राजर्षी शाहू महाविद्यालय कोल्हापूर येथे बीएस्सी फिजिक्स माजी विद्यार्थी मेळाव्यादरम्यान केलेले मार्गदर्शन, १२ जानेवारी २०२०.
Sunday, January 12, 2020
Sunday, June 10, 2018
मार्कच्या खिरापती
दहावीच्या परीक्षेत 'मार्कच्या खिरापती' विषयी केलेलं संख्यात्मक विवरण आणि याविषयीचं परखड मत वाचलं .. आपल्या शैक्षणिक पद्धतीत गुण हे विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता मोजमापाच एक मापदंड आहे. त्यामुळे ज्याला जादा गुण तो तुलनात्मकदृष्ट्या अधिक हुशार हे जरी खरं असलं तरी बहुतांशी बाबतीत वास्तव वेगळं असतं म्हणून त्यांनी मांडलेलया मताशी मीही सहमत झालो ! आपल्या इथं वैद्यकीय विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळवण्यासाठी या परीक्षांमध्ये मिळवलेलया गुणांचा निकष असतो. त्यामुळे सर्वचजण हरतर्हेने कठोर परिश्रम करतात आणि या टप्प्यावर अधिक संख्येने गुण मिळविण्याचा प्रयत्न करतात. हे निकष बदलण्याची वेळ आलीय असे वाटते. विचारी मनं तयार करणारी पिढी घडवण्याऐवजी प्रशिक्षित रोबोट्स घडवणारी आपली शैक्षणिक प्रणाली बदलायला हवी.
आजकाल विद्यार्थ्याला परीक्षेत ९०% किंवा त्याहून अधिक गुण मिळाले की त्याचे शिक्षक आणि पालक स्वतःच्या समकालीन मार्कशी तुलना करतात आणि त्याचा गुणांक बोर्डात आलेल्या मुलाएव्हढा आहे अस ठरवून मोकळे होतात. पण वस्तुस्थिती वेगळी आहे अस मला तरी वाटतंय ! मला इथे तुलना अजिबात करायची नाही .. पण माझ्या विचारावर आपण नक्कीच विचार कराल आणि मताशी सहमत व्हाल. अलीकडे विद्यार्थी त्यांचे मागील परीक्षेत मिळालेलया गुणांच प्रतिनिधित्व करताना दिसत नाहीत. मला सांगायचंय की त्यांना त्यांच्या कुवतीपेक्षा जास्त गुण मिळाल्याचा भास होतो. कधी कधी अस वाटतं की हे विद्यार्थी परीक्षेसाठी केलेला अभ्यास नंतर विसरतात ! भौतिकशास्त्राचाच विचार करायचं म्हंटलं तर - ते फॅरॅडेचा नियम बरोबर सांगतील पण पंखा कोणत्या तत्वावर फिरतो असं विचारलं तर गडबडतील. विद्यार्थी खूपच 'व्यावहारिक' झाल्याचं जाणवतंय ! ते विद्यार्थ्यापेक्षा परीक्षार्थीच अधिक बनलेत, किंबहुना परिस्थितीने बनवलेत असं म्हणणं वावगं ठरू नये. घेतलेल्या ज्ञानाचा सुयोग्य वापर कराय लावणारी परीक्षा पद्धती अस्तीत्वात यायला हवी असे वाटते. अशा रीतीने केलेलं विद्यार्थ्याचं रास्त मूल्यांकन होईल आणि त्यांनी मिळवलेली श्रेणी योग्य असेल.
आजकाल विद्यार्थ्याला परीक्षेत ९०% किंवा त्याहून अधिक गुण मिळाले की त्याचे शिक्षक आणि पालक स्वतःच्या समकालीन मार्कशी तुलना करतात आणि त्याचा गुणांक बोर्डात आलेल्या मुलाएव्हढा आहे अस ठरवून मोकळे होतात. पण वस्तुस्थिती वेगळी आहे अस मला तरी वाटतंय ! मला इथे तुलना अजिबात करायची नाही .. पण माझ्या विचारावर आपण नक्कीच विचार कराल आणि मताशी सहमत व्हाल. अलीकडे विद्यार्थी त्यांचे मागील परीक्षेत मिळालेलया गुणांच प्रतिनिधित्व करताना दिसत नाहीत. मला सांगायचंय की त्यांना त्यांच्या कुवतीपेक्षा जास्त गुण मिळाल्याचा भास होतो. कधी कधी अस वाटतं की हे विद्यार्थी परीक्षेसाठी केलेला अभ्यास नंतर विसरतात ! भौतिकशास्त्राचाच विचार करायचं म्हंटलं तर - ते फॅरॅडेचा नियम बरोबर सांगतील पण पंखा कोणत्या तत्वावर फिरतो असं विचारलं तर गडबडतील. विद्यार्थी खूपच 'व्यावहारिक' झाल्याचं जाणवतंय ! ते विद्यार्थ्यापेक्षा परीक्षार्थीच अधिक बनलेत, किंबहुना परिस्थितीने बनवलेत असं म्हणणं वावगं ठरू नये. घेतलेल्या ज्ञानाचा सुयोग्य वापर कराय लावणारी परीक्षा पद्धती अस्तीत्वात यायला हवी असे वाटते. अशा रीतीने केलेलं विद्यार्थ्याचं रास्त मूल्यांकन होईल आणि त्यांनी मिळवलेली श्रेणी योग्य असेल.
इथे लोक परीक्षेत उत्तीर्ण होतात आणि इतरांना परीक्षा उत्तीर्ण होण्यास शिकवितात आणि कुणालाच काही कळत नाही. त्यामुळेच विद्यार्थ्यात व्यावहारिक दृष्टीकोण वाढीस लागलाय ! शिकणं म्हणजे पाठ करणं आणि विसरणं नव्हे तर मिळवलेल्या ज्ञानाच्या जोरावर अद्भुत आणि स्वतंत्र विचार करणारं मन विकसित करणं आहे - हे सारे विसरलेतच जणू ! तरी बोर्डानं गुणवत्ता यादी प्रसिद्ध करायची बंद केली आहे म्हणून बरं ! नाहीतर या परीक्षा म्हणजे एक जीवघेणी स्पर्धाच जणू ! काही पालकांना त्यांच्या पाल्याचे मार्क्स हे प्रतिष्ठतेचा प्रश्न वाटतो.. खाजगी शिकवण्या इतक्या वेगाने विकसित झाल्या आहेत की शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नियमित वर्गांसाठी वेळ देणं कठीण झालंय ! त्यांचा श्वास गुदमरतो या बोर्डाच्या इयत्ता दरम्यान ! जर आम्ही परदेशी शिक्षण व्यवस्थेचा संदर्भ घेतला तर व्याख्यानाच्या तासांच्या ६० मिनिटांमधील, शिक्षक फक्त २० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी बोलतो. बाकीच्या वेळी विद्यार्थी चर्चा करतात. नाविन्यपूर्णता, अद्भुतता, सध्याच्या गरजा, समस्या आणि उपाय यावर त्यांचे अभ्यासक्रम आधारीत असतात. मग कसे तयार होणार अद्भुत आणि स्वतंत्र विचार करणारी मनं ?
सद्धाच्या शैक्षणिक व्यवस्थेतील पोकळी लक्षात घेऊन प्रत्यकाने आपली शैक्षणिक वाटचाल चालू ठेवायला हवी. कमावता करणारं शिक्षण घेतानाच आपल्या मनाला विचारी बनवणारं प्रशिक्षणही देता येतं का ते पाहावं ! जन्माने प्रत्येकजण जसा वेगवेगळा असतो तसाच विचारानेही ! मग वैचारिक नाविन्यता आणायची असेल तर प्रत्यकाने आपले जीवन वेगळ्या प्रकारे म्हणजे नावीन्यरितीने जगले पाहिजे. विचारी मन विकसित करायचं असेल तर जीवनात अद्भुतता आणि उत्कृष्टता अंगिकारली पाहिजे. जर अशी प्रणाली देशात अस्तित्वात असेल तर कोणत्याही परीक्षेत किती गुणा मिळाले हे दुय्यम होईल.
- केशव राजपुरे
- केशव राजपुरे
Monday, March 19, 2018
शहीद जवान अनंत जानबा धुरी
शहीद जवान अनंत जानबा धुरी
गेल्या रविवारी म्हणजे गुढीपाडव्यादिवशी (१८/०३/२०१८) मी शहीद जवान अनंत जानबा धुरी यांच्या बेळेभाट (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) या गावी जयहिंद फौंडेशनने सोपवलेल्या जबाबदारीपूर्तीसाठी जाऊन आलो. १२० किमी अंतर आणि एकेरी रस्ता म्हणून कोल्हापूरहून सकाळी लवकरच निघालो. सकाळी ११ च्या दरम्यान बेळेघाट या त्यांच्या गावी पोहोचलो. त्यांचे बंधू परशुराम धुरी यांच्या घरी गेलो. तिथे वडील जानबा धुरी आणि कुटुंबीय यांची भेट झाली. कौटुंबिक माहिती घेतली आणि ३० एप्रिलच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.
बेळेभाट हे चंदगड तालुक्यातील पाचशे लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे. या गावातील बाराहून अधिकजण सैन्यात देशाची सेवा करत आहेत.
मला तिथं गेल्यावर १८ जानेवारी २०१८ रोजी त्यांना वीरगती प्राप्त झाल्याचं समजलं. हे समजल्यावर मात्र या भेटीस जडलेल्या
भावनिकतेची तीव्रता वाढली. तशातच मी 'जयहिंद' ची उदिष्टे, त्यांचे सांत्वन आणि माझा भेट-प्रपंच याची माहिती दिली. माझ्या प्रश्नाची त्यांचेकडून त्रोटक उत्तरं मिळायला लागली तशी तशी माझी अस्वस्थता वाढायला लागली. कारण फक्त दोनच महिने झाले या दुर्दैवी घटनेस आणि आपण इथं पत्रकारिता करतोय की काय असा भास ! त्यांचे वडील रडवेल्या सुरात बोलत होते. मुलाबद्दलची माया, सतावणारी आंतरिक ओढ तसेच चालता बोलता पोटचा गोळा गेल्याचं दु:ख - सारं
सारं
दिसत होतं !
जवान अनंत धुरी यांचे प्राथमिक शिक्षण बेळेभाट आणि दाटे येथे तर माध्यमिक शिक्षण संजय गांधी विद्यालय नागनवाडी येथे झाले होते. हलकर्णीच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात त्यांनी एसवाय बी.ए. पर्यंत शिक्षण घेतले होते. धुरी बेळगाव येथील ८ मराठा लाईट इन्फंट्री बटालियनमध्ये १९९८ मध्ये भरती झाले होते. त्यांनी बेळगाव, पुणे, राजस्थान, आसाम, दिल्ली येथे एकूण १९ वर्षे सैन्यात सेवा बजावली होती. त्यांचे वडील जानबा आणि आई अनुसया हे शेतकरी आहेत. तर बंधू अंकुश हेही शेती करीत आहेत. तर थोरले बंधू परशुराम हे माध्यमिक शिक्षक म्हणून गावाजवळील एका हायसकूल मध्ये कार्यरत आहेत. अनंत यांचा विवाह २००५ साली नांदवडे येथील तुकाराम गावडे यांची मुलगी मनीषा यांच्याशी झाला होता. येत्या काही दिवसात त्यांना स्टार गोल्ड मेडल देवून बढती मिळणार होती.
सध्या ते श्रीनगर येथील गुलमर्ग येथे होते. तिथे जानेवारीमध्ये तापमान उने २० डिग्री सेल्सियस पर्यंत गेले होते. त्यामुळे थंडीची लाट होती यातच हिमवर्षाव होत राहिला. दिनांक १८ जानेवारी २०१८ रोजी पहाटे पाच वाजता त्यांना बर्फात गुदमरून वीरमरण आले. त्यांची आठ वर्षांची मुलगी ॠतुजा आणि वडील जानबा यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला होता.
जवान अनंत धुरी यांचे प्राथमिक शिक्षण बेळेभाट आणि दाटे येथे तर माध्यमिक शिक्षण संजय गांधी विद्यालय नागनवाडी येथे झाले होते. हलकर्णीच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात त्यांनी एसवाय बी.ए. पर्यंत शिक्षण घेतले होते. धुरी बेळगाव येथील ८ मराठा लाईट इन्फंट्री बटालियनमध्ये १९९८ मध्ये भरती झाले होते. त्यांनी बेळगाव, पुणे, राजस्थान, आसाम, दिल्ली येथे एकूण १९ वर्षे सैन्यात सेवा बजावली होती. त्यांचे वडील जानबा आणि आई अनुसया हे शेतकरी आहेत. तर बंधू अंकुश हेही शेती करीत आहेत. तर थोरले बंधू परशुराम हे माध्यमिक शिक्षक म्हणून गावाजवळील एका हायसकूल मध्ये कार्यरत आहेत. अनंत यांचा विवाह २००५ साली नांदवडे येथील तुकाराम गावडे यांची मुलगी मनीषा यांच्याशी झाला होता. येत्या काही दिवसात त्यांना स्टार गोल्ड मेडल देवून बढती मिळणार होती.
सध्या ते श्रीनगर येथील गुलमर्ग येथे होते. तिथे जानेवारीमध्ये तापमान उने २० डिग्री सेल्सियस पर्यंत गेले होते. त्यामुळे थंडीची लाट होती यातच हिमवर्षाव होत राहिला. दिनांक १८ जानेवारी २०१८ रोजी पहाटे पाच वाजता त्यांना बर्फात गुदमरून वीरमरण आले. त्यांची आठ वर्षांची मुलगी ॠतुजा आणि वडील जानबा यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला होता.
मी बेळेभाट ला जाण्याअगोदरच अनंत धुरी हे विवाहित आहेत आणि त्यांच्या पत्नी श्रीमती मनीषा उर्फ अस्मिता ह्या गृहिणी आहेत आणि आपल्या मुली ऋतुजा आणि श्वेता यांचे पालनपोषण करीत आहेत याची कल्पना होती. पण तोपर्यंत तरी घरात वीरपत्नी किंवा मुलींची हालचाल जाणवत नव्हती म्हणून माझं आपलं - त्यांची पत्नी पतीवियोगाने बाहेर येत नसावी, कदाचित या प्रसंगातून सावरण्यासाठी माहेरी गेली असावी असा तर्क लावणं चालू होतं. त्यात त्यांची भावजय, भावाची मुलं घरात वावरताना दिसत होती मी मात्र अनंत यांच्या कन्यांचा शोध घेणं चालू केलं होतं.
मी माहिती लिहून घेतली तर काही माहिती मोबाईल मध्ये घेतली. ना राहून परशुराम यांना विचारलं असता समजलं की ही वीर-पत्नी गेली बरीच वर्षे म्हणजे या प्रसंगापूर्वीपासूनच बेळगाव येथे आपल्या निवृत्त सैनिक वडिलांच्या घरानजीक विभक्त रहात आहेत. यामुळं दु:ख, उत्सुकता, कीव आणि तत्सम विचारांनी मनात गर्दी केली. का असावं असं ? बरं या वीर जवानाच्या जाण्यानंतर तरी ही वीरपत्नी धुरी कुटुंबासोबत का रहात नसावी इ..
आईची आईंची चौकशी केली असता समजले की त्या वयस्कर आहेत आणि पुत्र वियोगाने त्यांनी आपणास शेतातील गोठ्यावर वेगळं ठेवलं आहे. कुटुंबियांना जयहिंद आर्थिक मदत करणार आहे हे सांगितलं आणि ही मदत सर्व गरजूना दिली गेली पाहिजे या तत्वावर वीरपत्नी चा बेळगाव येथील पत्ता आणि मोबाईल क्रमांक मागितला. सुरुवातीला 'आम्ही एकमेकांच्या संपर्कात नसतो' हे कारण पुढं करून टाळलं दिराने ! पण तिथं उपस्थित असलेल्या अनंत धुरी यांच्या चुलत्याने नंबर दिला. जड अंत:करणाने सर्वांचा निरोप घेतला आणि बेळेभाट सोडले.
त्या नंबरवर दोन तासाच्या कालावधीत बऱ्याचदा प्रयत्न केला तरी संपर्क होत नव्हता आणि बेळगावात नानावाडी येथे राहतात एव्हढंच माहीत. बरं, चंदगडहून तसेच परत फिरण्यापेक्षा बेळगाव मार्गे कोल्हापूर करता येईल आणि याकामासाठी परत यायचा प्रसंग टळेल म्हणून माझा आटापिटा ! दरम्यान थांबून काय करायचे म्हणून निसर्गरम्य आणि सधन चंदगड तालुक्यातील आमच्या माजी विद्यार्थ्याच्या घरी (माणगाव-नीटूर-कोवाड-दुडगे) जाऊन आलो.. नाईलाजाने पुन्हा परशुराम धुरी सरांना फोन करून वहीनींच्या बंधूंचा किंवा वडिलांचा फोन नंबर देण्याची विनंती केली. शेवटी नंबर मिळाला आणि वीर पत्नीची बेळगाव येथे त्याच दिवशी भेट होणार याची खात्री झाली. जयहिंद च्या पाठींब्याची खरी गरज ज्या वीर पत्नीस आणि दोन पिल्ल्यांना होती त्यांची भेट घ्यायला तडक बेळगाव गाठले.
त्या नंबरवर दोन तासाच्या कालावधीत बऱ्याचदा प्रयत्न केला तरी संपर्क होत नव्हता आणि बेळगावात नानावाडी येथे राहतात एव्हढंच माहीत. बरं, चंदगडहून तसेच परत फिरण्यापेक्षा बेळगाव मार्गे कोल्हापूर करता येईल आणि याकामासाठी परत यायचा प्रसंग टळेल म्हणून माझा आटापिटा ! दरम्यान थांबून काय करायचे म्हणून निसर्गरम्य आणि सधन चंदगड तालुक्यातील आमच्या माजी विद्यार्थ्याच्या घरी (माणगाव-नीटूर-कोवाड-दुडगे) जाऊन आलो.. नाईलाजाने पुन्हा परशुराम धुरी सरांना फोन करून वहीनींच्या बंधूंचा किंवा वडिलांचा फोन नंबर देण्याची विनंती केली. शेवटी नंबर मिळाला आणि वीर पत्नीची बेळगाव येथे त्याच दिवशी भेट होणार याची खात्री झाली. जयहिंद च्या पाठींब्याची खरी गरज ज्या वीर पत्नीस आणि दोन पिल्ल्यांना होती त्यांची भेट घ्यायला तडक बेळगाव गाठले.
अनंत धुरी यांचे म्हेव्हणे पप्पू गावडे, विसितला तरुण, आम्हास नानावाडी जवळील मिल्ट्री कॅम्प नजीक असलेल्या महादेव मंदिराजवळ घ्यायला आला. आता त्यांच्या घरी पोहोचेपर्यंत मनात विचारसत्र सुरु झालं. हा एकटाच भाऊ... तोही अविवाहित ... आई नसलेने मदतीसाठी बहिणीची गरज पडली असावी याच्या कुटुंबास ! म्हणून सासरी मन रमत नसावं त्यांचं ! हा विवाहित असता तर नणंद भावजया एकत्र राहिल्या असत्या का ? वैगेरे वैगेरे ..
दारातच उभे असलेले दोन चिमुकले, निराधार, निष्पाप चेहरे दिसले आणि पोटातील पित्त हालावं असं झालं. त्यांना वाटलं त्यांचा मामा कुठल्यातरी पाहुण्यांना घेऊन आलाय. त्यांच्या हक्काचा आधार, चालतं -बोलतं माणूस त्यांना सोडून जाऊन देशाच्या कामी आलेल्या दिवसाला २ महिनेच झाले होते त्यावेळी ! काय असाव्यात त्यांच्या भावना ? मनातील विचार ? स्वतःला विचारत होतो आणि काळीज चर्रर्र होत होतं. 'त्यांच्या भविष्यात काय मांडून ठेवलंय?' हा एक त्रयस्थ आणि वडीलधारी म्हणून मी विचार करत होतो. त्या बापडयांना काय 'त्या' भयानकतेची कल्पना ? मन थांबायला तयार नव्हते - 'मिळेल का निष्पापांना हक्काचा हरपलेला आधार ? ', 'का त्या विधात्यानं कोपावं यांच्याच बाबतीत ?'- सारखे विचार चालू होतेच.
मला जे बोलायचे होते ते धुरी यांच्या म्हेव्हण्याला थोडक्यात सांगितले. भेळेभाट वरून नातेवाईकांना भेटून आलोय हेही सांगितले .. एकूण कौटुंबिक मतांतराचा प्रश्न लक्षात घेऊन 'जयहिंद' ही संस्था वीरपत्नी आणि मुलींना शक्य असलेली सर्वतोपरी मदत करेल याची ग्वाही दिली. तसेच हेही सांगितले की सातारच्या कार्यक्रमास आई-वडील-बंधू स्वतंत्ररित्या आले तरी वहिनी आणि मुली यायला हव्यातच ! आमची मदत आपल्याच हाती देऊ आणि जयहिंद आपल्या हक्काचा आधार बनेल - हा विश्वास दिला ! हे सर्व चालू असताना वहिनी आतल्या घरात होत्या. कदाचित त्यांनाही ऐकू जावे म्हणून मी जरा खडया आवाजातच बोलत होतो.. पिल्ल्यांची त्यांना विश्वासात घेऊन, आधार देत शाळेविषयी माहिती घेतली. मोठी ऋतुजा इयता पहिलीत तर दुसरी श्वेता अंगणवाडीत शिकत आहे. त्यांच्या घरानजीकच असलेल्या अंगडी इंटरनॅशनल स्कुल या खाजगी शाळेमध्ये त्या शिकतात. वर्षाकाठी दोघींची शैक्षणिक फी किमान साठ हजारांपर्यंत आहे. 'जयहिंद' या फी मध्ये सवलत मागू शकते- हा विचार आला.
शेवटी विनंती केल्यावर वहिनी बाहेर आल्या. त्या काळरात्री च्या साडेआठ वाजता अनंत यांनी पत्नीस फोन केला होता. गुलमर्ग येथे कमालीचा गारठा आहे, त्यामुळे माझा श्वास गुदमरतोय, मला मुलींची खूप आठवण येतेय, तुम्ही सर्वजण तब्येतीला सांभाळा, असे सांगितले होते. पत्नीनेही तुम्ही घराकडची काळजी करू नका, असे सांगतानाच फोन कट झाला होता. तोच त्यांच्या आयुष्यातील अखेरचा फोन ठरला. शत्रुला रोखण्यासाठी ते या कडाक्याच्या थंडीतही सेवा बजावत होते. त्यांचा पती-वियोग, दु:ख, यातना क्षणोक्षणी जाणवत होत्या. काही वेळानंतर मी त्यांचं सांत्वन केलं आणि विश्वासात घेऊन वस्तुस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला..
असं जाणवलं की लग्न झाल्यापासूनच धुरी यांच्या कुटुंबाने वीरपत्नी मनीषा उर्फ अस्मिता धुरी यांना आपलंस केलं नाही किंबहुना सामावून घेतलं नाही किंवा अस्मिता यांनी स्वत:हून सामावण्याचा प्रयत्न केला नाही. गैरसमज, मतभेद व त्यातून ताण-तणाव यांना कंटाळून आपल्या निवृत्त सैनिक वडिलांच्या आधारावर त्या बेळगाव येथे रहात होत्या; केवळ एका आशेवर: घरवाले नसले म्हणून काय झाले माझा जोडीदार तर आहे ना सोबत ! त्यात त्यांना दोन्ही मुलीच ! प्रत्येक सैनिक कुटुंबाला त्यांचा मुलगा हवा, त्याचा पगार हवा, पण त्याची बायको नको, मुली तर नकोच नको - असा समज आहे अस्मिता वहिनींचा ! बायको आणि मुलांनी त्यांचं त्यांनी अस्तित्व निर्माण करून जगावं - ही कदाचित इच्छा असावी घरच्यांची ! आम्ही आमच्या जवान मुलासाठी आहोत, तुमच्यासाठी नाही - हा आहे त्यांचा समज आणि भावना ! अस्मिता वाहीनींना अजूनही असं वाटतंय की काहीतरी चमत्कार होईल आणि जानबा धुरी यांचे कुटुंबीय परत या निराधारांना सामावून घेतील आणि हक्काचा आधार देतील.
कौटुंबिक तणाव, मतभेद सर्वत्र आहेतच की. सासू-सासरे, दिर-जावा, नणंद-भावजया यांना तुम्ही त्यांचे किंबहुना त्यांच्यातीलच आहात हे दाखवायला कमी तर पडत नाहीत ना - याचा शोध घ्यावा लागेल. तसेच कोणत्याही विवाहित स्त्रीला तिचे सासर हेच हक्काचं 'घर' असतं हा विचार पटायला हवा. तसा विश्वास सासरच्या मंडळींनी रुजवायला हवा. हे सार करूनही तुमचा दखल-अंदाज घेतला गेला नाही तर निवडलेला 'सवता-सुबा' पर्याय योग्य असावा. वडीलधारी मंडळींना सूनेतील पोरकटपणा तसेच हट्ट ओळखून समयसूचक तोडगा काढता आला पाहिजे. हे सगळं जाणून उमजून संसारात 'अपेक्षा' ठेवल्या की काहीही पर्याय लागू पडत नाही हा गुत्ता सोडवायला - हे मात्र खरं.
मी तूर्तास तरी अस्मिता वहिनींना या सगळ्यातून बाहेर यायचं बळ 'जयहिंद'तर्फे देऊन आलोय. खरंच, हि विटलेली मनं जुळतील का ? कुणाचं चुकतंय यापेक्षा काय रास्त याचा शोध व्हावा. आर्थिक मदत, सांत्वन, कणव, दया यांहीपेक्षा यामध्ये मध्यस्ती करून मध्यावधी मार्ग शोधायची नितांत गरज वाटते. जयहिंद चे संचालक मंडळ आणि विचारगट यावर काहीतरी उपाय नक्की शोधेल आणि फौंडेशनच्या उद्धीष्ठपुर्तीच्यादृष्टीने पावले टाकेल.
जयहिंद
शेवटी विनंती केल्यावर वहिनी बाहेर आल्या. त्या काळरात्री च्या साडेआठ वाजता अनंत यांनी पत्नीस फोन केला होता. गुलमर्ग येथे कमालीचा गारठा आहे, त्यामुळे माझा श्वास गुदमरतोय, मला मुलींची खूप आठवण येतेय, तुम्ही सर्वजण तब्येतीला सांभाळा, असे सांगितले होते. पत्नीनेही तुम्ही घराकडची काळजी करू नका, असे सांगतानाच फोन कट झाला होता. तोच त्यांच्या आयुष्यातील अखेरचा फोन ठरला. शत्रुला रोखण्यासाठी ते या कडाक्याच्या थंडीतही सेवा बजावत होते. त्यांचा पती-वियोग, दु:ख, यातना क्षणोक्षणी जाणवत होत्या. काही वेळानंतर मी त्यांचं सांत्वन केलं आणि विश्वासात घेऊन वस्तुस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला..
असं जाणवलं की लग्न झाल्यापासूनच धुरी यांच्या कुटुंबाने वीरपत्नी मनीषा उर्फ अस्मिता धुरी यांना आपलंस केलं नाही किंबहुना सामावून घेतलं नाही किंवा अस्मिता यांनी स्वत:हून सामावण्याचा प्रयत्न केला नाही. गैरसमज, मतभेद व त्यातून ताण-तणाव यांना कंटाळून आपल्या निवृत्त सैनिक वडिलांच्या आधारावर त्या बेळगाव येथे रहात होत्या; केवळ एका आशेवर: घरवाले नसले म्हणून काय झाले माझा जोडीदार तर आहे ना सोबत ! त्यात त्यांना दोन्ही मुलीच ! प्रत्येक सैनिक कुटुंबाला त्यांचा मुलगा हवा, त्याचा पगार हवा, पण त्याची बायको नको, मुली तर नकोच नको - असा समज आहे अस्मिता वहिनींचा ! बायको आणि मुलांनी त्यांचं त्यांनी अस्तित्व निर्माण करून जगावं - ही कदाचित इच्छा असावी घरच्यांची ! आम्ही आमच्या जवान मुलासाठी आहोत, तुमच्यासाठी नाही - हा आहे त्यांचा समज आणि भावना ! अस्मिता वाहीनींना अजूनही असं वाटतंय की काहीतरी चमत्कार होईल आणि जानबा धुरी यांचे कुटुंबीय परत या निराधारांना सामावून घेतील आणि हक्काचा आधार देतील.
कौटुंबिक तणाव, मतभेद सर्वत्र आहेतच की. सासू-सासरे, दिर-जावा, नणंद-भावजया यांना तुम्ही त्यांचे किंबहुना त्यांच्यातीलच आहात हे दाखवायला कमी तर पडत नाहीत ना - याचा शोध घ्यावा लागेल. तसेच कोणत्याही विवाहित स्त्रीला तिचे सासर हेच हक्काचं 'घर' असतं हा विचार पटायला हवा. तसा विश्वास सासरच्या मंडळींनी रुजवायला हवा. हे सार करूनही तुमचा दखल-अंदाज घेतला गेला नाही तर निवडलेला 'सवता-सुबा' पर्याय योग्य असावा. वडीलधारी मंडळींना सूनेतील पोरकटपणा तसेच हट्ट ओळखून समयसूचक तोडगा काढता आला पाहिजे. हे सगळं जाणून उमजून संसारात 'अपेक्षा' ठेवल्या की काहीही पर्याय लागू पडत नाही हा गुत्ता सोडवायला - हे मात्र खरं.
मी तूर्तास तरी अस्मिता वहिनींना या सगळ्यातून बाहेर यायचं बळ 'जयहिंद'तर्फे देऊन आलोय. खरंच, हि विटलेली मनं जुळतील का ? कुणाचं चुकतंय यापेक्षा काय रास्त याचा शोध व्हावा. आर्थिक मदत, सांत्वन, कणव, दया यांहीपेक्षा यामध्ये मध्यस्ती करून मध्यावधी मार्ग शोधायची नितांत गरज वाटते. जयहिंद चे संचालक मंडळ आणि विचारगट यावर काहीतरी उपाय नक्की शोधेल आणि फौंडेशनच्या उद्धीष्ठपुर्तीच्यादृष्टीने पावले टाकेल.
जयहिंद
- केशव राजपुरे
Monday, October 9, 2017
विज्ञानातील नोबेल पारितोषिकांची विलक्षणता
विज्ञानातील नोबेल पारितोषिकांची विलक्षणता
३ ऑक्टोबर २०१७ रोजी यावर्षीचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक रेनर वीस, किप एस. थॉर्ने आणि बॅरी सी. बरीश या शास्त्रज्ञांना संयुक्तपणे देण्याचे जाहीर झाले आहे. लेझर इंटरफेरॉमीटर ग्रेविटेशनल-वेव ऑब्झर्वेटरी (एलआयजीओ) प्रकल्पाचे नेतृत्व करत या तिघांनी गुरुत्वलहरींचा शोध लावला होता. त्या तिघांमध्ये ९० लाख-स्वीडिश-क्रोन (अंदाजे ७ कोटी २५ लाख रुपये) च्या बक्षीसाचे विभाजन होईल. कदाचित सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे तिघेजण त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी "२०१७ चे नोबेल पुरस्कार विजेते" म्हणून ओळखले जातील. पण एलआयजीओ प्रोजेक्टमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या १३३ संशोधन संस्थांमधील जवळजवळ ११०० इतर शास्त्रज्ञांच्या बाबतीत काय ? या शास्त्रज्ञांची नावे पेपरच्या सुरवातीला न देता शेवटी नमूद केलेली आहेत (संदर्भ: Physical Review Letters 116 (2016) 061102) कारण त्यांची नावे देण्यासाठी लागली होती तीन पृष्ठांची दीर्घ सूची ! प्रश्न या महत्वाच्या मुलभूत शोधात कितीजण सहभागी आहेत याचा नसेलही कदाचित पण ज्या शोधामध्ये त्यातील अनेकांनी आपली पूर्ण आयुष्ये अर्पण केली त्यांच्या नावाची दखल घेतली जात नाही हे मात्र नक्की..
खगोलशास्त्रज्ञ मार्टिन रीस यांनी बीबीसी न्यूजला सांगितले की, "एलआयजीओ चे यश शेकडो संशोधकांना जाते." आणि पुढे म्हणाले "२०१७ च्या नोबेल पुरस्कार समितीने ग्रुप पुरस्कारांना नकार दिल्याने वारंवार समस्या उद्भवल्या आहेत आणि कित्येक विज्ञानाचे कार्य प्रत्यक्षात कसे केले असावे याविषयी भ्रामक ठसा दिला आहे." हे परावर्तन परिचित आहे. प्रत्येक वर्षी, जेव्हा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि फिजिओलॉजी किंवा मेडिसिन मध्ये नोबेल पुरस्कार दिले जातात, तेव्हा समीक्षकांच्या हे लक्षात येते की यामध्ये शास्त्रज्ञांना त्यांच्या कामाबद्दल ओळखण्याची एक बेजबाबदार आणि अनैसर्गिक पद्धत आहे. विज्ञानाचा सन्मान करण्याऐवजी, ते त्याचे स्वरूप विकृत करतात, त्याचा इतिहास पुन्हा लिहितात आणि अनेक महत्वाच्या योगदानकर्त्यांना दुर्लक्षीत करतात.
बक्षिसांबद्दल बोलायचे तर या खात्रीने चांगल्या गोष्टी आहेत. वैज्ञानिक शोध हे मानवी उपक्रमांमधले महत्त्वाचे भाग म्हणून ओळखले जावे. नोबेल पारितोषिकाची वेबसाइट ही एक शैक्षणिक खजिना आहे की जिथे प्रसिद्ध ऐतिहासिक तपशील भरभरून दिलेले आहेत की जे प्रकाशित पेपर्सपासून गायब आहेत. आणि वर्षानुवर्षे, एखाद्या घटनेबद्दल विज्ञानाला अशीच प्रकर्षाने वाट पाहवी लागते की जी सामान्यत: ऑस्कर किंवा एम्मी नॉमिनेशनसाठी राखीव असते, हे सगळं अगदी उपहासात्मक आहे. पण वैज्ञानिक नोबेलनी अगदी सुरुवातीपासूनच खोल-मुळांच्या समस्यांवर इशारा दिल्यापासून वाद निर्माण झाला आहे.
अँटिटॉक्सिनच्या शोधासाठी एमिल्स वॉन बेहरिंग यांना मेडिसिनमधील १९०१ चे पहिले नोबेल देण्यात आले परंतु त्यांचे जवळचे सहकारी शिबासाबुरो किटासाटो यांना मात्र विचारात घेतले नाही. १९५२ साली मेडिसिन आणि फिजिओलॉजी चे नोबेल स्ट्रेप्टोमायसिन या प्रतिजैविकचा शोध घेण्यासाठी सेलमन वॉक्समन यांना देण्यात आले. यावेळी वॉक्समनचे पदवीधर विद्यार्थी अल्बर्ट शाट्स, ज्यांनी प्रत्यक्षात हे रसायन शोधले, यांना दुर्लक्षीत केले. २००८ मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक ग्रीन फ्लूरोसन्ट प्रोटीन (जीएफपी) च्या शोधाकरिता तीन संशोधकांना देण्यात आले. तेव्हा सामान्यतः जीएफपी हा परमाणु इतर शास्त्रज्ञ आपल्या पेशींमधील हालचालीचे निरीक्षण करण्यासाठी वापरत. डग्लस प्राशर, की ज्याने जीएफपीसाठी जनुकांची प्रथम क्लोन केले, याचा त्या तीनात समावेश नव्हता.
जर त्यांनी आधीपासूनच मूळ नियमांना झुकवले असेल, तर आणखी पुढे का जाऊ नये?
काही प्रकरणांमध्ये स्वतःचे नाव वगळल्याबद्दल लोकांनी विरोध केला होता. २००३ मध्ये मॅग्नेटीक रेसॉनन्स इमॅजींगच्या शोधातील रे दामियायन यांना कमिटीने चुकीच्या पद्धतीने मेडिसिनमधील नोबेल पुरस्कारातून वगळले होते. मग त्यास विरोध करण्यासाठी रे दामियायन यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांत पूर्णपान भरून जाहिरातींची मालिका काढली होती. त्यावेळेस नोबेल समितीने फक्त पॉल लॅटरबर आणि पीटर मॅन्सफिल्ड यांचीच निवड केली होती. तेव्हा दामादियन यांना वगळणे ही "लज्जास्पद चुक आहे आणि ती दुरुस्त व्हायलाच हवी" असा सूर निघाला होता. "सोमवारी सकाळी मी जागा झालो आणि माझ्या लक्षात आले की माझे नाव इतिहासातून पुसून टाकले आहे याचे मला अतीव दु:ख होत आहे आणि ते घेवून मी जगूच शकत नाही" असे नंतर त्यांनी लॉस एंजेलिस टाइम्सला सांगितले.
प्रत्येक वर्षी वैज्ञानिक नोबेलच्या बक्षिसासाठी जास्तीत जास्त तीन पुरस्कार विजेते ठरवतात. त्यामुळे पारितोषिकासाठी कोणत्या तिघांना निवडावे ही एक विचित्र समस्या बनली आहे. इव्हान ऑरानस्की आणि अॅडम मार्कस यांनी स्टॅटमध्ये लिहिलेले आहे की आधुनिक विज्ञान हे "टीम स्पोर्ट्सचा टीमियेस्ट" आहे. होय, काहीवेळा संशोधक एकटाच शोध लावतो, परंतु हे दुर्मिळ आहे. अशामुळे जरी एका संशोधन गटामध्ये पोस्टडॉक्स्, विद्यार्थी आणि तंत्रज्ञांची एक तुकडी नाविन्यपूर्ण शोधामध्ये सहभागी असली तरी संपूर्ण शोधाचे श्रेय फक्त एका संशोधकास मिळते आणि बहुतेक वेळा अनेक ग्रुप एकाच प्रकल्पावर काम करतात. आणि फिजीकल रिव्हिव लेटर्स मधील ज्या शोधनिबंधाने एलआयजीओ टीमने आपला शोध जाहीर केला तीत तीन पानांची लेखक सूची आहे. आणखी एक अलीकडील शोधनिबंध, ज्याद्वारे हिग्ज बोसॉनच्या वस्तुमानाचा अचूक अंदाज वर्तवला होता, त्यामध्ये ५१५४ लेखक आहेत.
नोबेल पुरस्काराचे पाठीराखे -नोबेल कमिटी अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छापत्रात घालून दिलेल्या नियमांनुसार पुरस्कार प्रदान करते- असा सूर धरतात. तसं असल्यास नोबेल यांच्या इच्छापत्रानुसार हा पुरस्कार एक "व्यक्ती" -एकटा- ओळख पुरस्कार म्हणून ज्याने "मागील वर्षभरात" आपल्या संशोधन क्षेत्रात महत्वपूर्ण शोध लावला आहे त्यालाच दिला जावा असे म्हंटले आहे. याउलट नोबेल कमिटी या पुरस्काराची शिफारस जास्तीत जास्त तीन व्यक्तींपर्यंत दहा वर्षांपूर्वी लावलेल्या शोधासाठी करते. जर ते आधीपासूनच मूळ नियमांना झुकवत असतील, तर आणखी थोडं पुढ का जाऊ नये? २०१२ मध्ये सायंटिफिक अमेरिकनच्या संपादकांनी सुचविल्याप्रमाणे, शांततेच्या नोबेल पुरस्कारासारखेच वैज्ञानिक नोबेल पुरस्कार देखील टिम आणि संस्थांना का दिले जाऊ नये?
यामध्ये सुधारणा करायला कदाचित कमी किंमत चुकवावी लागेल पण हे टाळल्यामुळे नक्कीच जादा किंमत मोजावी लागत आहे. २०१३ साली आर्टूरो कॉसाडेव्हल आणि फेरिक फॅंग हे जीवशास्त्रज्ञ लिहितात की नोबेलने जरी एकमेव अलौकिक बुद्धिमत्तेची कल्पना मांडली असली तरी तत्त्ववेत्ते थॉमस कार्लाईल यांनी "जगाचा इतिहास म्हणजे महान पुरुषांचे चरित्र आहे" - असे याचे स्पष्टीकरण दिले होते.. नोबेल यांनी या अविज्ञाननिष्ठ आणि अपायकारक पुराण कथेस भरीस घालले आहे. असं केल्यामुळे कॅसॅदवेल आणि फॅंग म्हणतात, ते "विज्ञानातील एक सदोष बक्षीसप्रणाली मजबूत करतात ज्यात विजेता सर्वकाही घेतो आणि बऱ्याच लोकांच्या योगदानांकडे दुर्लक्ष करून त्यांना दुर्लक्षीत केले जाते." तसं बघीतलं तर, बक्षिसे शोधामध्ये कोणी महत्वाचे योगदान दिले याबद्दल नाहीतच मुळी, परंतु शैक्षणिक संस्थांच्या घातक घोटाळय़ांमधून सुखरूपपणे जो वाचला आहे त्याच्यासाठी आहेत असे वाटते.
३ ऑक्टोबर २०१७ रोजी यावर्षीचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक रेनर वीस, किप एस. थॉर्ने आणि बॅरी सी. बरीश या शास्त्रज्ञांना संयुक्तपणे देण्याचे जाहीर झाले आहे. लेझर इंटरफेरॉमीटर ग्रेविटेशनल-वेव ऑब्झर्वेटरी (एलआयजीओ) प्रकल्पाचे नेतृत्व करत या तिघांनी गुरुत्वलहरींचा शोध लावला होता. त्या तिघांमध्ये ९० लाख-स्वीडिश-क्रोन (अंदाजे ७ कोटी २५ लाख रुपये) च्या बक्षीसाचे विभाजन होईल. कदाचित सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे तिघेजण त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी "२०१७ चे नोबेल पुरस्कार विजेते" म्हणून ओळखले जातील. पण एलआयजीओ प्रोजेक्टमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या १३३ संशोधन संस्थांमधील जवळजवळ ११०० इतर शास्त्रज्ञांच्या बाबतीत काय ? या शास्त्रज्ञांची नावे पेपरच्या सुरवातीला न देता शेवटी नमूद केलेली आहेत (संदर्भ: Physical Review Letters 116 (2016) 061102) कारण त्यांची नावे देण्यासाठी लागली होती तीन पृष्ठांची दीर्घ सूची ! प्रश्न या महत्वाच्या मुलभूत शोधात कितीजण सहभागी आहेत याचा नसेलही कदाचित पण ज्या शोधामध्ये त्यातील अनेकांनी आपली पूर्ण आयुष्ये अर्पण केली त्यांच्या नावाची दखल घेतली जात नाही हे मात्र नक्की..
खगोलशास्त्रज्ञ मार्टिन रीस यांनी बीबीसी न्यूजला सांगितले की, "एलआयजीओ चे यश शेकडो संशोधकांना जाते." आणि पुढे म्हणाले "२०१७ च्या नोबेल पुरस्कार समितीने ग्रुप पुरस्कारांना नकार दिल्याने वारंवार समस्या उद्भवल्या आहेत आणि कित्येक विज्ञानाचे कार्य प्रत्यक्षात कसे केले असावे याविषयी भ्रामक ठसा दिला आहे." हे परावर्तन परिचित आहे. प्रत्येक वर्षी, जेव्हा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि फिजिओलॉजी किंवा मेडिसिन मध्ये नोबेल पुरस्कार दिले जातात, तेव्हा समीक्षकांच्या हे लक्षात येते की यामध्ये शास्त्रज्ञांना त्यांच्या कामाबद्दल ओळखण्याची एक बेजबाबदार आणि अनैसर्गिक पद्धत आहे. विज्ञानाचा सन्मान करण्याऐवजी, ते त्याचे स्वरूप विकृत करतात, त्याचा इतिहास पुन्हा लिहितात आणि अनेक महत्वाच्या योगदानकर्त्यांना दुर्लक्षीत करतात.
बक्षिसांबद्दल बोलायचे तर या खात्रीने चांगल्या गोष्टी आहेत. वैज्ञानिक शोध हे मानवी उपक्रमांमधले महत्त्वाचे भाग म्हणून ओळखले जावे. नोबेल पारितोषिकाची वेबसाइट ही एक शैक्षणिक खजिना आहे की जिथे प्रसिद्ध ऐतिहासिक तपशील भरभरून दिलेले आहेत की जे प्रकाशित पेपर्सपासून गायब आहेत. आणि वर्षानुवर्षे, एखाद्या घटनेबद्दल विज्ञानाला अशीच प्रकर्षाने वाट पाहवी लागते की जी सामान्यत: ऑस्कर किंवा एम्मी नॉमिनेशनसाठी राखीव असते, हे सगळं अगदी उपहासात्मक आहे. पण वैज्ञानिक नोबेलनी अगदी सुरुवातीपासूनच खोल-मुळांच्या समस्यांवर इशारा दिल्यापासून वाद निर्माण झाला आहे.
अँटिटॉक्सिनच्या शोधासाठी एमिल्स वॉन बेहरिंग यांना मेडिसिनमधील १९०१ चे पहिले नोबेल देण्यात आले परंतु त्यांचे जवळचे सहकारी शिबासाबुरो किटासाटो यांना मात्र विचारात घेतले नाही. १९५२ साली मेडिसिन आणि फिजिओलॉजी चे नोबेल स्ट्रेप्टोमायसिन या प्रतिजैविकचा शोध घेण्यासाठी सेलमन वॉक्समन यांना देण्यात आले. यावेळी वॉक्समनचे पदवीधर विद्यार्थी अल्बर्ट शाट्स, ज्यांनी प्रत्यक्षात हे रसायन शोधले, यांना दुर्लक्षीत केले. २००८ मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक ग्रीन फ्लूरोसन्ट प्रोटीन (जीएफपी) च्या शोधाकरिता तीन संशोधकांना देण्यात आले. तेव्हा सामान्यतः जीएफपी हा परमाणु इतर शास्त्रज्ञ आपल्या पेशींमधील हालचालीचे निरीक्षण करण्यासाठी वापरत. डग्लस प्राशर, की ज्याने जीएफपीसाठी जनुकांची प्रथम क्लोन केले, याचा त्या तीनात समावेश नव्हता.
जर त्यांनी आधीपासूनच मूळ नियमांना झुकवले असेल, तर आणखी पुढे का जाऊ नये?
काही प्रकरणांमध्ये स्वतःचे नाव वगळल्याबद्दल लोकांनी विरोध केला होता. २००३ मध्ये मॅग्नेटीक रेसॉनन्स इमॅजींगच्या शोधातील रे दामियायन यांना कमिटीने चुकीच्या पद्धतीने मेडिसिनमधील नोबेल पुरस्कारातून वगळले होते. मग त्यास विरोध करण्यासाठी रे दामियायन यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांत पूर्णपान भरून जाहिरातींची मालिका काढली होती. त्यावेळेस नोबेल समितीने फक्त पॉल लॅटरबर आणि पीटर मॅन्सफिल्ड यांचीच निवड केली होती. तेव्हा दामादियन यांना वगळणे ही "लज्जास्पद चुक आहे आणि ती दुरुस्त व्हायलाच हवी" असा सूर निघाला होता. "सोमवारी सकाळी मी जागा झालो आणि माझ्या लक्षात आले की माझे नाव इतिहासातून पुसून टाकले आहे याचे मला अतीव दु:ख होत आहे आणि ते घेवून मी जगूच शकत नाही" असे नंतर त्यांनी लॉस एंजेलिस टाइम्सला सांगितले.
प्रत्येक वर्षी वैज्ञानिक नोबेलच्या बक्षिसासाठी जास्तीत जास्त तीन पुरस्कार विजेते ठरवतात. त्यामुळे पारितोषिकासाठी कोणत्या तिघांना निवडावे ही एक विचित्र समस्या बनली आहे. इव्हान ऑरानस्की आणि अॅडम मार्कस यांनी स्टॅटमध्ये लिहिलेले आहे की आधुनिक विज्ञान हे "टीम स्पोर्ट्सचा टीमियेस्ट" आहे. होय, काहीवेळा संशोधक एकटाच शोध लावतो, परंतु हे दुर्मिळ आहे. अशामुळे जरी एका संशोधन गटामध्ये पोस्टडॉक्स्, विद्यार्थी आणि तंत्रज्ञांची एक तुकडी नाविन्यपूर्ण शोधामध्ये सहभागी असली तरी संपूर्ण शोधाचे श्रेय फक्त एका संशोधकास मिळते आणि बहुतेक वेळा अनेक ग्रुप एकाच प्रकल्पावर काम करतात. आणि फिजीकल रिव्हिव लेटर्स मधील ज्या शोधनिबंधाने एलआयजीओ टीमने आपला शोध जाहीर केला तीत तीन पानांची लेखक सूची आहे. आणखी एक अलीकडील शोधनिबंध, ज्याद्वारे हिग्ज बोसॉनच्या वस्तुमानाचा अचूक अंदाज वर्तवला होता, त्यामध्ये ५१५४ लेखक आहेत.
नोबेल पुरस्काराचे पाठीराखे -नोबेल कमिटी अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छापत्रात घालून दिलेल्या नियमांनुसार पुरस्कार प्रदान करते- असा सूर धरतात. तसं असल्यास नोबेल यांच्या इच्छापत्रानुसार हा पुरस्कार एक "व्यक्ती" -एकटा- ओळख पुरस्कार म्हणून ज्याने "मागील वर्षभरात" आपल्या संशोधन क्षेत्रात महत्वपूर्ण शोध लावला आहे त्यालाच दिला जावा असे म्हंटले आहे. याउलट नोबेल कमिटी या पुरस्काराची शिफारस जास्तीत जास्त तीन व्यक्तींपर्यंत दहा वर्षांपूर्वी लावलेल्या शोधासाठी करते. जर ते आधीपासूनच मूळ नियमांना झुकवत असतील, तर आणखी थोडं पुढ का जाऊ नये? २०१२ मध्ये सायंटिफिक अमेरिकनच्या संपादकांनी सुचविल्याप्रमाणे, शांततेच्या नोबेल पुरस्कारासारखेच वैज्ञानिक नोबेल पुरस्कार देखील टिम आणि संस्थांना का दिले जाऊ नये?
यामध्ये सुधारणा करायला कदाचित कमी किंमत चुकवावी लागेल पण हे टाळल्यामुळे नक्कीच जादा किंमत मोजावी लागत आहे. २०१३ साली आर्टूरो कॉसाडेव्हल आणि फेरिक फॅंग हे जीवशास्त्रज्ञ लिहितात की नोबेलने जरी एकमेव अलौकिक बुद्धिमत्तेची कल्पना मांडली असली तरी तत्त्ववेत्ते थॉमस कार्लाईल यांनी "जगाचा इतिहास म्हणजे महान पुरुषांचे चरित्र आहे" - असे याचे स्पष्टीकरण दिले होते.. नोबेल यांनी या अविज्ञाननिष्ठ आणि अपायकारक पुराण कथेस भरीस घालले आहे. असं केल्यामुळे कॅसॅदवेल आणि फॅंग म्हणतात, ते "विज्ञानातील एक सदोष बक्षीसप्रणाली मजबूत करतात ज्यात विजेता सर्वकाही घेतो आणि बऱ्याच लोकांच्या योगदानांकडे दुर्लक्ष करून त्यांना दुर्लक्षीत केले जाते." तसं बघीतलं तर, बक्षिसे शोधामध्ये कोणी महत्वाचे योगदान दिले याबद्दल नाहीतच मुळी, परंतु शैक्षणिक संस्थांच्या घातक घोटाळय़ांमधून सुखरूपपणे जो वाचला आहे त्याच्यासाठी आहेत असे वाटते.
आणि काही वेळेस नोबेल पुरस्काराविना हे जग सोडलेले सुद्धा अनेकजण आहेत कारण नोबेल फक्त हयात असणाऱ्यांनाच दिले जाते. नोबेल मरणोत्तर प्रदान करता येत नाही. म्हणून रॉसलीन फ्रॅंकलीन यांनी डीएनएची डबल हेलिकल रचना शोधूनही त्यांना नोबेल मिळाले नाही कारण त्या शोधास जेम्स वॉटसन, फ्रान्सिस क्रिक आणि मॉरिस विल्किन्स यांना नोबेल मिळण्यापूर्वी चार वर्षे त्या मरण पावल्या होत्या. खगोलशास्त्रज्ञ वेरा रुबिन यांनी आकाशगंगा कशा प्रकारे फिरतात याविषयी अभ्यास करून कृष्णविवरेंच्या अस्तित्वाचा पुरावा दिला होता की ज्या शोधामुळे विश्वाची संकल्पना समजण्याच्या कल्पनेत अमुलाग्र बदल झाला होता. ऑक्टोबर २०१६ मध्ये विज्ञान लेखक राचेल फेल्टमन म्हणाले होते की, "वेरा रुबिन नोबेलच्या हक्कदार आहेत, पण कदाचित ते त्यांना वेळेत मिळणार नाही". दोन महिन्यांनंतरच रूबिन यांचा मृत्यू झाला.
रुबिन आणि फ्रँकलिन यांनी नोबेलबद्दलची आणखी एक दीर्घकालीन समस्या मांडली. ते लिहितात "आम्हाला लक्षात ठेवायला हवे की विजेत्यांचे लोकसंख्याशास्त्र संरचनात्मक कल प्रतिबिंबित करतात आणि त्यांचा विस्तार करतात". जितके जास्त ते एकमेव अलौकिक बुद्धिमत्तेचा पुरावा देतात, तितकाच नेहमीच प्रतिभावान हे गोरे आणि पुरुषच असतात याचाही पुरावा देतात. फिजियोलॉजी किंवा मेडिसिनमध्ये आत्तापर्यंतच्या २१४ बक्षिसेंपैकी केवळ १२, रसायनशास्त्रातील १७५ पैकी ४ तर भौतिकशास्त्रातील २०४ पैकी फक्त २ महिलांनी नोबेल्स जिंकली आहेत. भौतिकशास्त्रातील महिला मारीया गोएपेर्ट मायर यांनी अगदी अलीकडे म्हणजे ५६ वर्षापूर्वी नोबेल पुरस्कार मिळवला आहे. हे संभाव्य सन्मानमूर्तींच्या कमतरतेमुळे नक्कीच नसावे. रब्बीन देखील एका नोबेलसाठी पात्र होते, तसेच लुइस मायटनर ज्यांनी लौरेट ओटो हॅन यांच्यासोबत आण्विक विखंडनाचा शोध लावला होता यांचा देखील त्या नोबेलवर हक्क होता. १९३७ ते १९६५ दरम्यान मायटनर यांना वेगवेगळ्या लोकांद्वारे नोबेलसाठी ४८ वेळा नामांकन मिळाले होते परंतू दुर्दैवाने त्यांना ते कधीच मिळाले नाही. "नोबेल पारितोषिके ह्या महान गोष्टी आहेत परंतु विजेत्यांचे लोकसंख्याशास्त्र संरचनात्मक कल प्रतिबिंबित करतात आणि त्यांचा विस्तार करतात- हे आपणास लक्षात ठेवायला हवे"- खगोलशास्त्रज्ञ केटी मॅक यांनी गेल्याचवर्षी ट्विटरवर सांगितले.
कदाचित नोबेल इतका मोठा करार नसता तर यापैकी कशातही फारसा फरक पडला नसता. पारितोषिकांच्या आर्थिक मूल्यापलीकडे, पुरस्कार विजेत्यांना अक्षरशः किफायतशीर बोलणा-या प्रवाहांची हमी दिली जाते. त्यांच्या पेपर्सना अधिक उद्धरणे मिळतात. ते नामनिर्देशित झालेल्या लोकांपेक्षा एक दोन वर्षे जादा जगतात पण प्रत्यक्षात विजयी कधीच होत नाहीत. आणि नोबेल पुरस्कार त्यांना त्यांच्या महानतेच्या कायम छापासाठी प्रेरक म्हणून काम करतात. नोबेल पारितोषिक म्हणजे मॅकार्थरच्या प्रतिभेचे अनुदान नाही की जे "त्यांच्या कामात अपवादात्मक कृतिशीलता दर्शवितात" अशांनाच मिळते. ते एखाद्या विशिष्ट शोधाची ओळख म्हणून रहाते. आणि तरीही शोधक, स्वतःच्या अधिकारात, संशोधनातील ऐतिहासिक योगदान आणि आपले संपूर्ण कायमस्वरूपी विचार यात साधर्म्य निर्माण करणारे एक बौद्धिक शक्ती केंद्र म्हणून कायमचा ओळखला जातो.
एखादा नोबेलवीर जेव्हा प्सूडोसायन्स किंवा हटवादाचा विजेता बनतो तेव्हा मात्र समस्या निर्माण होतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. ट्रान्सिजिस्टरचे जनक विल्यम शॉकली, ज्यांना ट्रान्सिजिस्टरच्या शोधाबद्दल १९५६ चे भौतीकशास्त्रातील नोबेल मिळाले होते, की जे पुढे युजिनिक्सचे प्रवर्तक बनले त्यांनी काय म्हणावे - "कमी बुद्धिमत्ता असलेले लोक-प्रामुख्याने आफ्रिकन अमेरिकन- यांचे निर्जंतुकीकरण करावे". दुसरे नोबेलवीर जेम्स वॉटसनचा यांचादेखील दावा आहे की आफ्रिकन लोक सरासरीपेक्षा कमी बुद्धिमान आहेत. कॅरी म्युलिस, ज्यांना डीएनएचे पिसीआर तंत्र, जे जगभरातील प्रत्येक जीवशास्त्र प्रयोगशाळेत वापरण्यात येते, विकसित केल्याबद्दल, १९९३ चे रसायनशास्त्रातील नोबेल मिळाले होते, ज्यांनी मानवनिर्मित हवामानातील बदल आणि एचआयव्ही आणि एड्स यांच्यातील दुवा नाकारला, डीसीएनच्या ज्योतिषशास्त्राचे मुखर प्रवर्तक बनले. त्यांनी एका आत्मचरित्रात लिहिले आहे की, त्यांना एकदा एक चमकदार रॅकून (उत्तर अमेरिकेत आढळणारा लांब शेपटीचा व अंगावर दाट केस असलेला मांसभक्षक प्राणी) सापडला जो कदाचित परदेशी नव्हता किंवा नसू शकेल.
निष्पक्षतेने बोलता, एखाद्या वर्षात किती शास्त्रज्ञांना नोबेलने पुरस्कृत करावे या समस्येप्रमाणे किती नोबेलवीर वाह्यात जातात हा प्रश्न कोणतीही नोबेल समिती सोडवू शकत नाही. नोबेल पारितोषिकाकडे वैज्ञानिक मूल्यांचे देव्हारेपण म्हणून पाहवे की नाही हे आपल्यावर आहे. तर ते तस् नाही, इतर बक्षीसांप्रमाणे हेदेखील दोषसहित आणि व्यक्तिपरक आहे. हे समजावून घेताना, नोबेलवीरांच्या अहंकाराचा आम्ही अतिरेक करतो आणि ज्यांना त्याने हुलकावणी दिली त्यांना आपण कमकुवत करतो. गेल्यावर्षी विज्ञान लेखक मैथ्यू फ्रान्सिस यांनी लिहिले: "शेवटी, नोबेल पारितोषिकांचा नाश करायाचा का ते सर्वस्वी आपल्यावर आहे. ते आपल्या विज्ञानाच्या समजीवर राज्य करीत आहेत आणि हे सारं आमच्या संमतीने कसे केले जाते, की ज्याविषयीची संमती आम्ही कधीच काढून घेतली आहे."
शब्दांकन: केशव राजपुरे
The Absurdity of the Nobel Prizes in Science
- ED YONG OCT 3, 2017
Thursday, September 14, 2017
ग्रुपअड्मीन
व्हाट्सएप ग्रुपअड्मीन : एक आव्हान
आपण एखाद्या व्हाट्सएप ग्रुपचा अड्मीन असल्यास आपल्या भूमिकेचा विचार केला पाहिजे. व्हाट्सएप ग्रुपचाट आणि सोशल नेटवर्क साईट मध्ये अग्रेसर माध्यम आहे. त्यात ग्रुप अड्मीन फारच महत्वाचा घटक. तोच असा माणूस असतो की त्याला माणसे एकत्र यावीत असे वाटते. खरच त्याचा उद्देश हा प्रामाणिक असतो की चार टाळकी एकत्र आली तर काहीतरी समाजोपयोगी कार्य करता येईल. माणसांना एकत्र आणण्यासाठी हे एक महत्वाचे व्यासपीठ असतेच. तोच माणूस असतो की त्याच्या ग्रुप मधील सभासद चून चून के निवडतो. सुरुवातीला ही निवड करताना तसे कमी आडाखे किवा मापदंड असतात कारण सभासदांची संख्या मर्यादित असते. जस जसा ग्रुप फुगू लागतो तस तसा अड्मीन निवडक होतो.
सुविचारांची देवाण-घेवाण करणं, या ताणतणावयुक्त जगात ध्यान धारणा करणं तसेच स्वतःला व्यक्त करण्यासाठीच फार उपयुक्त माध्यम म्हणजे व्हाट्सएप आणि व्हाट्सएप ग्रुप्स ! कित्येक लेखक आणि कवी या गॅझेटमुळेच जन्माला आले आहेत ही फार मोठी जमेची बाजू आहे. नवोदितांसाठी खूप काही शिकण्याचं व्यासपीठ तर आहेच पण एक चांगलं व्यक्तीमत्व घडवण्यात या गॅझेटचा मोठा हातभार होवू शकतो !
सुरुवातीला सभासद निवडताना सभासदांची पार्श्वभूमी (शिक्षण, व्यवसाय, मित्रपरिवार इ) तेव्हढी महत्वाची वाटत नाही. याची निवड निव्वळ त्याच्या सोशल नेटवर्किंग साईट वरील सक्रीयतेवर केली जाते. त्याने आपल्या पोस्ट्सना दिलेल्या प्रतिक्रियेवरून त्याची एक मनात प्रतिमा तयार झालेली असते. त्या प्रतिक्रिया बनावट किंवा वास्तविक याचाही विचार तेव्हा नसतो. तो आपला पाठलाग करतो आणि आपण त्याचा. अलीकडे सदस्याबद्दलची माहिती त्याच्या फेसबुक प्रोफाइलवरून सत्यापित केली जाते. कोण जाणे दाखवायचा चेहरा खऱ्यापेक्षा वेगळाच निघाला तर ! नंतर समूहात सदस्यांची जोडणी दर कमी होतो. ग्रुप वास्तविक अर्थाने सक्रिय होतो. अड्मीनला आपण व्हाट्सएप ग्रुप च्या माध्यमातून करत असलेल्या कार्याचा अभिमान वाटायला लागतो.
शुभप्रभात / शुभरात्री चे संदेश, उत्सव, राष्ट्रीय सणांच्या शुभेच्छा, वाढदिवस साजरा करणे यासारख्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जाते. लोक एकत्र करून विचार एकत्र आणायची प्रक्रिया सुरू होते. मोठे सामाजिक समूह समाजसेवेच्या पाठीमागे लागतात. लोकांपेक्षा विचारांना एकत्र करणे नेहमीच अवघड असते.. दुर्दैवाने काहीतरी घटना घडते आणि संपूर्ण ग्रुपची परिस्थिती बदलते. त्या घटनेवर शेकडो लेख शेयर केले जातात. हजारो प्रतिक्रिया पाठवल्या जातात. तासंतास ग्रुपवर चर्चा चालते. यातून विचारांचे ध्रुवीकरण व्हायला लागते आणि विचारांपाठोपाठ माणसांचे ध्रुवीकरण ! ज्या सामाजिक उद्देशाने माणसे एकत्र आलेली असतात तो कधी बाजूला गेला तेच कळत नाही. कधीकधी जाती धर्मावर आधारित पक्षपाती ध्रुवीकरण होते त्याचे वाईट वाटते. माणसे मग सोयीस्कररीत्या विचार बदलतात. त्याची चर्चा ग्रुपवर. मनं विटतात इतक्या चर्चा ताणल्या जातात. बिच्चारा ग्रुपअड्मीन हे तटस्थपणे बघत असतो ! त्याला क्षणभर विचार पटतात, दुसऱ्याक्षणी पटत नाहीत. तळ्यात मळ्यात अशी परिस्थिती !
कधीकधी पोस्टच्या प्रकारावर वादविवाद होतात. काहीवेळा पोस्टची पुनरावृत्ती होते, काही न्यायप्रविष्ट तर काही धार्मिकता सांगणाऱ्या पोस्ट्स मुळे ग्रुपमध्ये वादविवाद सुरू होतात. ग्रुपअड्मीनला सभासदांच्या आक्षेपार्ह पोस्ट्ससाठी तुरुंगात टाकला जावू शकतो- हे वारंवार सांगितलेही जाते. मग ग्रुप अड्मीन सर्व सभासदांना वैयक्तिक चर्चा न करता सबुरीने घ्यायचे जाहीर आवाहन वैगेरे करतो. काही सदस्यांनी अशा सूचना वैयक्तिक वाटू लागतात आणि ग्रुप अस्थिर व्हायला लागतो. त्याला माहीत असते की कोणाच्याही धार्मिक भावनांवर परिणाम करणारे कोणतेही विधान किंवा पोस्टस ग्रुपवर टाकणे गुन्हा आहे आणि असं काही घडल्यास आपण नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. अशा स्थितीत ग्रुप अड्मीन पोलिसांच्या रडारखाली येतो आणि सायबर गुन्हा कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि आयपीसी अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. अड्मीन ची परिस्थिती फारच विचित्र होते. त्याला आता हळू हळू वाटू लागते की हा ग्रुप तयार केला नसता तर बरा झाल असत वगैरे ..
मानवजातीच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या फायद्यासाठी तसेच विकासाठी अशा सुविधांचा उपयोग केला जाऊ शकतोय. लोकांना एकत्र आणून चर्चेस एक महत्वाचं व्यासपीठ तयार केल जाऊ शकतय. विचार बदलू शकतात. अशा ग्रुपद्वारे विचारांवर विचार करता येतात. एकीची शक्ती अन्यायाविरुद्ध लढा उभारण्यासाठी तसेच विधायक कार्य घडवून आणण्यास वापरता येते. वायफळ चर्चा, मतभेद, मतांचे ध्रुवीकरण, आंदोलने यामुळे ग्रुपविषयी आगडपाखाड न करता निराशा बाजूला ठेवायला पाहिजे या ग्रुप अड्मीननी. ग्रुपमध्ये मतैक्य राखण्यासाठी त्याच्या कौशल्यांचा उपयोग करायाला हवा. वेळी एकाद्यास समयसूचक शिक्षा का द्यायची होईना पण लोकहितासाठी अशा चागल्या उपक्रमांमध्ये बाधा येणार नाही हे त्यांनी बघावं. जश्या "व्यक्ती तितक्या प्रवृत्ती" तसंच जमाव नियंत्रित ठेवण ही सुद्धा एक कला आहे. ही ज्याला जमली तो खरा अड्मीन !
- प्रा. केशव राजपुरे
आपण एखाद्या व्हाट्सएप ग्रुपचा अड्मीन असल्यास आपल्या भूमिकेचा विचार केला पाहिजे. व्हाट्सएप ग्रुपचाट आणि सोशल नेटवर्क साईट मध्ये अग्रेसर माध्यम आहे. त्यात ग्रुप अड्मीन फारच महत्वाचा घटक. तोच असा माणूस असतो की त्याला माणसे एकत्र यावीत असे वाटते. खरच त्याचा उद्देश हा प्रामाणिक असतो की चार टाळकी एकत्र आली तर काहीतरी समाजोपयोगी कार्य करता येईल. माणसांना एकत्र आणण्यासाठी हे एक महत्वाचे व्यासपीठ असतेच. तोच माणूस असतो की त्याच्या ग्रुप मधील सभासद चून चून के निवडतो. सुरुवातीला ही निवड करताना तसे कमी आडाखे किवा मापदंड असतात कारण सभासदांची संख्या मर्यादित असते. जस जसा ग्रुप फुगू लागतो तस तसा अड्मीन निवडक होतो.
सुविचारांची देवाण-घेवाण करणं, या ताणतणावयुक्त जगात ध्यान धारणा करणं तसेच स्वतःला व्यक्त करण्यासाठीच फार उपयुक्त माध्यम म्हणजे व्हाट्सएप आणि व्हाट्सएप ग्रुप्स ! कित्येक लेखक आणि कवी या गॅझेटमुळेच जन्माला आले आहेत ही फार मोठी जमेची बाजू आहे. नवोदितांसाठी खूप काही शिकण्याचं व्यासपीठ तर आहेच पण एक चांगलं व्यक्तीमत्व घडवण्यात या गॅझेटचा मोठा हातभार होवू शकतो !
सुरुवातीला सभासद निवडताना सभासदांची पार्श्वभूमी (शिक्षण, व्यवसाय, मित्रपरिवार इ) तेव्हढी महत्वाची वाटत नाही. याची निवड निव्वळ त्याच्या सोशल नेटवर्किंग साईट वरील सक्रीयतेवर केली जाते. त्याने आपल्या पोस्ट्सना दिलेल्या प्रतिक्रियेवरून त्याची एक मनात प्रतिमा तयार झालेली असते. त्या प्रतिक्रिया बनावट किंवा वास्तविक याचाही विचार तेव्हा नसतो. तो आपला पाठलाग करतो आणि आपण त्याचा. अलीकडे सदस्याबद्दलची माहिती त्याच्या फेसबुक प्रोफाइलवरून सत्यापित केली जाते. कोण जाणे दाखवायचा चेहरा खऱ्यापेक्षा वेगळाच निघाला तर ! नंतर समूहात सदस्यांची जोडणी दर कमी होतो. ग्रुप वास्तविक अर्थाने सक्रिय होतो. अड्मीनला आपण व्हाट्सएप ग्रुप च्या माध्यमातून करत असलेल्या कार्याचा अभिमान वाटायला लागतो.
शुभप्रभात / शुभरात्री चे संदेश, उत्सव, राष्ट्रीय सणांच्या शुभेच्छा, वाढदिवस साजरा करणे यासारख्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जाते. लोक एकत्र करून विचार एकत्र आणायची प्रक्रिया सुरू होते. मोठे सामाजिक समूह समाजसेवेच्या पाठीमागे लागतात. लोकांपेक्षा विचारांना एकत्र करणे नेहमीच अवघड असते.. दुर्दैवाने काहीतरी घटना घडते आणि संपूर्ण ग्रुपची परिस्थिती बदलते. त्या घटनेवर शेकडो लेख शेयर केले जातात. हजारो प्रतिक्रिया पाठवल्या जातात. तासंतास ग्रुपवर चर्चा चालते. यातून विचारांचे ध्रुवीकरण व्हायला लागते आणि विचारांपाठोपाठ माणसांचे ध्रुवीकरण ! ज्या सामाजिक उद्देशाने माणसे एकत्र आलेली असतात तो कधी बाजूला गेला तेच कळत नाही. कधीकधी जाती धर्मावर आधारित पक्षपाती ध्रुवीकरण होते त्याचे वाईट वाटते. माणसे मग सोयीस्कररीत्या विचार बदलतात. त्याची चर्चा ग्रुपवर. मनं विटतात इतक्या चर्चा ताणल्या जातात. बिच्चारा ग्रुपअड्मीन हे तटस्थपणे बघत असतो ! त्याला क्षणभर विचार पटतात, दुसऱ्याक्षणी पटत नाहीत. तळ्यात मळ्यात अशी परिस्थिती !
कधीकधी पोस्टच्या प्रकारावर वादविवाद होतात. काहीवेळा पोस्टची पुनरावृत्ती होते, काही न्यायप्रविष्ट तर काही धार्मिकता सांगणाऱ्या पोस्ट्स मुळे ग्रुपमध्ये वादविवाद सुरू होतात. ग्रुपअड्मीनला सभासदांच्या आक्षेपार्ह पोस्ट्ससाठी तुरुंगात टाकला जावू शकतो- हे वारंवार सांगितलेही जाते. मग ग्रुप अड्मीन सर्व सभासदांना वैयक्तिक चर्चा न करता सबुरीने घ्यायचे जाहीर आवाहन वैगेरे करतो. काही सदस्यांनी अशा सूचना वैयक्तिक वाटू लागतात आणि ग्रुप अस्थिर व्हायला लागतो. त्याला माहीत असते की कोणाच्याही धार्मिक भावनांवर परिणाम करणारे कोणतेही विधान किंवा पोस्टस ग्रुपवर टाकणे गुन्हा आहे आणि असं काही घडल्यास आपण नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. अशा स्थितीत ग्रुप अड्मीन पोलिसांच्या रडारखाली येतो आणि सायबर गुन्हा कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि आयपीसी अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. अड्मीन ची परिस्थिती फारच विचित्र होते. त्याला आता हळू हळू वाटू लागते की हा ग्रुप तयार केला नसता तर बरा झाल असत वगैरे ..
मानवजातीच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या फायद्यासाठी तसेच विकासाठी अशा सुविधांचा उपयोग केला जाऊ शकतोय. लोकांना एकत्र आणून चर्चेस एक महत्वाचं व्यासपीठ तयार केल जाऊ शकतय. विचार बदलू शकतात. अशा ग्रुपद्वारे विचारांवर विचार करता येतात. एकीची शक्ती अन्यायाविरुद्ध लढा उभारण्यासाठी तसेच विधायक कार्य घडवून आणण्यास वापरता येते. वायफळ चर्चा, मतभेद, मतांचे ध्रुवीकरण, आंदोलने यामुळे ग्रुपविषयी आगडपाखाड न करता निराशा बाजूला ठेवायला पाहिजे या ग्रुप अड्मीननी. ग्रुपमध्ये मतैक्य राखण्यासाठी त्याच्या कौशल्यांचा उपयोग करायाला हवा. वेळी एकाद्यास समयसूचक शिक्षा का द्यायची होईना पण लोकहितासाठी अशा चागल्या उपक्रमांमध्ये बाधा येणार नाही हे त्यांनी बघावं. जश्या "व्यक्ती तितक्या प्रवृत्ती" तसंच जमाव नियंत्रित ठेवण ही सुद्धा एक कला आहे. ही ज्याला जमली तो खरा अड्मीन !
- प्रा. केशव राजपुरे
Friday, September 8, 2017
एक प्राध्यापक विद्यार्थ्याच्या नजरेत पाहताना
एक प्राध्यापक विद्यार्थ्याच्या नजरेत पाहताना
आपल्या स्वप्नांना आकार देण्याचे खरे सार्मथ्य शिक्षणामध्ये आहे. उचित शिक्षण ज्ञाननिष्ठ आणि चारित्र्यनिष्ठ अशा आदर्श शिक्षकांमुळेच शक्य आहे. शिक्षणामुळे जीवन उन्नत, परिपूर्ण, सुसह्यदायी तर होतेच याबरोबरच वर्तनात परिवर्तन, कौशल्यविकास आणि जीवन जाणीव अधिक समंजसही व्हायला मदत करते. शिक्षण म्हणजे समजून घेणे, स्वतंत्र विचारांची कला, समाजसेवा, कमवा आणि शिका आणि चांगला मनुष्य बनणे ! बाल्यावस्थेत शिक्षण सहज शक्य वाटते. सुरुवातीला आपण प्रश्न विचारून स्वतःला शिक्षित करतो. जसजसे आपण शिक्षण प्रक्रियेतील शिडी चढत जातो तसतसे ते तुलनेने कठीण बनू लागते. मग आम्ही कप्यांमध्ये शिक्षण घेण्यास प्रारंभ करतो. सुरुवातीला भाषा, गणित आणि विज्ञान ! पुढे विषयांचा अभ्यास सुरू. नंतर आपल्याला हे लक्षात येते की कठीणता ही सापेक्ष आहे. कोणत्याही विषयाची अवघडता ही खरी समस्या नाहीच, समस्या आहे ती अशा दुर्मिळ शिक्षकांची कमी की जे हा विषय योग्य रीतीने समजावून शिकवतील. इथे लोक परीक्षेत उत्तीर्ण होतात आणि इतरांना परीक्षा उत्तीर्ण होण्यास शिकवितात आणि कुणालाच काही कळत नाही. शिक्षणाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक होण्याच्या दृष्टीने चांगले शिक्षक तयार व्हायला हवेत.
शिक्षकाने विद्यार्थ्याला ज्ञान चमच्याने भरवू नये तर ज्ञान घेण्यायोग्य बनवावे. जसे भुकेलेल्याला भाकरी न देता भाकरी कशी मिळवायची हे शिकवावे तसे. आठवा आपण प्रश्न विचारून शिक्षण घ्यायचं कधी थांबवलं ? किशोरवयात आमच्या प्रश्नांची प्रशंसा केली जाते. जसं जसं पुढ जातो तस-तसं आपल्या सर्व प्रश्नांची समाधानकार उत्तर मिळतं नाहीत. त्यांच्या अहंकारामुळे म्हणा किंवा अज्ञानामुळे असेल, पण हे होतं. मग आम्ही शिक्षण घेणे थांबवतो. प्रश्न विचारून शिक्षण प्रवास सुरू ठेवावा. उत्तरं मिळो आथवा ना मिळोत हे चिरंतन चालू राहावं. विचारांवर विचार व्हावा. नेहमी अभिनव कल्पनांमध्ये स्वत: ला गुंतवून घ्यावे.
जर आम्ही परदेशी शिक्षण व्यवस्थेचा संदर्भ घेतला तर व्याख्यानाच्या तासांच्या ६० मिनिटांमधील, शिक्षक फक्त २० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी बोलतो. बाकीच्या वेळी विद्यार्थी चर्चा करतात. नाविन्यपूर्णता, अद्भुतता, सध्याच्या गरजा, समस्या आणि उपाय यावर त्यांचे अभ्यासक्रम आधारीत असतात. संपूर्ण मूल्यमापन यंत्रणा पारदर्शी असते.
आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचा झाकाळून गेलेला भविष्यकाळ आणि विस्कटलेला वर्तमान यांना आकार देणारा शिक्षक केवळ अक्षर ओळख करून देणारा आणि चार गणिते, दोन कविता शिकविणारा नव्हे तर सामाजिक ऋणाची परतफेड करण्याच्या भूमिकेने कर्तबगार नवी पिढी घडविणारा साधक असायला हवा. शिक्षक विद्यार्थीनिष्ठ असावा, विद्यार्थी ज्ञाननिष्ठ असावा, ज्ञान समाजनिष्ठ असावे आणि समाज समतानिष्ठ असावा. अपार निष्ठेने आणि त्या निष्ठेला साजेश्या कौशल्यपूर्ण परीश्रमाने असामान्य यश प्राप्त करून भारताचे कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर व सुजान नागरिक घडवणारे अनेक आदर्श शिक्षक सभोवताली तयार होवोत अशी सर्वसाधारण विद्यार्थ्याची माफक अपेक्षा.. शिक्षणाकडे आणि शिक्षकांकडे पाहण्याचा शासन आणि समाजाचा दृष्टिकोन बदलायला हवा.
-डॉ केशव राजपुरे
Wednesday, July 19, 2017
अक्षय पात्र
अणुउर्जेचे 'अक्षय पात्र' विकसित:
स्वदेशी बनावटीचा पहिला ‘फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ विकसित करण्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. कल्पकम येथे उभी करण्यात आलेली ही अणुभट्टी प्रत्यक्ष कार्यरत होण्यासाठी सज्ज झाली आहे. या प्रकारच्या अणुभट्टीमध्ये वापरण्यात येणाऱ्या इंधनापेक्षा वीजनिर्मितीनंतर जास्त अणुइंधन तयार होते. त्यामुळेच अशा अणुभट्टीला ‘अक्षय पात्र’ अशी उपमा देण्यात आली असून, ती विकसित करणारा भारत हा रशियानंतरचा दुसरा देश ठरला आहे.
या अणुभट्टीमध्ये प्रक्रियांची साखळी सुरू करण्यासाठी न्यूट्रॉनचा वापर करण्यात येतो. पारंपरिक अणुभट्ट्यांच्या तुलनेमध्ये यातील न्यूट्रॉनचा वेग जास्त असल्यामुळे या अणुभट्टीला ‘फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ असे म्हणतात. कल्पकम येथील अणुभट्टीमध्ये थोरियमचे विशेष रॉड वापरण्यात आले आहेत. त्यामुळे या अणुभट्टीमध्ये यू-२३३ हे समस्थानिकही तयार होऊ शकते.
हे आपल्या शास्त्रज्ञ समुदायाचे दीर्घकालीन ध्येय होते. हे भौतिकशास्त्रातील मूलभूत संशोधनाचे निष्कर्ष आहेत. पुढे आपल्या अभियंत्यांनी त्यांची भूमिका निभावली आणि अनुऊर्जेपासून वीजनिर्मिती करण्यामध्ये आपण श्रेष्ठत्वाकडे वाटचाल करीत आहोत. स्वदेशी बनावटीचा पहिला 'फास्ट ब्रीडर रिअॅक्टर' विकसित करण्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. ती विकसित करणारा भारत हा रशियानंतरचा दुसरा देश आहे. आपणा सर्वास अभिमानास्पद अशीच गोष्ट आहे. आपले शास्त्रज्ञ आणि अभियंते खरच कौतुकास पात्र आहेत. अनेक वेळा असं होतं कमी माहितीमुळे आम्ही आमच्या प्रतिभेला कमी लेखतो. कमतरता यशासाठी कारण कसे बनते याचे हे उत्तम उदाहरण आहे. भारतात युरेनियमचे प्रमाण कमी आहे. भारतास साठे नसल्याने युरेनियमची आयात करावी लागते. तसेच भारत युरेनियमची आयात करू शकत नाही, किंबहुना प्रगत देश भारताची अणुउर्जेवरील संशोधनातील घोडदौड बघता आपणास निर्यात करीत नाहित. भविष्यातील ऊर्जेची गरज लक्षात घेता डॉ. होमी भाभा यांनी तीन टप्प्यांत आण्विक कार्यक्रम तयार केला होता. अणुऊर्जा कार्यक्रमातील तिसरा टप्पा थोरियमवर आधारित अणुभट्टय़ांच्या निर्मितीशी संबंधित आहे, यात थोरियम, युरेनियम -२३३ चक्राचा वापर केला जातो. थोरियम की जे भारतात मुबलक प्रमाणात आहे याचा वापर अणुभट्टीत इंधन म्हणून केला जातो. अणुऊर्जा आयोगाने उपलब्ध संसाधनांमधून सर्वोत्तम करण्याकरिता शास्त्रज्ञांना प्रोत्साहित केले त्याचेच हे फळ म्हणावे लागेल.
- केशव राजपुरे
स्वदेशी बनावटीचा पहिला ‘फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ विकसित करण्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. कल्पकम येथे उभी करण्यात आलेली ही अणुभट्टी प्रत्यक्ष कार्यरत होण्यासाठी सज्ज झाली आहे. या प्रकारच्या अणुभट्टीमध्ये वापरण्यात येणाऱ्या इंधनापेक्षा वीजनिर्मितीनंतर जास्त अणुइंधन तयार होते. त्यामुळेच अशा अणुभट्टीला ‘अक्षय पात्र’ अशी उपमा देण्यात आली असून, ती विकसित करणारा भारत हा रशियानंतरचा दुसरा देश ठरला आहे.
या अणुभट्टीमध्ये प्रक्रियांची साखळी सुरू करण्यासाठी न्यूट्रॉनचा वापर करण्यात येतो. पारंपरिक अणुभट्ट्यांच्या तुलनेमध्ये यातील न्यूट्रॉनचा वेग जास्त असल्यामुळे या अणुभट्टीला ‘फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ असे म्हणतात. कल्पकम येथील अणुभट्टीमध्ये थोरियमचे विशेष रॉड वापरण्यात आले आहेत. त्यामुळे या अणुभट्टीमध्ये यू-२३३ हे समस्थानिकही तयार होऊ शकते.
हे आपल्या शास्त्रज्ञ समुदायाचे दीर्घकालीन ध्येय होते. हे भौतिकशास्त्रातील मूलभूत संशोधनाचे निष्कर्ष आहेत. पुढे आपल्या अभियंत्यांनी त्यांची भूमिका निभावली आणि अनुऊर्जेपासून वीजनिर्मिती करण्यामध्ये आपण श्रेष्ठत्वाकडे वाटचाल करीत आहोत. स्वदेशी बनावटीचा पहिला 'फास्ट ब्रीडर रिअॅक्टर' विकसित करण्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. ती विकसित करणारा भारत हा रशियानंतरचा दुसरा देश आहे. आपणा सर्वास अभिमानास्पद अशीच गोष्ट आहे. आपले शास्त्रज्ञ आणि अभियंते खरच कौतुकास पात्र आहेत. अनेक वेळा असं होतं कमी माहितीमुळे आम्ही आमच्या प्रतिभेला कमी लेखतो. कमतरता यशासाठी कारण कसे बनते याचे हे उत्तम उदाहरण आहे. भारतात युरेनियमचे प्रमाण कमी आहे. भारतास साठे नसल्याने युरेनियमची आयात करावी लागते. तसेच भारत युरेनियमची आयात करू शकत नाही, किंबहुना प्रगत देश भारताची अणुउर्जेवरील संशोधनातील घोडदौड बघता आपणास निर्यात करीत नाहित. भविष्यातील ऊर्जेची गरज लक्षात घेता डॉ. होमी भाभा यांनी तीन टप्प्यांत आण्विक कार्यक्रम तयार केला होता. अणुऊर्जा कार्यक्रमातील तिसरा टप्पा थोरियमवर आधारित अणुभट्टय़ांच्या निर्मितीशी संबंधित आहे, यात थोरियम, युरेनियम -२३३ चक्राचा वापर केला जातो. थोरियम की जे भारतात मुबलक प्रमाणात आहे याचा वापर अणुभट्टीत इंधन म्हणून केला जातो. अणुऊर्जा आयोगाने उपलब्ध संसाधनांमधून सर्वोत्तम करण्याकरिता शास्त्रज्ञांना प्रोत्साहित केले त्याचेच हे फळ म्हणावे लागेल.
- केशव राजपुरे
Subscribe to:
Posts (Atom)
अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर
यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...

-
कृत्रिम बुद्धिमत्ता: आपल्या दैनंदिन जीवनात बदल घडवणारी क्रांती आणि २०२४ चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक दररोज जाणतेअजाणतेपणे आपण आर्टिफिश...
-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (संशोधनावर आधारित उच्च शिक्षण) दोन महिन्यापूर्वी भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने नवीन ...
-
ज्ञानदानाची ज्योत (पिढी घडवणारा शिक्षक) ( माझ्या शैक्षणिक प्रवासात, एका प्रामाणिक प्राध्यापकापासून ते संशोधकापर्यंतचा अनुभव आहे. शाळेतील आवड...