांविषयी काय लिहावे की ज्यांनी विद्यार्थ्यामध्ये पोहचले पाहिजे हा डॉ. आप्पासाहेब पवार यांचा विचार कृतीतून यशस्वीपणे उतरविला. सद्गुरू संत गाडगे महाराज तसेच डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांच्या प्रभावातून सरांच्या व्यक्तीमत्वाची जडणघडण होत गेली. आज भौतिकशास्त्र विषयाबद्दल मुलांमध्ये जागरुकता निर्माण करून या विषयाविषयीची भीती दूर करण्यासाठी अशा समर्पित शिक्षकांची नितांत गरज आहे.
जवळ जवळ ४० वर्षांच्या सेवेदरम्यान सरांनी असंख्य कुशल आणि सुसंस्कृत विद्यार्थी घडवले आहेत. केवळ पुस्तकी शिक्षण न देता चारित्र्य घडविणारे, मानसिक बळ वाढवणारे, बुद्धी विशाल करणारे आणि स्वावलंबी बनविणारे शिक्षण आम्हास दिले त्याबद्दल आम्ही सरांचे शतशः ऋणी आहोत. ज्ञानातूनच सर्वश्रेष्ट विकास साधता येतो, ही आपली शिकवण खरोखरच आम्हास वंदनीय आहे. आज आपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मला खूप धन्यता वाटते. सर नेहमी आम्हाला प्रोत्साहन, समर्थन आणि लाख मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत आम्ही सरांचे सदैव ऋणी राहू .. आपणासारख्या आदर्श व्यक्तीमत्वापुढे आमचे कोटी कोटी प्रणाम. ह्याच भावना सरांच्या असंख्य विद्यार्थ्यांच्या मनात आहेत व असतील, मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात त्यातील काही इथे मांडण्याचा प्रयत्न केलाय. सर, सर्व प्रकारच्या शुभाशिर्वादाचा आपणावर सदैव वर्षाव होत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना ! कर्तव्याच्या मोजमापावर, आज खर उतरुन, नव्या पाऊलवाटेवर तुम्ही केवळ सेवेतून निवृत्त होताय, आमच्या मनातून नाही, आमच्या शुभेच्छा सदैव, आपल्या सोबत आहेत .

प्रा (डॉ.) केशव राजपुरे
मोबाईल: ९६०४२५०००६

अदृश्य शक्ती

पांडूरंगा 

देव अदृश्य शक्ती आहे. विज्ञानाने एव्हढी क्रांती घडवूनसुद्धा मानवजात त्याच्या शक्तीचा अभाव सिद्ध करू शकत नाही. याबाबत प्रत्येकाच्या सापेक्ष संकल्पना ! असं मानलं जातं - देव हा भक्ताच्या भक्तीला भुकेला असतो. देवाला प्रसन्न करण्यासाठी माणूस हा भक्तीत वेढा होतो. 

त्यामुळे प्रश्न येतो: जर या अदृश्य शक्तीस आतापर्यंत कोणीही पाहिलेले नाही, तर मग या आभासी गोष्टीच्या मागे न लागता प्रतीकात्मक माणूसकीरुपी देवाला का शोधले जात नाही ? देव हा माणसामध्येच आहे, त्याच्या सत्कर्मात आहे, त्याच्या माणूसकीमध्ये आहे हे का सर्वमान्य होत नाही ? या २१ व्या शतकातदेखील सर्वचजण त्या काल्पनिक यश आणि सुखाच्यामागे धावत आहेत की जे त्यांना कधीही सापडणार नाही. थोडेसे प्रयत्न केल्यानंतर, प्रत्येकजण यशाचा आणि पर्यायाने सुखासाठीचा शॉर्टकट शोधतो, जो त्यांच्या चंचल मनाला सापडत नाही. मग तो त्यासाठी निष्क्रिय प्रयत्न सुरू करतो. तो समाजातील शिकलेल्या, जगाकडे भिन्न दृष्टीने बघणाऱ्या, व्यक्तीला भेटतो, ज्याने मानवी मानसशास्त्रचा यथासांग अभ्यास केला आहे. त्याच्याकडे समोरच्यापेक्षा एखादी गोष्ट चांगल्या रीतीने स्पष्ट करण्याची कला असते. मग तो या माणसाचा दास बनतो कारण याची अशी धारणा असते की हाच मनुष्य मला परमेश्वराकडे घेवून जाणार. तो या मानसिकतेचा फायदा घेतो आणि आपला उद्देश सफल करतो. त्यांना असे वाटते की जर आपण या व्यक्तीला पैसे, सोने किंवा वस्तू दान केले तर ते देवाला अर्पण करण्यासारखे आहे. देव खुश होवून आपल्याला लवकर सुखी करेल. त्यामुळे देवदेर्शनाचा मार्ग म्हणजे एक व्यवसाय झाला आहे. ज्यांचा उद्देशच वाम आहे त्यांच्याकडून वाममार्ग, क्रूर​​कर्म अपेक्षितच ! हे सर्व आपण आपल्या स्वत:च्या विचाराने करतो.  जे काही थोडे सुख प्राप्त होते ते त्याच्यात श्रद्धेमुळे वाढलेल्या आत्मविश्वासाने, बाबाच्या योगदानामुळे नव्हे. शेवटी फसगत होते. 

माणूस किती स्वार्थी आहे बघा ना ? आपण खर्चीलेल्या पैशात परतीची अपेक्षा करतो. आपण मदतरुपी केलेल्या खर्चामुळे ही मानवजात टिकणार आहे याचा अजिबात विचार करत नाही. त्यामुळे गोर-गरीब, गरजू, ना ते मदत कशाला करतील ? 

जरी आपल्या मताप्रमाणे इच्छेप्रमाणे निसर्गाची चक्रे फिरत नसली तरी तो प्रारब्धाचा खेळ आहे, असे समजून प्रत्येकाने आनंदी राहवे . आनंदी नसताना जीवनाची पाऊले टाकत राहिल्यास प्रकृतीचे फारच नुकसान होते. काळजी घ्या ... 

- केशव

Wednesday, May 31, 2017

मायकल न्यूमन स्पेलार्ट

प्राध्यापक मायकेल न्यूमन-स्पेलार्ट: एक प्रतिभावान सज्जन शास्त्रज्ञ

माझे पिएचडी चे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक भोसले सरांच्यामुळे १९९८ साली रसायनशास्त्राचे संशोधक प्रा महेश्वर शेरॉन यांच्या आयआयटी मुंबई येथील प्रयोगशाळेत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यादरम्यान फ्रांसच्या सीएनआरएस प्रयोगशाळेतील ख्यातनाम शास्त्रज्ञ प्राध्यापक मायकेल न्यूमन-स्पेलार्ट हेही शेरॉन सरांच्या भारत-फ्रेंच सहकार्य करारांतर्गतील प्रकल्पाचे काम करण्यासाठी तिथे आले होते. माझ्या त्या पदवी सादर करण्याच्या टप्प्यात भोसले सरांनी मला माझा प्रबंध प्रा मायकेल यांचेकडून तपासून घ्यायला सुचवले होते. सुरुवातीला मी जरा भयभीत झालो होतो. नंतर त्यांना सामोरं जायचं आव्हान स्वीकारलं. पण यामुळे मला त्यांच्याबरोबर संशोधन काम करण्याची नामी संधी मिळाली होती. तेव्हा मी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यक्तिमत्वाबरोबर प्रथमच काम करत होतो. मी त्यांच्या सवयी आणि शिस्तबद्ध काम करण्याच्या पद्धतीमुळे फार प्रभावित झालो. सुरुवातीला आम्ही कमी संवाद साधत असू मग ओळख वाढल्यावर बराच वेळ बोलत असू. त्यांनी प्रबंध सादर करण्यापूर्वी मला अनेक उपयुक्त सूचना दिल्या होत्या त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी आहे.. 

ते रसायनशास्त्र विषयातील पदवीधर असून याच विषयात त्यांनी पीएचडी ही पदवी मिळवली आहे. मी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू पाहिले. त्यांच्यासारखा प्रामाणिक,परिपूर्ण आणि प्रतिभावान शास्त्रज्ञ अजून पाहीलेला नाही. त्यांच्याविषयी एकच वाक्य सांगता येईल "थोर नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ जसे व्यक्तीमत्व". इतर शास्त्रज्ञ आणि मायकेल यातील एक मुलभूत फरक म्हणजे त्यांची समांतर संशोधन काम न करण्याची वृत्ती आणि नाविन्यपूर्ण विचार करण्याची क्षमता  !  संशोधनात नाविन्यता आणायची सवय आम्हास त्यांनी लावली. त्यांच्या स्वभावातील वैशिष्ट्य म्हणजे संशोधनातील अगदी नगण्य तपशीलालाही ते फार महत्व देतात. संशोधन कामातील दोष लगेच ओळखणे त्यांना का शक्य आहे हे यावरून सहज समजते. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा शास्त्रज्ञ म्हणजे त्याच्या राहणीमानाविषयीच्या आपल्या काही कल्पना असतील. पण त्यांची राहणी अगदी साधी, मर्यादित गरजा, विद्यमान गोष्टीत आनंदी राहण्याची आश्चर्यकारक वृत्ती मला फार भावली .. खरं पाहता मायकेल सरांमुळेच माझ्यात संशोधन संस्कृती विकसित झाली. शिवाजी विद्यापीठातील सध्याचा आमचा संशोधनचा स्तर निव्वळ त्यांचे योगदानामुळेच आहे असे आम्ही मानतो. संशोधनाबरोबर त्यांच्यात खोलवर रुजलेली माणुसकी मला तेव्हा सापडली. मायकल अतिशय विनयशील आणि सभ्य गृहस्थ आहेत.

त्यापुढच्या वर्षी आम्ही कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या एका परिषदेला त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. तेव्हापासून ते शिवाजी विद्यापीठातील आमच्या प्रयोगशाळेस दरवर्षी भेट देत आहेत. सुरुवातीला त्यांनी आमच्या प्रयोगशाळेतील मूलभूत सोयी वाढवण्यावर भर दिला. या भेटींचे फलस्वरूप म्हणजे आम्ही नाविन्यपूर्ण कल्पनावर आधारित नवनवीन प्रकल्प प्रस्ताव तयार केले. आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्य आणि समर्थ मार्गदर्शनाखाली संशोधन प्रशिक्षण घेता आले. अप्रत्यक्षपणे तेव्हा ते नवीन पायाभूत संशोधन सुविधा विकसित करण्यात आमच्या ग्रुपला मदत करत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेले आमचे विद्यार्थी आता परदेशातील प्रख्यात प्रयोगशाळात काम करत आहेत. मी शिवाजी विद्यापीठात शिक्षक झाल्यावर मायकेल यांनी आपल्या पॅरिस येथील संस्थेत मला पोस्ट डॉक शिष्यवृत्ती देऊ केली आणि १ सप्टेंबर १९९९ ला रुजू व्हायला सांगितले होते. 

२००० सालापर्यंत पर्यंत आम्ही भौतिकशास्त्र विभागाचे विद्यार्थी एक्सआरडी चे आलेख ट्रेस पेपर वापरून काढत असू.. प्रा मायकेल यांनी एक्सआरडीच्या डेटा फाइल चे रूपांतर आमच्या सोयीच्या स्वरूपात करण्यासाठी एक संगणक प्रोग्राम लिहिला होता. त्यानंतर आम्ही हा सोफ्ट डेटा वापरूनच एक्सआरडी आलेख काढत आहोत. त्यांनी कोणत्याही संगणकीय दस्तऐवजला फाइलनेम देण्यासंदर्भातील मार्गदर्शन मला केले आहे. ते काय नाहीत हा नेहमी एक प्रश्न पडतो: ते सर्वोत्तम रसायनशास्त्रज्ञ आहेत. त्याना भौतिकशास्त्र फार चांगले माहीत आहे. ते एक संगणकतज्ज्ञ आहे. ते सध्या पदार्थविज्ञान क्षेत्रात संशोधन करतात आणि एक महान तत्त्वज्ञ देखील आहेत. मला भेटलेलं महान अष्टपैलू व्यक्तीमत्व !
त्यांनी केवळ आमच्या तरुण पिढीला प्रशिक्षणच दिले नाही तर त्यांच्या फ्रांसमधील प्रयोगशाळेत संशोधन शिष्यवृत्त्या देवून नवीन व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. डॉ नानासाहेब गायकवाड, डॉ शिवाजी सादळे, डॉ प्रवीण शिंदे, डॉ संभाजी शिंदे, डॉ सावंता माळी, डॉ रामचंद्र सपकाळ, डॉ महादेव महाडिक, श्री संतोष मोहिते हे आहेत त्यांच्या सानिध्यात घडलेले आमचे काही विद्यार्थी ! नंतर आम्ही त्यांच्या संशोधन संस्थेशी सामज्यस्य करार स्थापन केला. आम्ही काही संशोधन पेपर्स एकत्रित प्रकाशित केले आहेत. आमच्या प्रयोगशाळेत पाणी शुध्दीकरणावर जे काम सुरू आहे त्यामध्ये त्यांचे खूप मोलाचे योगदान आहे. तसं पहायला गेलं तर आमची एकत्रित काही मोजकीच संशोधन प्रकाशने आहेत त्याच मुख्य कारण म्हणजे ते स्वत: शोध निबंधांच्या संख्येपेक्षा गुणवत्तेला जास्त महत्व देतात. त्यामुळे ते क्वचितच संशोधन पेपर लिहितात .. पण ते जेव्हा लिहितात तेव्हा मात्र अगदी अंत:करणापासुन ! कोणताही पेपर लिहायला सुरुवात केल्यापासून संपादकांना सादर करण्यासाठी त्यांना फार वेळ लागतो कारण त्यागोदर ते किमान ५ ते ६ आवृत्त्या तपासतात. सर्व आवृत्त्या संचित करायची मला रुचलेली त्यांची एक महान सवय आहे. आत्तापर्यंत त्यांचे एकूण ७६ शोधनिबंध उत्कृष्ट वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये काही रिव्हिव्ह आर्टीकल चा देखील समावेश आहे. मुख्यत: त्यांचे संशोधन क्षेत्र हे थिन फिल्म्स सेमीकंडक्टर असून ते सध्या प्लानर फोटोइलेक्ट्रोकेमिकल सेल, पि टाईप सेमीकंडक्टर, थ्री डायमेनशनल प्रिंटेड कंडक्टीविटी सेल तसेच फोटोइलेक्ट्रोकटालेसीस या क्षेत्रातही संशोधन करीत आहेत. माइकल यांची आणखी एक उल्लेखनीय सवय म्हणजे ते अजूनही एक विद्यार्थीदशा जगत आहेत. अधिकारपणाची सवय त्यांना कदापी स्पर्श करणार नाही. नाहीतर आमच्या देशात अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारेच अधिक मिळतील. 
ते २५ ते ३१ जानेवारी २०१७ अखेर आमच्या सोबत निमंत्रित अतिथी शास्त्रज्ञ म्हणून काम करीत आहेत. मायकेल मुळचे ऑस्ट्रिया देशातील ! त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्याची पत्नी ऑस्ट्रियामध्येच सर्विस करते. सर्विस च्या निम्मित्ताने फ्रांसमध्ये आणि संशोधनाच्या निम्मित्ताने भारतात ! त्यांची ही  भारतभेट नेहमी नि:स्वार्थी हेतूची असते. त्यांच्या शैक्षणिक भेटीचे आम्ही मात्र पूर्णपणे लाभार्थी आहोत. सर नेहमी आम्हाला प्रोत्साहन, समर्थन आणि लाख मोलाचे मार्गदर्शन देत आहात आम्ही आपले सदैव ऋणी आहोत. दरवर्षीच्या त्यांच्या इथल्या वास्त्याव्यातील २ आठवडे म्हणजे आमच्या ग्रुपसाठी फार मोठा कृपाशीर्वाद असतो.

____________________________________________

Professor Michael Neumann-Spallart: a talented gentleman scientist

Due to my esteemed professor CH Bhosale, I had an opportunity to work in the Prof. Maheshwar Sharon's laboratory in chemistry department at IIT Mumbai in 1998. Professor Michael Neumann-Spallart, from CNRS France, was there in Sharon's laboratory to work on the Indo-French project. As I was in the PhD submission phase then, Prof Bhosale suggested me to get checked my thesis from Prof. Michael. In the beginning I was a bit afraid. Then I accepted the challenge to go and face this towering personality. But I had this opportunity to work with such a renowned researcher then. It was first time for me to work with the internationally known personality. I was very much impressed with his work habits and sincerity. Initially, we talked a little and then for a long after increased recognition. He had many helpful suggestions about what I presented in thesis and I am very much indebted to him forever ..

He is a graduate in chemistry and has gained the title of PhD in the same subject. I saw various aspects of his personality. I have not yet seen honest, perfect and talented scientist like him. In one sentence, "He is been the great personality like laureate". A fundamental difference between other scientists and Michael is the ability to think and his innovative attitude! He created a habit in us to bring innovation in research. He never neglects even minute details in research, which helps him detect the errors immediately. You may mistake him for his international scientist’s class. He prefers simple life, his modest needs and his happiness in existing things is most appreciable. In fact, I had developed a culture of research from Michael. We believe that our current research level at the Shivaji University is his net contributions. In addition to his research approach, I found deeply rooted humanity in him. Michael is very polite and gentleman.

In 1999 we invited him as the chief guest at a conference held at Shivaji University Kolhapur. Since then, every year he is visiting our laboratory without a break. Initially, he stressed on increasing the basic facilities in our lab. His encouragement and support helped us to write the research project proposals on innovative ideas. Our students are able to get appropriate training and intelligent guidance from him. Then he was indirectly helping our group to develop new research infrastructure facilities. Our students trained under him are now working in the renowned overseas laboratories. After becoming teacher at Shivaji University, I was offered post doc scholarship to work at his institute in Paris by Michael and the date of joining was 1 September 1999. Due to some technical reasons I could not en-cash the opportunity. So my fellow researchers recommended by Prof Bhosale took this scholarship. Now I am waiting for such new offer.

Until 2000, the research students of physics department were using tracing technique to draw XRD graphs. Prof. Michael had written a computer program to convert the XRD data file into the convenient format. Since then everybody using the soft data for graphing the XRD plots. He suggested us to use standard graph plotting software for graphs based on research work. I remember he has guided me in regards with any computer document filename. This is always a question what he is: he is the best Chemist. He knows Physics very well. He is a Computer expert. He is been a great philosopher and his current research is in the field of Materials Science. Great all-round personality, I ever met !

He not only trained our students for doing good quality research but created platform for them to work at his laboratory also in France under research scholarships. Dr. Nanasaheb Gaikwad, Dr Shivaji Sadale, Dr. Pravin Shinde, Dr. Sambhaji Shinde, Dr. Sawant Mail, Dr. Ramchandra Sapkal, Dr. Mahadev Mahadik, Shri Santosh Mohite are some fellow students who got benefited from him. Further tie up between Shivaji university and his research organizations was established. We have published few collaborative research papers. The work on water purification being carried out in our laboratory is mostly due to his valuable contribution. As he gives more importance to quality than the quantity, there are modest number of publications to his credit. He rarely writes research paper.. But when he writes, he writes honestly and painstakingly! It takes him a long time to submit any paper to editors since before that he checks at least 5 to 6 versions. He has a great habit of storing each a every version of the research paper. So far a total of 76 excellent papers were published in prominent international journals. It also includes few review articles. He works in the research area of semiconductor thin films. But presently in addition, he has created an interest in planner photoelectrochemical cells, p type semiconductors, 3D printed conductivity cells and photoelectrocatalysis research fields. And a remarkable habit of Michael is that still he lives student’s life. Authority habit will not touch him at all. 

He is working as an invited scientist with us during 25 to 31 January 2017. Michael originally belongs to Austria country! He has a son and a daughter. His wife serves in Austria. He is in France for the sake of service and he comes India for doing research ! His visit to our laboratory is always free of selfish motives. However, we are his full academic beneficiary. He always provides valuable guidance to encourage us and we are grateful for his support a million times. We are always blessed to have his yearly 2 weeks of stay here.

Saturday, May 6, 2017

सुखाची व्याख्या

हे माझे प्रवास वर्णन आणि त्या अनुषंगाने आलेले मनातील विचार दिनांक १५.०५.२०१७ रोजी माझ्या मूळगावाहून येतानाचे आहेत.

अलिकडेच माझ्या मुळगावी बावधनला गेलो होतो. एका दिवसाची धावती भेट होती. संध्याकाळी कोल्हापूरला परत येत असताना पाचवड मध्ये एका आराम बस मध्ये बसलो. माझ्या बरोबर १५ ते २० वयोगटातील आठ ते दहा तरुणही चढले. योगायोगाने त्यांनाही कोल्हापुरलाच यायचे होते. अंगात टी शर्ट, स्पोर्ट ची विजार, स्पोर्ट शूज व पाठीवर पिशवी ! त्यांच्या पेहराव्यावरून व चर्चेवरून कदाचित ते लष्करातील मुलाखती साठी जात असावेत हे लक्षात आले. या मुलाखाती विद्यापीठाच्या आवारातच असल्याने माझ्या लक्षात आले कि आम्हाला एकाच परिसरात जायचे आहे. कारण गेले २ आठवडे झाले सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्यातील उमेदवारांच्या तालुकावार मुलाखती होत आहेत हे मी पहात होतो. माझ्या हेही लक्षात आले की कदाचित आज सातारा जिल्यातील वाई किंवा जावली तालुक्यातील उमेदवारांच्या मुलाखतीची तारीख असावी.

बस वाहक त्याना गाडीच्या पाठीमागच्या सिट वर बसवून पुढे केबीन मध्ये गेला. थोड्या वेळाने जरा अंदाज आल्यावर या घोळक्याने आपापसात गमंत करायला सुरुवात केली. त्यामध्ये अगदी टारगट भाषेत टीप्पणी हे तर आलेच. तरी बरं हे सगळे एका गावाची नव्हती ! एकूणच, त्यांचे हे प्रकार एक प्राध्यापक म्हणून मला अजिबात रुचले नाहीत. थोडा अस्वस्थ झालोही. पण काय करणार ? या पिढीला जरा बोललं तर ते आऊ चा बाऊ करून गोंधळ घालतील हि भीती. तसेच हा प्रकार सार्वजनिक ठिकाणी चालू होता, माझ्या नोकरीच्या ठिकाणी नव्हता. बरं हा प्रकार एव्हढ्या मोठ्याने चालला होता कि कुणीही सुजाण अस्वस्थ होईलच. टारगट मुलांच्या धिंगाण्यामुळे इतर प्रवासीही वैतागले. काही तरुणी व महिलाही आमच्याबरोबर प्रवास करत होत्या. विशेष म्हणजे त्याना कुणाचेच भय वाटत नव्हते. त्यात आराम बस राजस्थान परवान्याची त्यामुळे महाराष्ट्रात ते कशाला पंगा घेतील. ते अगदी गप गुमान !  वाटलं, हि पुढं लष्करात जावून काय देशसेवा करणार ? मनाशी म्हंटलं असू देत कि २ तासांचा तर प्रश्न आहे.

या वेळी थोडा शांत विचार केला व म्हंटलं आपणही या मुलांच्या वयाच्या टप्प्यातून कधीतरी गेलो आहेच की ! मला यांचं हे वागणं का पटत नाही ? हे वागतायत ते बरोबर की चूक. आठवलं तो माझ्या कॉलेज जीवनातील असाच एक प्रसंग !

मी तेव्हा लोणंद महाविद्यालयात द्वितीय (१९९०) वर्षात असावा. तेव्हा मी खंडाळ्याहून महाविद्यालयात ये जा करी. सकाळची खंडाळा ते लोणंद ही बस आम्हा कॉलेज तरुणांनी भरायची.  बस मध्ये आमच्या संचातील ८ ते १० मित्र मंडळी जवळजवळच्या ३ -४ बाकड्यावर बसलो होतो. सर्वजण विनोद, चुटकुले सांगण्यात रममाण झालो होतो. आम्हाला आमच्या आसपास कोण बसले आहे याचेही भान नव्हते. अगदी दिलखुलास गप्पा व विनोद सांगणं चालू होतं. टाळया, हश्या, दाद, हे इकत्र चालू होतं. अगदी हुबेहूब वर सांगितलेल्या मुलाखाती द्यायला निघालेल्या तरुणाप्रमाण ! अगदी देहभान विसरून हा प्रकार चालला होता.  आमच्याबरोबर प्रवास करणाऱ्या इतर प्रवाश्यांची पर्वा ती का करावी अशी अवस्था ! आम्ही काहीच चूक करतं नाही ही भावना ! जीवनाच्या प्रत्येक अमूल्य क्षणांचा मनसोक्त उपभोग घेणं चालू होतं ! आता जरी ते प्रसंग आठवले तर अंगावर शहारे येतात. तेवढ्यात एक वयोवृध्द गृहस्थ आमच्याजवळ आले व आम्हाला म्हंटले- पोरांनू जरा हळू ... .... .... मला विचारले - मला ओळखलं का ? माझ्या परिचयाचे हे आजोबा मला का आठवत नव्हते हे समजेना... ..... .... ते म्हणाले - बरं असू देत, काय म्हणतय तुझं शिक्षण ? दहावीला पहिला आल्यावर आम्ही बैलगाडीत मिरवणूक काढून तुझा सत्कार केला हुता तवापास्न आत्ताच तुला बघतुया... दादाच बरं चाललयं ना ? - मग मात्र मी खजील झालो, चेहरा रडवेला झाला ... आपण त्याना त्रास होईल एव्हढा दंगा करायला नको होता, किंवा मौज करायची ती जागा योग्य नव्हती....  गप्प झालो, त्यांच्या पाया पडलो ...... ..... .... सगळे मित्र माझी टर उडवायला लागली ... ...  अरे काय मनावर घेतो आहेस.... सोडून दे.... मी मात्र सोडून द्यायला तयार नव्हतो... आनद लुटायला पाहिजे पण आपण कुठे काय करतोय याच भान नक्कीच पाहिजे...

कदाचित बस मध्ये आम्ही व मुलाखाती द्यायला चाललेले हे तरुण सुखाचा पूर्ण आस्वाद घेत होतो. हे व असे अनेक प्रसंग असतात कि ज्यातून आपण अगदी देहभान विसरून मनमुराद आनंद लुटत असतो. काय ते जीवन होते. आता आठवलं तरी हेवा वाटतो त्या क्षणांचा ! ताण तणाव विरहीत आयुष्य म्हणजे तरी वेगळं काय असू शकतं. त्यांच्या चेहऱ्यावर दडपण वा इतरांची भीती या कशाचाही लवलेश दिसत नव्हता. मौज मजा म्हणजेच जीवन हे जणू त्यांचा वर्तमान वाटत होता ! हळूहळू मला त्यांच्या सर्व हालचाली हव्याहव्याश्या वाटू लागल्या. क्षणभर असही वाटलं कि आपणही त्यांच्यासोबत दंगा मस्ती करावी. किंचाळाव, मजा करावी !  पण लगेच भानावर आलो, मी शिक्षक, मी हे करू शकत नाही किंबहुना करू नये. का करू नये हा प्रश्न वेगळा आहे. काही वेळापुर्वी ज्यांचा राग आला होता, हेवा वाटायला लागला त्यांचा ! का कुणास ठाऊक मनात कुठतरी आपणही थोड्या वेळासाठी लहान व्हावं वाटलं. क्षणभर आपला संसार, जबाबदाऱ्या, पद, प्रतिष्ठा या सर्व गोष्ठी बाजूला ठेवून मुक्तपणे स्वताला व्यक्त करावं असं वाटलं. पंचेचाळीशीत हे करूशी वाटणं म्हणजेच आपल्याला काही गोष्ठीतून दररोज थोडा वेळ तरी मुक्तता हवी. पण १९९० चा बस मधील प्रकार आठवला व गप्प बसलो ... राहिलं ....

आजकाल -सुख म्हणजे नक्की काय? - हा प्रश्न मला सारखा पडतोय. प्रत्येकाची सुखाची व्याख्या निराळी असते. पण कधी कधी मनाला होणारा मनमुराद आनंद म्हणजेच सुख का? माझ्या मते आपल्याला जे करण्याची अगदी आतून ओढ असते ते करण्याची इच्छा निर्माण होणं म्हणजे सुख !  मनाला समाधान मिळण्याला सुख म्हणत असावेत. एखादं आवडीचं गाणं ऐकलं की मन प्रफुल्लित होतं, मनाला बरं वाटतं. एखादा छान चित्रपट पाहिला की समाधान वाटतं. एखादं चांगलं पुस्तक वाचलं की समृद्ध वाटतं. एखादी परीक्षा उत्तीर्ण झालो की मनाला उभारी येते. कुणाशी छान गप्पा मारल्या की एक नवी ऊर्जा मिळते. आणि अशाच घटनांच्या शृंखलेतून आनंद मिळत जातो. ज्या क्षणाला असा आनंद मिळतो, तो क्षण खरा सुखाचा धनी! तो क्षण आपला. अशा क्षणांची मालिका तयार करण्याची क्षमता मिळवणं म्हणजे सुखाची तयारी करणं असं मला वाटतं. आणि अशा ऊर्जाक्षणांमध्ये चिंब भिजणं म्हणजे सुख असावं.

शेवटी न रहावून एका उमेदवाराला बोलावले व विचारले - तुम्ही कोल्हापूरला सैनिक मुलाखती साठी तर जात नाही ना ? तो हो म्हणाला... त्याने मला विचारले आम्हाला सांगाल का कसे विद्यापीठापर्यंत जायचे.  मग त्याला मुलाखत तळापर्यंत कसे जायचे हे मी शांतपणे सांगितले. त्याने माझे आभार मानले.. मला म्हणाला तुम्ही सातारा जिल्यातील अन इकडे नोकरी कशी ? त्याला काय सांगणार ही मिळवण्यासाठी काय करावे लागले ते, अन आता बदली... शक्य नाही.. तेवढ्यात दुसरा उमेदवार म्हणाला - काका आमची बडबड जरा जास्त च झाली का ? आम्ही दंगा करायला नको होता का ? मी त्याला एव्हढच म्हणालो - अरे, आजपासून ४-५ वर्षानंतर तुम्ही जर एकत्र आला तर अशी मोज मजा कराल का? तो "नाही" - म्हणाला.

या प्रसंगातून घडणाऱ्या घटना तितक्या महत्वाच्या नसून तुम्ही त्या घटनांकडे कोणत्या दृष्टीकोनातून बघता, कोणत्या नजरेतून पाहता, हे सगळ्यात महत्वाचं आहे. यातून आपल्याला हि शिकवण मिळते, की आपणदेखील आपल्याबाबतीत घडणारी प्रत्येक लहान मोठी घटना ज्ञानाच्या प्रकाशात पहावी, महादृष्टीने पाहावी.

- केशव यशवंत राजपुरे
९६०४२५०००६

Friday, April 14, 2017

कमी लेखू नका

कुणालाही कमी लेखू नका .. मोठे व्हाल ..
(प्रा. केशव राजपुरे)

आपल्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारची माणसे आपण पहातो. त्यात काही सुस्वभावी, तत्पर, समयसूचक, वक्तशीर, प्रामाणिक, मनमिळावू, मितभाषी, सत्यवचनी, स्पष्टोक्ती, विश्वासू, इमानी तसेच मोकळ्या मनाची मंडळी बघतो. काही माणसे उपजतच कद्रू असतात. त्यांना मोकळ्या आणि 'मोठ्या' मनाने जगता येत​​ नाही की मनमोकळे वागता येत नाही. या भाऊगर्दीत थोडेशे ताठ, चंचल आणि गंभीर स्वभाव असलेले काहीजण अनुभवायला मिळतात. याबाबतीत कदाचित मी चूकत असेन पण माझं निरीक्षण मात्र नक्कीच चुकीचं नसावं ......

आम्ही लहान असताना अभिनेते मिथून दा आमचे सर्वाचे आदर्श नायक असावेत.. बऱ्याचदा आम्ही कुणालातरी  वार्षिक स्नेहसंमेलनावेळी 'दोन हाणा पण मिथून म्हणा' असे शेले पागोटे टाकत असू.... माझ्या जिज्ञासू मनाने अगदी  तेव्हापासून अशा 'क्षमतेने कमी पण क्षमतावान दाखवणारे' खास आणि वेगळया प्रकारच्या व्यक्तींना पारखायला सुरुवात केली असावी. यांना फुकटचा 'मोठेपणा' हवा असतो. समोरच्याने महत्व दिले नाही की यांना अपमानीत व्हायला होतं. फारच गर्विष्ठ असतात हे म्हणे. समोरच्याच्या बोलण्या वागण्याचा सोयीस्कर अर्थ लावण्यात आणि त्यामुळे त्रागा करण्यात अगदी तरबेज. आपण नेहमी अशा दुराचारीना टाळू इच्छित असतो पण दुर्दैवाने अशांचा संपर्क आलाच तर अस्वस्थ व्हायला होत. येथे मी अशा व्यक्तीबद्दल माझी काही निरिक्षणे देत आहे. यामुळे आपणास त्यांच्यापासून दूर राहायला मदत होईल.

त्यांच्या मते समृद्धता ही राहणीमान, मालकीचे वाहन, कपडे, शूज, जेवत असलेले हॉटेल, वापरत असलेल्या गोष्टीच्या मानकाच्या दृष्टीने करावी.  इतर लोकांची गुणवत्ता ठरवण्याची त्यांची स्वत:ची काही मानके आहेत. त्यांच्या दृष्टीने दुसरे म्हणजे कवडीमोल ! कदाचित त्यांच्या हातात असते तर त्यांनी जगातील सर्व माणसांचे मुल्यांकन करण्याची एखादी एजन्सीच काढली असती. त्यांच्या मते एखादा अधिकारी त्यांना मिळालेल्या अधिकारांच्या योग्यतेचा नसतो.  समोरच्याच्या जागेवर त्याच्यापेक्षा आपण कसे योग्य आहोत हे मानण्यात धन्यता आणि मनाची समजूत काढून मोकळे.. जसं म्हंटलं जातं की 'ज्यांनी आपला संघर्ष पाहिला आहे त्यांनाच तुमच्या यशाची किंमत कळते, बाकीच्यांच्यासाठी तुम्ही एक भाग्यवान व्यक्ती असता'. तसं अशा स्वप्न कोंबड्यांना तुमच्या यशाची किंमत का असावी ?

त्यांच्या मते त्यांना सर्व काही माहीत असते, किंबहुना प्रत्येक विषयाचे ते ज्ञानी असतात. जर त्याना चुकून चाहूल लागलीच की एखाद्या विषयात आपण कमजोर आहोत तर त्या विषयातील ज्ञानी लोकांशी सुरुवातीला लगट करतील आणि एकदा अंदाज आल्यावर त्या माणसाच्या कमकुवत मुद्याची माहिती घेवून त्याला काय येते यापेक्षा काय येत नाही या विषयावर मित्रांत चर्चा करून मनाची तहान भागवून घेतील.

या लोकांच्या अपेक्षा फार ! हे असंचं व्हायला हवं. फार महत्वाकांक्षी असतात हे. त्यांच्या इच्छा-आकांक्षा मध्ये जर अडसर आलाच तर लगेच क्रोधीत व्हायचं. 'असं का म्हणायचं त्यांनी', 'असं त्यांनी म्हणायला नाही पाहिजे' -ह्या यांच्या एखाद्याच्या वाक्यांवर प्रतिक्रिया. यांचं नेहमी खरं असतं - कारण त्यांच्या मते ते कधी चुकत नाहीत. मग चूक नसेल तर माफी तरी मागणार कशी ? का मागायची, जर मागितली तर त्यांचा अपमान

त्यांना डिवचलेल्या 'एखाद्याला डोक्यात ठेवायचं' एव्हढचं फक्त त्यांच्या डोक्यात. अशांचा कधी एकदा बदला घेतोय असं होतं त्यांना.. त्याला विरोधास विरोध हे ओघानं आलं.. मग त्याला खुन्नस द्यायची... कुणाकडून तरी त्याला 'सांगायची' पद्धत अवलंबायची. 'बोलल्यावर'- मग कसा गप्प बसला ? असं बोलून स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची. जर चुकून यात एखादी गोष्ट अंगलट आलीच तर कशाचीतरी कुबडी सोबत ठरलेली. कुणी 'मोठं' म्हंटलं म्हणून कुणी मोठं होतं नसतं - 'मोठेपणा हा अंगी असायला हवा', अर्थात खरा मोठेपणा अंगच्या गुणांवर व कर्तुत्वामध्ये असतो. नम्रतेतून येणारा मोठेपणा दुर्मिळ झालाय..

अशी मंडळी कायम एक-एकटी असतात, त्यांचे मित्र फार कमी, शत्रूच जास्त... लाजाळूपणा, 'लेप्ट आउट' फिलिंग, कायमची अस्वस्थता, मनात अकल्पित भीती, लयास गेलेला आत्मविश्वास, धैर्याचा अभाव, स्वयंसुरक्षेसाठी देवाचा धावा हे नेहमी त्यांच्या वाट्याला आलेलं दिसतं. या मंडळीना 'दु:खी जादा सुखी कम' असेच पाहू शकता. या दु:खीपणाचे कारण ही काय असावे, ठाऊक आहे ? 'इच्छा'! इच्छेविरूद्ध काही झालं किंवा त्यात अडसर आला की यांना क्रोधीत व्हायला होतं. इच्छा पूर्ण झाली की आनंदीत आणि अपूर्ण राहीली की दु:खी ! हे गणित झालेलं दिसतयं बिच्याऱ्यांच्या आयुष्याचं. यांच्या क्रोधाची दुसरीही कारणं असू शकतात; ज्यामध्ये जिद्द, हिंसा, अहंकार, भय, चुगली, वैर, ईर्षा, घृणा आणि उपेक्षा. असू देत ना काहीही.. पण ह्याच आपल्याला निदान झालं म्हणजे सुखी आयुष्याची वाट सापडायला मदत होईल. या सर्वावर शांततेने विजय मिळवायला हवा.. असं करणं म्हणजे स्वत:ला शिक्षा देण्यासारखं आहे. म्हणूनच सांगतो 'कुणालाही कमी लेखू नका .. मोठे व्हाल' ..

@ Keshav

Thursday, January 26, 2017

सुंदर माझं गाव

सुंदर माझं गाव

राष्ट्रपिता महात्मा गांधींनी म्हटले होते की, खरा भारत हा खेड्यात राहतो. सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील बावधन हे राजकीय आणि सामाजिकदृष्टया प्रतिष्ठेचे गाव ! या गावच्या पोटातील अनेक वाड्या वस्त्यामुळे हे तसे विभागातील मध्यवर्ती ठिकाण ! या अशा वाड्यापैकी सह्याद्रिच्या कुशीत वसलेले एक टुमदार आणि सर्वगुण संपन्न खेडे म्हणजे अनपटवाडी ! कुणाचीही दृष्ट लागण्यायोग्य गाव ! नैसर्गिक देणगीबरोबरच अलीकडे गावाने सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या प्रगतीने स्वत:च्या सौदर्यात भर टाकली आहे.

समर्थ रामदास स्वामिनी सज्जनगडावर असताना समाजाला संघटित तसेच शक्तिसंपन्न बनवण्याच्या हेतूने वेगवेगळ्या गांवी जावून सुरुवातीला मारुतीच्या अकरा मंदिरांची स्थापना केली आणि नंतर गावोगावी शेकडो मारुती मंदिरांची स्थापना केली. अनपटवाडीत असलेले मारुती मंदीर हेही तेव्हा स्थापन झाले ही आख्याईका आहे. याचा अर्थ या गावची निर्मिती जवळ जवळ ३५० वर्षांपूर्वी झाली असावी असा अंदाज करता येईल. सुरुवातीला आठ ते दहा कुटुंबानी एकत्र राहून तयार केलेली वस्ती आता खूप विस्तारीत झालेली दिसते. गावची रचना ही अगदी विशिष्ट पद्धतीची आहे. मध्यभागी मारुतीचे मंदीर, खालची, वरची आणि मधली आळी ! गावात सुरुवातीला सहा वाडे- तटबंधी असलेली घरे - असावेत. वाड्याच्या आतील रचना भारतीय वास्तुशास्त्रावर आधारित आहे. वाड्याच्या मध्यभागी भरपूर सूर्यप्रकाश व शुद्ध हवा यासाठी खुला चौक, चपट्या विटा व चिरेबंद घडीव दगडातील भक्कम बांधकाम, चहुबाजूनी तटबंदी, टेहळणी बुरुज आहेत. यामुळे या वाड्यांत काही मराठी दूरदर्शन मालिकांचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

सध्या गावामध्ये अनपट, मांढरे, घाडगे, गोळे, राजपुरे, व सुतार यांची जवळजवळ १०० कुटुंबे आहेत तर गावाचे लोकसंख्या अंदाजे ५०० असावी. बावधन पंचक्रोशीतील अंदाजे ४०० एकर क्षेत्र या गावाकडे वहीवाटीस आहे. अनपटवाडी हे तुलनात्मक दृष्टीने पाहता पंचक्रोशीतील सुशिक्षित तसेच सुसंकृत मंडळींचे गाव म्हणायला काहीच हरकत नसावी. घराघरातून इंजीनियर, डॉक्टर, सिए, अधिकारी, वकील, शिक्षक तसेच व्यावसाईक निर्माण झाले आहेत. नवीन पिढी देखील त्यांच्यातील उत्कृष्टता साध्य करण्यात गुंतलेली आहेत. पालकांकडून प्रेरणा घेऊन ते उत्कृष्टता राखण्यासाठी त्यांच्या पातळीवर प्रयत्न करीत आहेत. इथल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खेळात देखील आपले नैपुण्य राज्य तसेच देश पातळीवर सिद्ध केले आहे.

गावची 'एकी' ही वैशिष्ट्यपूर्ण पण महत्वाची बाब या गावाकडून शिकण्यासारखी आहे. १९७५ सालापासून अनपटवाडी गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण झाली आहे. गेल्या ४० वर्षाच्या ग्रामपंचायतीच्या इतिहासात निवडणुकीवरून किंवा इतर कोणत्याही कारणास्तव गावात कधीही पराकोटीचे तंटे बघायला मिळाले नाहीत. सर्व जेष्ठ नागरिक आपली गावाविषयीची जबाबदार तसेच सक्रिय भूमिका निभावत आहेत. गेल्या चार ग्रामापंचायात निवडणुका बिनविरोध करून गावाने सर्वांसाठी एकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. याअगोदर च्या पंचवार्षिक निवडणुकीत गावाने सर्व स्त्री सदस्य निवडून देवून स्त्री-पुरुष समानतेची एक वेगळी वाट पाडली आहे. या गावातून शिक्षण घेवून बहुतांशी लोक इतर मोठ्या शहरात सेवा करत आहेत.

सामाजिक बांधीलकी आणि ग्रामविकासाची तळमळ उराशी बाळगून या 'एकी' जपणाऱ्या चाकरमान्यांनी एकत्र येवून १९९८ साली श्री ग्रामविकास मंडळ अनपटवाडी (मुंबई) या सामाजिक संस्थेची निर्मिती केली आहे. हि संस्था समाजातील होतकरू, सामाजिकदृष्ट्या संवेदनशील, तसेच शैक्षणिक, सांकृतिक, कला, क्रीडा या क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करून आपल्या पंचक्रोशीचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणीजनांचा सन्मान करते. या 'एकी' तूनच चार वर्षांपूर्वी या संस्थेच्या मदतीच्या जोरावर गावातील श्री वाकडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार तसेच पुनर्निर्माणाचे काम यशस्वीपणे झालेले दिसते.  याबरोबरच गावातील इतर मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम देखील या संस्थेच्या पुढाकारातून झाले आहे. सन २००९ साली गाव निर्मल ग्राम म्हणून घोषीत करण्यात आले आहे. हे गाव स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही आहे. तसेच गावात सरकारी योजनेमधुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सर्वाची पोहोच पावती म्हणजे गावच्या सरपंचांना २००५ साली राष्ट्रपतींच्या हस्ते 'आदर्श सरपंच' पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा या गावाच्या इतिहासातील सर्वात अभिमानाचा क्षण आहे.

गावाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील त्यापैकी काही: गावात मुलगी जन्मल्यास येथे प्राधान्याने तिचे जतन आणि वाढ करण्यावर भर दिला जा​​तोय. यासाठी त्या बालिकेच्या नावावर काही निश्चित पैसे ठेव रक्कम जमा केली जाते. येथे महिलांना प्रतिष्ठित तसेच सन्मानाची वागणूक दिली जाते. इथे जवळ जवळ सर्वांचे वाढदिवस साजरे केले जातात किमान शुभेच्छा दिल्या जातात. सर्वजण गावकऱ्यांच्या सुख-दुख:त मनपूर्वक सहभागी होताना दिसतात. गावात 'एक गाव एक गणपती' सारखे लक्षवेधी उपक्रम सदैव चालू आहेत. अतिशय मनोभावे नवरात्री उत्सव साजरा केला जातो. गावातील कोणत्याही कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप होवू दिला जात नाही. वारंवार घेतले जाणारे वृक्षारोपण तसेच रक्तदान शिबिरासारखे उपक्रम आता नेहमीचे झाले आहेत.

हे गाव जरी डोंगर दऱ्यात वसले असले तरी या गावचे साक्षरतेचे प्रमाण फार मोठे आहे. गावात  जिल्हा परिषदेची दर्जेदार प्राथमिक शाळा असून येथे इयत्ता ४ थी पर्यंत शिक्षण मिळते. या गावच्या शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. गावची शाळा हे गावचे एक वैशिष्ट आहे. या शाळेस 'आदर्श शिक्षक' पुरस्कार विजेते शिक्षक लाभाले हे गावचे भाग्य. शाळेस अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल 'आदर्श शाळा' पुरस्कार तसेच गुणवत्ता धारणेचे 'आयएसओ' मानांकन देखील मिळाले आहे. या गावच्या मुलभूत विकासात शाळेचा मोलाचा वाटा आहे. कुणाला जर आपल्या मनातलं  निसर्गरम्य खेडेगाव शोधायचं असेल तर त्यांनी बावधनच्या नैऋत्येस अडीच किलोमीटर वर असलेल्या अनपटवाडीची निवड करावी.

डॉ केशव राजपुरे   

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...